शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

धर्मापेक्षाही माणुसकी महत्त्वाची

By admin | Updated: April 14, 2016 02:45 IST

डॉ. आंबेडकर. १९५२ साली कोल्हापुरातील राजाराम कॉलेजातील कार्यक्रमात मला त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझ्या आजोळच्या आजीचे सख्खे भाऊ दत्तोबा दळवी (आर्टिस्ट) व डॉ. बाबासाहेब

- डॉ.डी.वाय.पाटीलडॉ. आंबेडकर. १९५२ साली कोल्हापुरातील राजाराम कॉलेजातील कार्यक्रमात मला त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. त्यानंतर माझ्या आजोळच्या आजीचे सख्खे भाऊ दत्तोबा दळवी (आर्टिस्ट) व डॉ. बाबासाहेब यांच्यासोबत कॉलेजपासून बुधवार पेठेपर्यंत टांग्यातून आलो़ त्या दिवसाचे जेवण दत्तोबा दळवी यांच्या घरीच झाले. संध्याकाळी स्टेशनवर सोडण्यासाठी टांग्यातूनच जाण्याचे भाग्य लाभले. डॉ. बाबासाहेबांनी समाजाच्या सुधारणा-परिवर्तनाचे तत्त्वज्ञान शिकविले. भौतिक विकास हा व्यक्तीच्या प्रगतीशी निगडित असतो. स्वातंत्र्यासाठी देशात चळवळी सुरू असताना या महामानवास स्वातंत्र्याची एक वेगळीच संकल्पना घेऊन झगडावे लागत होते. ती म्हणजे मानवतेची संकल्पना होय! त्यामुळेच ते गौतम बुद्धांनी दिलेल्या तेजस्वी विचारांकडे आकर्षित होताना दिसून येतात. व्यक्तीकडून राष्ट्राच्या उन्नतीपर्यंत असणाऱ्या समस्यांचे निवारण करणारे उपाय कोणते आहेत याची प्रभावी जाण डॉ. बाबासाहेबांना होती. ते म्हणतात, ‘समाजाच्या जाती-जमातीत, गटातटात, वर्गावर्गात जो दुरावा आहे तो लोकशाहीच्या यशाला मारक ठरेल. कारण, लोकशाहीत प्रत्येकाला मग तो पीडित असो वा हक्क भोगणाऱ्या वर्गातील असो, प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे. जे सत्ता, सवलती, हक्क भोगतात ते जर वंचित, दलित समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावयास तयार नसतील तर ‘आहे रे व नाही रे’ या दोन वर्गातील तणाव वाढत जाईल. लोकशाही उद्ध्वस्त होईल. सर्व माणसे जन्मत: समानच आहेत. लोकोपयोगाच्या दृष्टीने त्यांच्या दर्जात फरक पडू शकेलही. पण एरवी त्यांचा समान दर्जा कायम राहिला पाहिजे’. डॉ. आंबेडकर यांना धर्मापेक्षाही माणुसकी अधिक महत्त्वाची वाटत होती. वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना लोकशाहीची फळे चाखायला मिळाली पाहिजेत हेच त्यांना अपेक्षित होते. स्वातंत्र्यासाठी देशात चळवळी सुरू असताना या महामानवास स्वातंत्र्याची एक वेगळीच संकल्पना घेऊन झगडावे लागत होते. ती म्हणजे मानवतेची संकल्पना होय! त्यांना धर्मापेक्षाही माणुसकी अधिक महत्त्वाची वाटत होती. वंचितांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना लोकशाहीची फळे चाखायला मिळाली पाहिजेत हेच त्यांना अपेक्षित होते.