शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

धर्मापेक्षाही माणुसकी महत्त्वाची

By admin | Updated: April 14, 2016 02:45 IST

डॉ. आंबेडकर. १९५२ साली कोल्हापुरातील राजाराम कॉलेजातील कार्यक्रमात मला त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझ्या आजोळच्या आजीचे सख्खे भाऊ दत्तोबा दळवी (आर्टिस्ट) व डॉ. बाबासाहेब

- डॉ.डी.वाय.पाटीलडॉ. आंबेडकर. १९५२ साली कोल्हापुरातील राजाराम कॉलेजातील कार्यक्रमात मला त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझ्या आजोळच्या आजीचे सख्खे भाऊ दत्तोबा दळवी (आर्टिस्ट) व डॉ. बाबासाहेब यांच्यासोबत कॉलेजपासून बुधवार पेठेपर्यंत टांग्यातून आलो़ त्या दिवसाचे जेवण दत्तोबा दळवी यांच्या घरीच झाले. संध्याकाळी स्टेशनवर सोडण्यासाठी टांग्यातूनच जाण्याचे भाग्य लाभले. डॉ. बाबासाहेबांनी समाजाच्या सुधारणा-परिवर्तनाचे तत्त्वज्ञान शिकविले. भौतिक विकास हा व्यक्तीच्या प्रगतीशी निगडित असतो. स्वातंत्र्यासाठी देशात चळवळी सुरू असताना या महामानवास स्वातंत्र्याची एक वेगळीच संकल्पना घेऊन झगडावे लागत होते. ती म्हणजे मानवतेची संकल्पना होय! त्यामुळेच ते गौतम बुद्धांनी दिलेल्या तेजस्वी विचारांकडे आकर्षित होताना दिसून येतात. व्यक्तीकडून राष्ट्राच्या उन्नतीपर्यंत असणाऱ्या समस्यांचे निवारण करणारे उपाय कोणते आहेत याची प्रभावी जाण डॉ. बाबासाहेबांना होती. ते म्हणतात, ‘समाजाच्या जाती-जमातीत, गटातटात, वर्गावर्गात जो दुरावा आहे तो लोकशाहीच्या यशाला मारक ठरेल. कारण, लोकशाहीत प्रत्येकाला मग तो पीडित असो वा हक्क भोगणाऱ्या वर्गातील असो, प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे. जे सत्ता, सवलती, हक्क भोगतात ते जर वंचित, दलित समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावयास तयार नसतील तर ‘आहे रे व नाही रे’ या दोन वर्गातील तणाव वाढत जाईल. लोकशाही उद्ध्वस्त होईल. सर्व माणसे जन्मत: समानच आहेत. लोकोपयोगाच्या दृष्टीने त्यांच्या दर्जात फरक पडू शकेलही. पण एरवी त्यांचा समान दर्जा कायम राहिला पाहिजे’. डॉ. आंबेडकर यांना धर्मापेक्षाही माणुसकी अधिक महत्त्वाची वाटत होती. वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना लोकशाहीची फळे चाखायला मिळाली पाहिजेत हेच त्यांना अपेक्षित होते. स्वातंत्र्यासाठी देशात चळवळी सुरू असताना या महामानवास स्वातंत्र्याची एक वेगळीच संकल्पना घेऊन झगडावे लागत होते. ती म्हणजे मानवतेची संकल्पना होय! त्यांना धर्मापेक्षाही माणुसकी अधिक महत्त्वाची वाटत होती. वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना लोकशाहीची फळे चाखायला मिळाली पाहिजेत हेच त्यांना अपेक्षित होते.