शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

‘मी टू’ला हवे शासन कायद्याचे भक्कम बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 03:52 IST

उत्क्रांताच्या काळापासून ते आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल काळापर्यंत पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही.

- दिनेश कांबळेउत्क्रांताच्या काळापासून ते आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल काळापर्यंत पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. स्त्री म्हणजे भोगवस्तू होय हाच विचार आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीत रुजत आला आहे. आज स्त्री शिक्षणाने समृद्ध झाली आहे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाशी स्पर्धा करून ती आर्थिकदृष्ट्या पुरुषावर अवलंबून राहिलेली नाही.आतापर्यंत लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावरून बऱ्याच महिला संघटनांनी आवाज उठवला. महिला आयोगाची स्थापना झाली. महिला लेखकांनीसुद्धा आपल्या साहित्यातून आवाज उठवला. सरकार बदलले; पण शासन आणि न्यायालय स्तरावर कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत. विनयभंगापासून ते बलात्कार करून खुनापर्यंतच्या चौकशीमध्ये पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन स्तरावर ७५ टक्के पुरुष अधिकाºयांचा सहभाग असतो.आज स्वत:च्या पायावर उभी राहणारी स्त्री कोणत्याच क्षेत्रात सुरक्षित नाही. मग ते क्षेत्र सरकारी / खाजगी / मनोरंजन / खेळ / राजकीय असो. सरकारी सेवेत असणाºया महिलांना वेतनवाढ / बढती / बदली या भीतीपोटी त्या वरिष्ठ अधिकाºयाच्या लैंगिक शोषणास बळी पडतात. खाजगी क्षेत्रामध्ये बेरोजगारीची समस्या असल्यामुळे कामगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कामावरून काढून टाकण्याच्या / रोजगार जाण्याच्या भीतीपोटी महिलांना व्यवस्थापकाच्या लैंगिक शोषणास बळी पडावे लागते.शासन आणि न्यायालय स्तरावर महिलांसाठी स्वतंत्र कार्यालये जलदगतीने स्थापन केली पाहिजेत. कामाच्या ठिकाणी होणाºया लैंगिक शोषणासाठी स्वतंत्र कायदा केला पाहिजे. प्र्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष महिला कामगारांशी संपर्क साधून चौकशी केली पाहिजे. प्रत्येक कामाच्या ठिकाणी हेल्पलाइन नंबर असला पाहिजे. ज्या चित्रपटात गुन्हेगारी विश्वातील गुंतवणूक केली जाते त्याची चौकशी केली पाहिजे. परदेशात वास्तव्य करून राहणाºया आणि भारतातील चित्रपट व्यवसायामध्ये भलीमोठी गुंतवणूक करणाºया गुन्हेगारी विश्वातील म्होरक्यांच्या मुसक्या आवळून भारतात आणण्याची घोषणा करून सत्ता मिळवली़ परंतु सत्ता संपण्याचा काळ आला तरी ही घोषणा हवेतच राहिली.जगाच्या इतिहासामध्ये जेवढे राजे झाले त्यामध्ये शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या राज्यामध्ये स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला होता. त्यांच्या राज्यात स्त्री सुरक्षित होती. स्त्रियांवर अत्याचार करणाºयांचे महाराजांनी हात-पाय तोडले, तोफेच्या तोंडी दिले. त्या शिवाजी महाराजांच्या नावावर ज्यांनी पक्ष, संघटना काढल्या त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काय ठोस योजना केल्या? कोणती एखादी भक्कम संघटना उघडली? सत्ता मिळविण्यासाठीच फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर किती दिवस करायचा?ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट चित्रपटापासून ते आताच्या डिजिटल चित्रपटापर्यंत त्यांचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन. त्यांच्या तोडीचा एकही कलाकार आजही चित्रपट व्यवसायामध्ये नाही. बीग बी त्याच दलदलीत मोठे झाले; पण त्यांनी स्वत:वर कधी चिखल उडवून घेतला नाही. आजच्या चित्रपट व्यवसायातील प्रसिद्ध कलाकार अक्षयकुमार यांनी महिलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवूून भल्याभल्यांना चित्रपट सोडण्यास भाग पाडले.(सामाजिक कार्यकर्ता)

टॅग्स :Metoo Campaignमीटू