शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

भांडणे संपली असल्यास राज्याकडे पाहा

By admin | Updated: March 2, 2015 00:31 IST

देशाचे बजेट झाले. आता राज्याचे बजेट कसे असेल याची चर्चा सुरू झाली आहे. खूप बोलकी घटना मंत्रालयात गेलात की पाहायला मिळेल.

अतुल कुलकर्णी -

देशाचे बजेट झाले. आता राज्याचे बजेट कसे असेल याची चर्चा सुरू झाली आहे. खूप बोलकी घटना मंत्रालयात गेलात की पाहायला मिळेल. तुमचे बजेट कसे हवे ते आम्हाला सांगा असा आशय चिटकवलेल्या पांढऱ्या कागदात गुंडाळलेल्या चौकोनी पेट्या तुम्हाला लिफ्टच्या दाराजवळ पहावयास मिळतील. या अभिवन कल्पनेचे कौतुक आहे. सरकारमध्ये अनुभवी लोकांची कमतरता आहे. मात्र त्यावर मात करत लोकसहभागाची कल्पना मांडणे निश्चित चांगले आहे. मात्र कोणत्याही राज्याचे बजेट सूचना मांडून तयार होत नसते. दूरगामी विकास योजना आखताना ठाम भूमिका, प्रखर राजकीय इच्छाशक्ती आणि निर्णय राबविण्यासाठी कठोर प्रशासनाची तयारी असावी लागते. अनुभव नसला तरी चालेल, पण या गोष्टींचा अभाव अडचणीचा ठरू शकतो. अजूनही मंत्रालय सुरळीत सुरू झाल्याचे चित्र नाही. मंत्र्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. पीए, पीएसच्या पोस्टिंग अजून रखडल्या आहेत. त्यातच मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी घेण्याची नवी प्रथा सुरू झाली. मंत्री सोमवारी दुपारपर्यंत येतात, मंगळवारी सिद्धिविनायकाच्या बरोबरीने मंत्रालयात गर्दी होते. बुधवारी दुपारपर्यंत मंत्री थांबतात आणि गुरुवारपासून मंत्रालय पुन्हा सुने सुने होऊ लागते. मंत्री मंत्रालयात थांबायला तयार नाहीत, तेथे शांत बसून बजेटसारख्या गंभीर विषयाचा विचार होणार कसा? सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे असे किती दिवस सांगणार? अर्थखात्याची श्वेतपत्रिका अधिवेशनाच्या तोंडावर काढून विरोधकांवर दोषारोप ठेवल्याने प्रश्न संपणार नाहीत. राज्यातून गोळा होणाऱ्या एकूण कराच्या ६२ टक्के वाटा राज्यांना देण्याचे केंद्रीय अर्थसंकल्पात मान्य केले आहे. पूर्वी फक्त ३२ टक्के वाटा मिळत होता. त्यामुळे पैसे नाहीत ही ओरड चालणार नाही. उलट वायफळ खर्चाला कसा लगाम घालायचा याचे नियोजनही बजेटमधून दिसायला हवे. जे आज दिसत नाही.उदाहरण म्हणून राज्यातल्या गोरगरीब रुग्णांसाठी काम करणारे दोन विभाग कसे टोकाला जाऊन काम करीत आहेत हे पाहिले तरी राज्याचे चित्र समोर येईल. वैद्यकीय शिक्षण खात्याकडे बजेटच नाही आणि सार्वजनिक आरोग्य खात्याकडे हजारो कोटींचे बजेट आहे, पण खर्चावर नियंत्रण नाही. एकीकडे हा विभाग अमेरिकन स्टॅण्डर्डचे पलंग रुग्णांना हवेत असा आग्रह धरतो आणि त्याच पलंगावर झोपणाऱ्या पेशंटला मात्र सुमार दर्जाची औषधं देतो. दोन्ही विभाग एकमेकांची उणीदुणी काढत बसली आहेत. दोघे एकत्र येऊन रुग्णांसाठी चांगल्या औषधांचा आग्रह धरत नाहीत. दोन्ही खात्याच्या संचालकांनी जेवढ्या बैठका औषध विक्रेत्यांसोबत केल्या तेवढ्या वेळा तरी त्यांनी राज्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना किंवा मेडिकल कॉलेजना भेट दिली का हे जाहीर करावे! कोणालाही गोरगरिबांचे, मध्यमवर्गाचे घेणेदेणे उरलेले नाही. टोलचे धोरण येणार हे खूपदा सांगून झाले, अजूनही ते आलेले नाही. उलट नवे चार टोल सुरू झाले. हीच अवस्था एसआरए योजनांची आहे. किती एसआरए योजना अजून पडून आहेत याचा लेखाजोखा मांडलेला नाही. दाभोलकरांच्या हत्त्येनंतर सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, सरकारने राजीनामा दिला पाहिजे म्हणणारेच सत्तेत आले. त्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांचा खून झाला तेव्हा याच लोकांनी मंत्रिमंडळ बैठकीत पानसरेंना साधी श्रद्धांजली वाहिली नाही. सरकार बदलले आहे हे त्याच्या कृतीतून दिसायला हवे, वृत्तीतून जाणवायला पाहिजे. दुर्दैवाने ते चित्र नाही. मंत्री ज्येष्ठतेच्या वादात गुरफटलेले आहेत आणि शिवसेना सत्तेत राहून विरोधकांसारखी वागत आहे, कारण तिला मनपा निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी राज्य पणाला लागले तरी चालेल अशा वृत्तीतून राज्य कसे उभारी घेणार? सत्तेत राहून भाजपा सेना भांडत आहेत. ही भांडणे लवकर संपवा आणि बजेटच्या कामाला लागा...