शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

धंद्याचे गणित चुकले की, हे हाेणारच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 09:47 IST

व्यवसाय हा आत्मविश्वासावर चालतो. मात्र, केवळ आत्मविश्वास पुरेसा आहे का?,अर्थव्यवस्थेच्या झपाट्याने बदलणाऱ्या समीकरणाच्या अनुषंगाने व्यवसायाचे गणित सांभाळावे लागते. हे गणित जर चुकले तर व्यवसायाचे प्रमेय कोलमडते. 

नितीन वैद्य, निर्माता व व्यावसायिक

मराठी माणूस आणि व्यवसाय हे एकेकाळी व्यस्त प्रमाणाचे गणित समजले जायचे. मात्र, जागतिकीकरणाचे क्षितिज जसे विस्तारत गेले तसतसा अनेक नव्या क्षेत्रांचा विकास होऊ लागला. नवीन क्षेत्र तयार होऊ लागली. त्यात अमर्याद संधी उपलब्ध होऊ लागल्या आणि नोकरीच्या मानसिकतेमधील मराठी माणूस मग उद्योजक व्हायची स्वप्न पाहू लागला. व्यवसाय हा आत्मविश्वासावर चालतो. मात्र, केवळ आत्मविश्वास पुरेसा आहे का?, अर्थव्यवस्थेच्या दिवसागणिक झपाट्याने बदलणाऱ्या समीकरणाच्या अनुषंगाने व्यवसायाचे गणित सांभाळावे लागते. हे गणित जर चुकले तर व्यवसायाचे प्रमेय कोलमडते. अशा परिस्थितीत उद्योजक देशोधडीला लागतो किंवा असह्य ताणापोटी मरणालाही जवळ करतो. 

यश आणि अपयश यांचा मेळ अर्थशास्त्राच्या तागडीत तोलायचा असतो आणि त्यामुळे ‘अर्थभान’ हा प्रमुख गुण उद्योजकाने जोपासणे गरजेचे आहे. मुळामध्ये व्यवसाय करताना एक व्यापक दृष्टिकोन हवा, आपले पैसे येतात कुठून, ते जातात कुठे, आपला खर्च किती, उत्पन्न किती, आपल्या विस्ताराच्या योजनांसाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज आपण उद्योगातील दैनंदिन आर्थिक भार सहन करताना कशी करणार आहोत, आपण कर्ज काढले असेल तर त्याच्या नियोजनबद्ध परतफेडीची आपण योजना आखली आहे का?, याचा साधकबाधक विचार जोपासणे गरजेचे आहे. आपल्या क्षेत्राची आपल्याला उत्तम माहिती असली तरी आपल्या क्षेत्राशी निगडीत जे अर्थशास्त्र आहे, त्याची आपल्याला माहिती आहे का?, अशा साऱ्या प्रश्नांना सतत मनात घोळवत ठेवणे गरजेचे आहे. जरी आपल्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांसाठी आपल्याकडे तज्ज्ञ कर्मचारी असले तरी मूळ जो मालक आहे त्याला देखील अर्थभान असणे गरजेचे आहे. 

आर्थिक शिस्तीशी निगडीत असे अनेक मुद्दे आहेत, ज्यांचे काटेकोर पालन करणे नितांत गरजेचे आहे. गेल्या दोन दशकांपासून कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा शब्द सातत्याने आपल्या कानावर पडत आहे. पण, याचा अर्थ काय, कोणत्याही क्षेत्रातील उद्योग असो आणि त्या उद्योगाचे आकारमान लहान-मोठे कसेही असो. जोपर्यंत कार्यालयीन व्यवहारात पारदर्शकता, जागतिक दर्जाच्या व्यवस्थांचे काटेकोर व शिस्तबद्ध पालन होत नाही, तोपर्यंत तो उद्योग कधी सावरला जात नाही. जर उद्योगनिहाय आवश्यक कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे पालन झाले तर तुमच्या कंपनीची विश्वासार्हता वाढते. त्यामुळेच आज कोणत्याही क्षेत्रातील उद्योजक असो, आर्थिक शिस्त, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि कॉम्प्लायन्स या तीन मुद्यांचे काटेकोर पालन त्याने अंगीकारणे महत्त्वाचे आहे. अन्यथा, व्यवसायाचे गणित कोलमडण्यास फारसा वेळ लागणार नाही. जाता जाता एवढेच अधोरेखित करायचे आहे की, व्यवसाय करताना जिभेवर साखर हवी आणि डोक्यावर बर्फ!

  • जागतिकीकरणानंतर आता केवळ भारतात नव्हे तर जागतिक अर्थकारणाने शिस्तीचे जे लिखित-अलिखित नियम आखले आहेत त्यांची परिपूर्तता (कॉम्प्लायन्स) आपण करतो का, याचे चिंतन व अनुषंगिक कृती उद्योजकाने करायला हवी. 
  • आपल्या वैयक्तिक पातळीवरील खर्चामध्ये आपण वर-खाली करतो. मात्र, व्यवसाय करताना असे करून चालत नाही. तसे झाले तर व्यवसायाचे चाक कधी रुतेल याचा भरवसा नाही. 
  • उदाहरणाने सांगायचे तर, मी ज्या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे तिथे १८ टक्के जीएसटी आहे. आमच्या कलावंतांना जे मानधन देतो त्याच्या जीएसटीची रक्कम देखील आम्ही त्यांना देतो. मात्र, आपल्याला हे अधिकचे पैसे हे करापोटी मिळाले असून ते आपल्याला भरणे सक्तीचे आहे, याचेच भान अनेकांना नसते. 
  • परिणामी ते कलावंतही अडचणीत येतात आणि आमच्यासारखे निर्माते जे त्यांना पैसे देतात तेही अडचणीत येण्याची शक्यता असते. जीएसटी हा एक मुद्दा आहे.