शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

बोगस वधूशी ‘शुभमंगल’ ठरत असेल तर ‘सावधान’!

By प्रगती पाटील | Updated: December 21, 2023 08:14 IST

लग्न रखडलेल्या युवकांना जाळ्यात ओढणाऱ्या एजंटांच्या टोळ्या, ‘यादी पे शादी’चे आमिष नाकारणे कठीण झालेली अगतिक कुटुंबे आणि एक नवी डोकेदुखी!

-प्रगती पाटील, उपसंपादक/वार्ताहर लोकमत, सातारा

पैशांचा पाऊस पाडतो, सरकारी नोकरी लावतो, भूतबाधा दूर करतो असे काहीबाही सांगून आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांनी एकेकाळी समाज ढवळून काढला होता. झटपट श्रीमंत होण्याचे हे प्रकार कालोघात लुप्त होऊ लागले आहेत. त्यांची जागा घेतलीये  ऑनलाइन फ्राॅड, ओटीपी मागून फसवूक, क्रेडिट कार्ड स्कॅमसारख्या आधुनिक फसवणुकींनी. या सर्वच फसवणुकींमध्ये कळस केलाय तो बोगस नववधूंनी! लोकांच्या अगतिकतेचे भांडवल करून फसवणूक करणाऱ्या या नववधूंच्या समृद्ध टोळीचे नेटवर्क आता राज्याबाहेरही पसरू लागले आहे.  अनेक घरांमध्ये यातून केवळ मनस्ताप शिरला आहे. काहींनी तर आयुष्याला अर्थ नाही म्हणून अवघ्या तिशीतच मृत्यूलाही कवटाळले आहे.

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना आहे. भविष्याच्या स्वप्नांमध्ये रममाण होताना आपली सहचारिणी आणि तिच्यासोबत गुंतलेली स्वप्ने फक्त मुलगा एकटा बघत नाही, त्याच्याबरोबर त्याचे पालकही या प्रक्रियेमध्ये सामील झालेले असतात. मुलींचे घटते प्रमाण (आणि वाढत्या अपेक्षा) लक्षात घेता अनेक विवाहेच्छुक तरुणांची लग्ने हल्ली रेंगाळताना दिसतात. या पार्श्वभूमीवर घरीदारी कसली चौकशी न करता केवळ चांगली मुलगी हा एकमेव निकष लावून लग्न ठरविण्याची नवी पद्धत रुजू लागली आहे. 

कमी शिक्षण, बेताचीच नोकरी-व्यवसाय, किंवा मग बेभरवशाची शेती असलेल्या तरुण मुलांना तिशी उलटली तरी लग्नासाठी मुलगी मिळत नाही, हे हेरून खोटी लग्ने लावण्याचा एक नवाच ‘धंदा’ सध्या तेजीत असून,  तोतया टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. लग्नाचे वय वाढत असलेल्या तरुणांच्या घरात अनेक प्रकारची युद्धं सुरू असतात. अनेक पातळ्यांवर तडजोड करण्याची तयारी केल्यानंतरही मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने सगळ्यांचीच मानसिकता कोलमडते. यातच कोणीतरी एजंट येऊन आशेचा किरण दाखवतो. लग्नाला तयार असणाऱ्या मुलीचा ‘तपशील’ कळतो. ‘हुंडाबिंडा, मानपान सोडाच; लग्नाचा सगळा खर्चही आम्हीच करतो, तुम्ही फक्त मुलगी द्या’ अशा काकुळतीला आलेले मुलाचे पालक घाईघाईत सोहळा ठरवतात.  एजंटही ‘यादी पे शादी’ करण्याच्या कबुलीवरच मुलीला दाखवायला आणतात. यात (बोगस) मुलीचे (बोगस) नातेवाईकही उभे केलेले असतात. या कुटुंबाविषयी कसलीही माहिती न घेता, त्यांची कसली चौकशीही न करता हे लग्न उरकले जाते.  - हे सारे पार पडले की  लग्न करून घरी आलेली नववधू अंगावरची हळद उतरण्याच्या आतच दागदागिने घेऊन पसार होते. एजंटला याविषयी जाब विचारावा, तर तो आधीच नामानिराळा झालेला असतो. मग कुटुंबाला धक्का, आर्थिक फसवणूक आणि जखमेवर मीठ चोळावे तशी सामाजिक मानहानी! यातून येणाऱ्या नैराश्यातून नवऱ्या मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही झळकू लागल्या आहेत. 

गर्भातच मुलींचा जीव घेणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या पुढच्या पिढीसाठी लग्न करायला आता मुलगी मिळेना, ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. सरकारी आकडेवारीपेक्षाही प्रत्यक्षात मुलींचा जन्मदर आणखी घसरल्याचे सामाजिक संस्था सांगतात. त्याशिवाय खेड्यात राहतो म्हणून, शेती(च) करतो म्हणून मुलांना नकार देणाऱ्या मुलींची शहरी जोडीदाराची अपेक्षाही या विचित्र त्रांगड्याच्या मुळाशी आहे. हा बोगस लग्नांचा ‘फिल्मी ड्रामा’ पश्चिम महाराष्ट्रात बोकाळला असून, इतर भागातही या  फसवणुकीचे लोण पसरते आहे. लग्न रखडलेले युवक शोधून त्यांच्या कुटुंबीयांना जाळ्यात ओढणाऱ्या एजंटांच्या टोळ्या ही एक नवी डोकेदुखी झाली असून, तत्काळ मुलगी दाखवून लग्न लावून देण्याचे आमिष नाकारणे कठीण अशी परिस्थिती असलेली कुटुंबे वाढत असल्याचेच हे लक्षण होय!  हे चित्र बदलत्या कुटुंबचित्रातल्या अगतिकतेची कहाणी सांगते. ही कहाणी जितकी संतापजनक तितकीच करुण आहे.  कित्येक मुलींचे गळे गर्भातच घोटले गेल्याने, शिक्षण-व्यवसाय-पैसाअडका-लग्न या समीकरणात ‘अवास्तव अपेक्षा’ नावाचे नवे विघ्न येऊ दिल्यानेच तरुण-तरुणींच्या सहजीवनाचे चित्र हे असे भेसूर होत चालले आहे!pragati.patil@lokmat.com

टॅग्स :marriageलग्न