शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

धंद्याचे गणित चुकले की, हे हाेणारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 09:47 IST

व्यवसाय हा आत्मविश्वासावर चालतो. मात्र, केवळ आत्मविश्वास पुरेसा आहे का?,अर्थव्यवस्थेच्या झपाट्याने बदलणाऱ्या समीकरणाच्या अनुषंगाने व्यवसायाचे गणित सांभाळावे लागते. हे गणित जर चुकले तर व्यवसायाचे प्रमेय कोलमडते. 

नितीन वैद्य, निर्माता व व्यावसायिक

मराठी माणूस आणि व्यवसाय हे एकेकाळी व्यस्त प्रमाणाचे गणित समजले जायचे. मात्र, जागतिकीकरणाचे क्षितिज जसे विस्तारत गेले तसतसा अनेक नव्या क्षेत्रांचा विकास होऊ लागला. नवीन क्षेत्र तयार होऊ लागली. त्यात अमर्याद संधी उपलब्ध होऊ लागल्या आणि नोकरीच्या मानसिकतेमधील मराठी माणूस मग उद्योजक व्हायची स्वप्न पाहू लागला. व्यवसाय हा आत्मविश्वासावर चालतो. मात्र, केवळ आत्मविश्वास पुरेसा आहे का?, अर्थव्यवस्थेच्या दिवसागणिक झपाट्याने बदलणाऱ्या समीकरणाच्या अनुषंगाने व्यवसायाचे गणित सांभाळावे लागते. हे गणित जर चुकले तर व्यवसायाचे प्रमेय कोलमडते. अशा परिस्थितीत उद्योजक देशोधडीला लागतो किंवा असह्य ताणापोटी मरणालाही जवळ करतो. 

यश आणि अपयश यांचा मेळ अर्थशास्त्राच्या तागडीत तोलायचा असतो आणि त्यामुळे ‘अर्थभान’ हा प्रमुख गुण उद्योजकाने जोपासणे गरजेचे आहे. मुळामध्ये व्यवसाय करताना एक व्यापक दृष्टिकोन हवा, आपले पैसे येतात कुठून, ते जातात कुठे, आपला खर्च किती, उत्पन्न किती, आपल्या विस्ताराच्या योजनांसाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज आपण उद्योगातील दैनंदिन आर्थिक भार सहन करताना कशी करणार आहोत, आपण कर्ज काढले असेल तर त्याच्या नियोजनबद्ध परतफेडीची आपण योजना आखली आहे का?, याचा साधकबाधक विचार जोपासणे गरजेचे आहे. आपल्या क्षेत्राची आपल्याला उत्तम माहिती असली तरी आपल्या क्षेत्राशी निगडीत जे अर्थशास्त्र आहे, त्याची आपल्याला माहिती आहे का?, अशा साऱ्या प्रश्नांना सतत मनात घोळवत ठेवणे गरजेचे आहे. जरी आपल्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांसाठी आपल्याकडे तज्ज्ञ कर्मचारी असले तरी मूळ जो मालक आहे त्याला देखील अर्थभान असणे गरजेचे आहे. 

आर्थिक शिस्तीशी निगडीत असे अनेक मुद्दे आहेत, ज्यांचे काटेकोर पालन करणे नितांत गरजेचे आहे. गेल्या दोन दशकांपासून कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा शब्द सातत्याने आपल्या कानावर पडत आहे. पण, याचा अर्थ काय, कोणत्याही क्षेत्रातील उद्योग असो आणि त्या उद्योगाचे आकारमान लहान-मोठे कसेही असो. जोपर्यंत कार्यालयीन व्यवहारात पारदर्शकता, जागतिक दर्जाच्या व्यवस्थांचे काटेकोर व शिस्तबद्ध पालन होत नाही, तोपर्यंत तो उद्योग कधी सावरला जात नाही. जर उद्योगनिहाय आवश्यक कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे पालन झाले तर तुमच्या कंपनीची विश्वासार्हता वाढते. त्यामुळेच आज कोणत्याही क्षेत्रातील उद्योजक असो, आर्थिक शिस्त, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि कॉम्प्लायन्स या तीन मुद्यांचे काटेकोर पालन त्याने अंगीकारणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, व्यवसायाचे गणित कोलमडण्यास फारसा वेळ लागणार नाही. जाता जाता एवढेच अधोरेखित करायचे आहे की, व्यवसाय करताना जिभेवर साखर हवी आणि डोक्यावर बर्फ!

  • जागतिकीकरणानंतर आता केवळ भारतात नव्हे तर जागतिक अर्थकारणाने शिस्तीचे जे लिखित-अलिखित नियम आखले आहेत त्यांची परिपूर्तता (कॉम्प्लायन्स) आपण करतो का, याचे चिंतन व अनुषंगिक कृती उद्योजकाने करायला हवी. 
  • आपल्या वैयक्तिक पातळीवरील खर्चामध्ये आपण वर-खाली करतो. मात्र, व्यवसाय करताना असे करून चालत नाही. तसे झाले तर व्यवसायाचे चाक कधी रुतेल याचा भरवसा नाही. 
  • उदाहरणाने सांगायचे तर, मी ज्या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे तिथे १८ टक्के जीएसटी आहे. आमच्या कलावंतांना जे मानधन देतो त्याच्या जीएसटीची रक्कम देखील आम्ही त्यांना देतो. मात्र, आपल्याला हे अधिकचे पैसे हे करापोटी मिळाले असून ते आपल्याला भरणे सक्तीचे आहे, याचेच भान अनेकांना नसते. 
  • परिणामी ते कलावंतही अडचणीत येतात आणि आमच्यासारखे निर्माते जे त्यांना पैसे देतात तेही अडचणीत येण्याची शक्यता असते. जीएसटी हा एक मुद्दा आहे.