शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मलाही म्हणावेसे वाटेल ‘गर्वसे कहो हम देशद्रोही है’!

By admin | Updated: February 19, 2016 03:03 IST

नव्वदच्या दशकात देशातील राजकारणात धर्मनिरपेक्ष आणि ढोंगी धर्मनिरपेक्ष अशी दुफळी निर्माण झाली होती. पण आताची दुफळी अधिक घातक म्हणजे राष्ट्रभक्त

राजदीप सरदेसाई - (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)

नव्वदच्या दशकात देशातील राजकारणात धर्मनिरपेक्ष आणि ढोंगी धर्मनिरपेक्ष अशी दुफळी निर्माण झाली होती. पण आताची दुफळी अधिक घातक म्हणजे राष्ट्रभक्त व राष्ट्रद्रोही अशी आहे. माझ्यावर पहिल्यांदाच सोशल मीडियातून राष्ट्रद्रोही असल्याचा आरोप झाला, तेव्हा मला माझी भूमिका मांडायला पुरेशी संधीदेखील दिली गेली नाही. मतप्रदर्शन केले म्हणून लगेच राष्ट्रभक्तीवर शंका घेणे तसे कुणालाच आवडत नसते. पण आता काही वर्षानंतर ज्या काही असभ्य घटना घडत आहेत त्या बघता ‘गर्वसे कहो हम देशद्रोही है’, असेच मला म्हणावेसे वाटते. ते का, हे जरा विस्ताराने बघू. घटनेच्या १९ व्या कलमात जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे त्याच्या व्यापक व्याख्येवर माझा विश्वास आहे. त्यात केवळ दोन उचित बंधने आहेत. हिंसा आणि द्वेष यांना प्रोत्साहित करणारी वक्तव्ये. घटनेत ज्याला द्वेष पसरविणारे वक्तव्य म्हटले आहे त्यावर चर्चा होऊ शकते. उदाहरणार्थ रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात दिली जाणारी ‘जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा’ ही घोषणा हिंदू राष्ट्राचे आवाहन करुन कायद्याचे उल्लंघन करीत दोन समुदायात तेढ निर्माण करीत होती की नाही? खलिस्तानवाद्यांची ‘राज करेगा खालसा’ ही घोषणा राष्ट्रद्रोही होती की नाही? बलवंत सिंग विरुध्द पंजाब राज्य प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना असे म्हटले होते की ‘दोन व्यक्तींनी एक दोनदा आकस्मिक घोषणा दिल्या तर त्याचा अर्थ घोषणा देणाऱ्या व्यक्तींचा उद्देश द्वेष पसरवणे किंवा भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार भारत सरकारच्या विरोधात असंतोष प्रदर्शित करणे असा होऊ शकत नाही’.होय, मी संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या समर्थनार्थ जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दिलेल्या घोषणांनी अवस्थ झालो आहे. पण हे कृत्य म्हणजे राष्ट्रद्रोह होऊ शकतो का? पुरावा म्हणून सध्या जी अर्धवट ध्वनीचित्रफीत दाखवली जात आहे, तिच्यात काही विद्यार्थी (ते विद्यार्थी आहेत की नाही हे अजून पूर्णपणे माहीत नाही) भारत की बरबादी आणि अफझलचा मृत्यू हौतात्म्य असल्याची घोषणा देताना दिसतात. त्यातली भाषणे सरकारची निंदा करणारी होती पण ती त्या विद्यार्थ्यांना संभाव्य दहशतवादी किंवा काश्मीरच्या वेगळेपणाला सहानुभूती देणारे आहेत असे म्हणण्यासाठी पुरेसे आहेत का? ते जर हिंसेला प्रोत्साहन देत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण निव्वळ वैचारिक समर्थन दिले म्हणून त्यांना जिहादी म्हणणे किंवा त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप लावणे योग्य आहे का? त्याहून वाईट गोष्ट अशी की ज्या विद्यापीठाला अनेक प्रज्ञावंत लोकांची परंपरा आहे त्या विद्यापीठात समविचारी विद्यार्थी नाहीत म्हणून त्याला राष्ट्रद्रोही लोकांचा अड्डा म्हटले जात आहे. दुर्दैव असे की या वादाचे ध्रुवीकरण तीव्रतेने झाल्यामुळे विद्यापीठ आवारातील (फक्त भारतातील नव्हे तर जागतिक स्तरावरील सुद्धा) आणि काश्मीर खोऱ्यातील वादग्रस्त राजकारणाचा इतिहास समजून घेण्यात अपयश येत आहे. मी जिथे शिकलो त्या आॅक्सफर्ड विद्यापीठात १९९३ साली ‘हे सभागृह कुठल्याही अटीवर राजा आणि देश यांच्यासाठी युद्ध करणार नाही’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. विषयाच्या बाजूने प्रचंड बहुमत मिळाले आणि ब्रिटीश सरकार स्तंभित झाले. आॅक्सफर्डवर राष्ट्रद्रोही आणि कम्युनिस्ट लोकांचे ठिकाण अशी दूषणे लावली गेली. पण कुणावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला नाही. १९६० साली अमेरिकेतील विद्यापीठात व्हिएतनाम युद्धविरोधात निदर्शने गाजली होती, पण एकावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. जर अफझल गुरूला समर्थन देणे राष्ट्रद्रोह असेल तर जम्मू आणि काश्मीरातील भाजपा-पीडीपी सरकारचे निम्मे मंत्रिमंडळ दोषी धरले गेले पाहिजे. पीडीपीने तर अफझलच्या फाशीला न्यायदानाची विफलता म्हणत अफझलचा मृत देह त्याच्या परिवाराला देण्याची मागणी केली होती. जर काश्मिरी युवकाना अफझल बळी ठरवला गेला आहे असे वाटत असेल तर त्यांना कायदेशीररीत्या राजकीय चर्चेसाठी आवाहन केले पाहिजे. त्यांचा दृष्टीकोन उर्वरित राष्ट्राविषयी तिरस्करणीय आहे म्हणून त्यांना राष्ट्रद्रोही समजण्यात काय अर्थ आहे? असे असेल तर मग आजही ३० जानेवारीला संपूर्ण राष्ट्र महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहत असताना, नथुराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या हिंदू महासभेला राष्ट्रविरोधी संघटना का म्हणू नये? गांधींच्या खुन्याला राष्ट्रभक्त म्हणणाऱ्या भाजपा खासदार साक्षी महाराज यांचे काय? गोडसेंचे समर्थन किंवा उदात्तीकरण राष्ट्रविरोधी का म्हटले जाऊ नये? की राष्ट्रभक्तीची व्याख्या सत्ताधाऱ्यांच्या सोयीचीे असली पाहिजे? हे सर्व पाहाता, मला ढोंगी राष्ट्रभक्त म्हणवून घेण्यापेक्षा राष्ट्रविरोधी म्हणवून घेणे अधिक रास्त वाटेल. मी अभिमानी हिंदू आहे. तरीही मला गोमांस भक्षण आवडते. मी पत्रकार असल्याचा मला अभिमान असल्याने असहाय्य महिला पत्रकारांवर भारत मातेचे नाव घेऊन हल्ला करणाऱ्यांशी मी दोन हात करीन. (डिसेंबर १९९२मध्येसुद्धा महिला पत्रकारांवर हल्ला झाला होता). मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि म्हणून मला जवानांच्या बलिदानाचा, त्यागाचा आदर आहे. सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना इतरांपेक्षा जास्त वेतन मिळाले पाहिजे असेही मला वाटते. मी समलिंगी लोकांच्या हक्कांचे समर्थन करतो आणि मृत्यूदंडाचा विरोध करतो. जातीय दंगलीत रक्त सांडायला नको असेही मला वाटते. आणि हो, सार्वजनिक ठिकाणी अस्वस्थ करणारे सत्य मांडणे मला आवडते, तरीही माझा भारतीय राज्यघटनेवर प्रचंड विश्वास आहे. एवढे असल्यावरही मी राष्ट्रद्रोही ठरत असेल तर तेही मला मान्य आहे. मी देशद्रोही या दूषणास कंटाळलो असलो तरी मी माझी समजूत मला आदर्शवत मुष्टीयोद्धा महम्मद अली यांच्या उदाहरणाने काढून घेईन. त्यांना एकदा श्वेतवर्णीयांच्या उपाहारगृहात प्रवेश नाकारण्यात आला असता निषेध म्हणून त्यांनी त्यांचे सुवर्णपदक नदीत फेकून दिले. त्यांचे कृत्य त्यावेळी राष्ट्रद्रोहाचे ठरवून त्यांची आॅलिम्पिक पदके काढून घेण्यात आली. काही वर्षानंतर १९९६ साली त्यांच्या हातून अ‍ॅटलांटा आॅलिम्पिक ज्योत चेतवण्यात आली. तो त्या महान खेळाडूची माफी मागण्याचा अमेरिकेचा मार्ग होता. ताजा कलम- मागील आठवड्यात दिल्ली जिमखाना साहित्य संमेलनात मी असे सुचवले होते की भाषण स्वातंत्र्यात स्वत:ची बाजू मांडण्याचा अधिकार सामील केला पाहिजे, तोदेखील हिंसेला प्रवृत्त करणार नाही या मर्यादे पर्यंत. पण एक निवृत्त लष्करी अधिकारी माझ्यावर चिडले आणि ओरडले, ‘तुम्ही राष्ट्रद्रोही आहात, तुम्हाला इथेच ठेचले गेले पाहिजे’. जर जिमखाना क्लबसारख्या सभ्य वातावरणात सुद्धा इतक्या स्तराला जाऊन प्रतिक्रि या व्यक्त केली जात असेल तर ती साऱ्यांसाठीच एक चिंतेची बाब आहे.