शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

तसे न होते तर?

By admin | Updated: March 25, 2016 03:23 IST

समजा बांगला देशच्या मुशफिक्र रहमान आणि महमुद्दुला या दोन्ही फलंदाजांना विजयाचा फटका मारण्याची सुरसुरी आली नसती आणि त्यांनी टुकुटुकु खेळून संयमाचे प्रदर्शन करी आपल्या

समजा बांगला देशच्या मुशफिक्र रहमान आणि महमुद्दुला या दोन्ही फलंदाजांना विजयाचा फटका मारण्याची सुरसुरी आली नसती आणि त्यांनी टुकुटुकु खेळून संयमाचे प्रदर्शन करी आपल्या संघाला विजय मिळवून दिला असता तर काय झाले असते? आज हिरो ठरवला गेलेला हार्दिक पंड्या किती बोगस गोलंदाज आहे, धोनीच्या नेतृत्वात कसा कस राहिलेला नाही, भारतीय क्रिकेट संघ कसा गल्ली क्रिकेट खेळण्याच्याही लायकीचा राहिलेला नाही आणि सरतेशेवटी ‘खात्रीने सांगतो, मॅच फिक्स झाली होती हो’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊन धोनीसकट त्याच्या संपूर्ण संघाची बंगळुरुबाहेर पडणारी वाट रोखली गेली असती की नाही? १८ चेंडूत २७ धावा हे सतराव्या षटकानंतरचे समीकरण अखेरच्या षटकात १२ चेंडूत ११ आणि अखेरच्या तीन चेंडूत तर अवघ्या दोन धावा इतके सोपे आणि सहजसाध्य झाले होते. मर्यादित वीस षटकांच्या विश्व करंडक सामन्यातील ‘अ’ गटात न्यूझीलंडकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला पराभूत करुन भारत बुधवारी बांगलादेशविरुद्ध बंगळुरुच्या चिन्नाप्पा स्टेडियममध्ये उतरला होता. आधी फलंदाजी करताना भारताचे फलंदाज तसे ढेपाळलेच. पण हा सामना कमी धावांचा राहील असे समीक्षक सांगत होते. तरीही आशियाई करंडकात पाकिस्तानला लोळवणारा बांगलादेशचा संघ लेचापेचा नसल्याचे त्याने अगोदरच दाखवून दिल्यामुळे विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य त्याच्या दृष्टीने असाध्य नव्हते. प्रत्यक्षात झालेही तसेच. सामना खरे तर त्या संघाने हाणतच आणला होता. भारतीय कर्णधार धोनी याची देहबोली त्याच्यातील अस्वस्थता दाखवून देत होती. सामना बरोबरीत सुटला तरी मिळवली अशीच प्रेक्षकांचीही प्रतिक्रिया होती. पण म्हणतात ना विजयासारखा विजयच. तरीही या सामन्याने आणि आशिया करंडकातील अंतिम सामन्याने एक बाब ठळकपणे दाखवून दिली आहे की क्रिकेटच्या मैदानावर भारत खेळतो तेव्हां आजवर केवळ पाकिस्तान समोर असतानाच ते धर्मयुद्ध होत असते आता पाकच्या जोडीला बांगलादेशदेखील धर्मयोद्धा ठरतो आहे!