शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

मी मराठी असतो, तर आज आहे त्याहून समृद्ध असतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 10:28 IST

लेखक-कलावंतांसाठीच्या ‘सांस्कृतिक जागा’ ही समाजाची गरज आहे. त्या कलाकारांनीच चालवाव्यात, सरकारच्या नियंत्रणात जाऊ देऊ नयेत!

परेश रावल, ज्येष्ठ अभिनेते

अभिनेता म्हणून डॉ. श्रीराम लागू रंगावकाशचं उद्घाटन करणं माझ्यासाठी खूप अभिमानाचं आहे. माझ्यासाठी हा सर्वोच्च आनंदाचा, गौरवाचा क्षण आहे, असं मी मानतो. खूप काही सांगावंसं वाटत असतं, तेव्हा मेंदू काहीसा बधिर झाल्यासारखा होतो. १९७३ मध्ये नवीनभाई ठक्कर थिएटरमध्ये एक नाट्य स्पर्धा व्हायची; त्या स्पर्धेत ‘गिधाडे’ नाटक सादर झालं, तेव्हापासून मी डॉ. लागू यांना ओळखतो. तेव्हा त्यांच्या ‘गिधाडे’ या मराठी नाटकाचं गुजरातीमध्ये नाट्यरूपांतर करण्यासाठी मुकुंद जानी यांनी मला विचारलं, त्यात काम करायची संधीही मिळाली. तेव्हा खूप कौतुक झालं, ते आज लख्ख आठवतं! मी अभिनेता म्हणून कमी-अधिक असेन, पण मोठा भाग्यवान आहे, हे मात्र खरं! नाही तर श्रीराम लागूंसारखी थोर माणसं माझ्या आयुष्यात कशी आली असती? 

मी जेव्हा खासदार झालो, तेव्हापासून मुंबईत रंगकर्मींसाठी त्यांच्या हक्काची जागा असावी, यासाठी बरीच धडपड करीत आलो. एका मान्यवर उद्योगसमूहाशी काही बोलणी झाली; पण माझे प्रयत्न पूर्णत्वाला गेले नाहीत.  नंतर मी गुजरातेत आनंदीबेन पटेल यांच्याकडे गेलो. गुजरात सरकारला विनंती केली. त्यांनी जागा शोधली, वास्तूरचनाकार मिळाले; पण नंतर सगळा कारभार स्थानिक प्रशासनाच्या नियंत्रणाखाली गेला आणि सगळंच बिघडलं. त्यातून मी एकच शिकलो, की  सांस्कृतिक केंद्र कधीही सरकारी यंत्रणेच्या नियंत्रणाखाली जाऊ नयेत. पुण्यातलं ‘डॉ. श्रीराग लागू रंगावकाश’  सरकारी यंत्रणेकडे नाही, याचा आनंद आहे. 

मराठी भाषेतील साहित्य आणि कलेची परंपरा फार महत्त्वाची आणि उच्च दर्जाची आहे.  मी  मराठी रंगभूमीत काम करीत असतो, तर मराठी रंगभूमी, कलाकार यांच्याबरोबर माझा स्नेह जास्त घट्ट झाला असता, एक अभिनेता, एक नाट्यकर्मी म्हणून माझ्यात आज असलेल्या क्षमता नक्कीच वाढल्या असत्या, मी आणखी अनुभवसंपन्न झालो असतो! मराठीमध्ये जास्तीत जास्त चांगली नाटकं यावीत, याची आम्ही गुजराती लोक वाटच बघत असतो. कारण इथे चांगली नाटकं आली की आमचीही ताकद वाढते. आम्ही तीच नाटकं मग  गुजरातीत करतो. पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेंटरशी माझं नातं अनेक वर्षांपासून जोडलेलं आहे. ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक मी गुजरातीमध्ये केलं होतं. 

नाटकांच्या तिकिटांवर जीएसटी लागला, तर नाटक संस्कृती लयाला जाईल, असं आम्हाला वाटत होतं, यावर मी दिल्लीत असताना अनेकदा आवाज उठवला. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेटही घेतली. एक दिवस अजित भुरे, अशोक हांडे ही मंडळी दिल्लीत होती. आम्ही शरद पवार यांच्याकडे गेलो, ते आमच्या सोबत अरुण जेटली यांच्याकडे यायला तयार झाले.  त्या भेटीत अवघ्या १५ ते २० सेकंदात जीएसटीचा मुद्दा निकाली निघाला आणि अरुण जेटली यांनी नाटकांच्या तिकिटावर जीएसटी लावला जाणार नसल्याचा आदेशही काढला. बाहेर आल्यानंतर उत्सुकतेपोटी मी पवारांना विचारलं, ही काही तुमची व्होट बँक नाही, तरी तुम्ही पुढाकार घेतलात! त्यावर पवार  म्हणाले, ‘हा विषय कला आणि संस्कृतीचा आहे. मुंबईतील कला-संस्कृती मराठी माणसामुळे टिकली आहे!’ कला, संस्कृती टिकविण्याची ही जबाबदारी मराठी लोकच उचलू शकतात, हे खरं आहे! आज गुजरातमध्ये बडोदा हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं, येथे मराठी माणसांची संख्या मोठी असणं, हा योगायोग नक्कीच नव्हे!

भारतात आज ‘ब्लॅक बॉक्स’ ही संकल्पना नवीन आहे. ‘श्रीराम लागू रंग अवकाश’सारख्या सांस्कृतिक जागा ही समाजाची गरज आहे. अशा ‘स्पेसेस’मधून कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांच्या कक्षा तर रुंदावतीलच, शिवाय प्रेक्षकांनाही याचा फायदा होईल. अशा जागा कलाकारांनी चालवल्या तर त्यांचं सोनं होतं! - अशा जागा सरकारच्या नियंत्रणाबाहेरच असल्या पाहिजेत!  (महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने पुण्याच्या ज्योत्स्ना भोळे सभागृह संकुलात ‘श्रीराम लागू रंगावकाश’च्या कार्यारंभप्रसंगी केलेल्या भाषणाचा संपादित अंश) 

शब्दांकन : श्रीकिशन काळे, लोकमत, पुणे

टॅग्स :Paresh Rawalपरेश रावल