शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

बोगस वधूशी ‘शुभमंगल’ ठरत असेल तर ‘सावधान’!

By प्रगती पाटील | Updated: December 21, 2023 08:14 IST

लग्न रखडलेल्या युवकांना जाळ्यात ओढणाऱ्या एजंटांच्या टोळ्या, ‘यादी पे शादी’चे आमिष नाकारणे कठीण झालेली अगतिक कुटुंबे आणि एक नवी डोकेदुखी!

-प्रगती पाटील, उपसंपादक/वार्ताहर लोकमत, सातारा

पैशांचा पाऊस पाडतो, सरकारी नोकरी लावतो, भूतबाधा दूर करतो असे काहीबाही सांगून आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांनी एकेकाळी समाज ढवळून काढला होता. झटपट श्रीमंत होण्याचे हे प्रकार कालोघात लुप्त होऊ लागले आहेत. त्यांची जागा घेतलीये  ऑनलाइन फ्राॅड, ओटीपी मागून फसवूक, क्रेडिट कार्ड स्कॅमसारख्या आधुनिक फसवणुकींनी. या सर्वच फसवणुकींमध्ये कळस केलाय तो बोगस नववधूंनी! लोकांच्या अगतिकतेचे भांडवल करून फसवणूक करणाऱ्या या नववधूंच्या समृद्ध टोळीचे नेटवर्क आता राज्याबाहेरही पसरू लागले आहे.  अनेक घरांमध्ये यातून केवळ मनस्ताप शिरला आहे. काहींनी तर आयुष्याला अर्थ नाही म्हणून अवघ्या तिशीतच मृत्यूलाही कवटाळले आहे.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना आहे. भविष्याच्या स्वप्नांमध्ये रममाण होताना आपली सहचारिणी आणि तिच्यासोबत गुंतलेली स्वप्ने फक्त मुलगा एकटा बघत नाही, त्याच्याबरोबर त्याचे पालकही या प्रक्रियेमध्ये सामील झालेले असतात. मुलींचे घटते प्रमाण (आणि वाढत्या अपेक्षा) लक्षात घेता अनेक विवाहेच्छुक तरुणांची लग्ने हल्ली रेंगाळताना दिसतात. या पार्श्वभूमीवर घरीदारी कसली चौकशी न करता केवळ चांगली मुलगी हा एकमेव निकष लावून लग्न ठरविण्याची नवी पद्धत रुजू लागली आहे. 

कमी शिक्षण, बेताचीच नोकरी-व्यवसाय, किंवा मग बेभरवशाची शेती असलेल्या तरुण मुलांना तिशी उलटली तरी लग्नासाठी मुलगी मिळत नाही, हे हेरून खोटी लग्ने लावण्याचा एक नवाच ‘धंदा’ सध्या तेजीत असून,  तोतया टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. लग्नाचे वय वाढत असलेल्या तरुणांच्या घरात अनेक प्रकारची युद्धं सुरू असतात. अनेक पातळ्यांवर तडजोड करण्याची तयारी केल्यानंतरही मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने सगळ्यांचीच मानसिकता कोलमडते. यातच कोणीतरी एजंट येऊन आशेचा किरण दाखवतो. लग्नाला तयार असणाऱ्या मुलीचा ‘तपशील’ कळतो. ‘हुंडाबिंडा, मानपान सोडाच; लग्नाचा सगळा खर्चही आम्हीच करतो, तुम्ही फक्त मुलगी द्या’ अशा काकुळतीला आलेले मुलाचे पालक घाईघाईत सोहळा ठरवतात.  एजंटही ‘यादी पे शादी’ करण्याच्या कबुलीवरच मुलीला दाखवायला आणतात. यात (बोगस) मुलीचे (बोगस) नातेवाईकही उभे केलेले असतात. या कुटुंबाविषयी कसलीही माहिती न घेता, त्यांची कसली चौकशीही न करता हे लग्न उरकले जाते.  - हे सारे पार पडले की  लग्न करून घरी आलेली नववधू अंगावरची हळद उतरण्याच्या आतच दागदागिने घेऊन पसार होते. एजंटला याविषयी जाब विचारावा, तर तो आधीच नामानिराळा झालेला असतो. मग कुटुंबाला धक्का, आर्थिक फसवणूक आणि जखमेवर मीठ चोळावे तशी सामाजिक मानहानी! यातून येणाऱ्या नैराश्यातून नवऱ्या मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही झळकू लागल्या आहेत. 

गर्भातच मुलींचा जीव घेणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या पुढच्या पिढीसाठी लग्न करायला आता मुलगी मिळेना, ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. सरकारी आकडेवारीपेक्षाही प्रत्यक्षात मुलींचा जन्मदर आणखी घसरल्याचे सामाजिक संस्था सांगतात. त्याशिवाय खेड्यात राहतो म्हणून, शेती(च) करतो म्हणून मुलांना नकार देणाऱ्या मुलींची शहरी जोडीदाराची अपेक्षाही या विचित्र त्रांगड्याच्या मुळाशी आहे. हा बोगस लग्नांचा ‘फिल्मी ड्रामा’ पश्चिम महाराष्ट्रात बोकाळला असून, इतर भागातही या  फसवणुकीचे लोण पसरते आहे. लग्न रखडलेले युवक शोधून त्यांच्या कुटुंबीयांना जाळ्यात ओढणाऱ्या एजंटांच्या टोळ्या ही एक नवी डोकेदुखी झाली असून, तत्काळ मुलगी दाखवून लग्न लावून देण्याचे आमिष नाकारणे कठीण अशी परिस्थिती असलेली कुटुंबे वाढत असल्याचेच हे लक्षण होय!  हे चित्र बदलत्या कुटुंबचित्रातल्या अगतिकतेची कहाणी सांगते. ही कहाणी जितकी संतापजनक तितकीच करुण आहे.  कित्येक मुलींचे गळे गर्भातच घोटले गेल्याने, शिक्षण-व्यवसाय-पैसाअडका-लग्न या समीकरणात ‘अवास्तव अपेक्षा’ नावाचे नवे विघ्न येऊ दिल्यानेच तरुण-तरुणींच्या सहजीवनाचे चित्र हे असे भेसूर होत चालले आहे!pragati.patil@lokmat.com

टॅग्स :marriageलग्न