शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

तरी साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाने त्याचे दर स्थिर राहतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 07:13 IST

याच भागात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड व तृणधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये सरासरी ८४.२० टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदाच्या मान्सूनचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुलनेने कमी पाऊस होतो. तो सध्या सरासरीपेक्षा अधिक आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड व तृणधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.स्वातंत्र्योत्तर भारतात २०२० हे वर्ष कदाचित सर्वांत कठीण आणि संकटाने घेरलेले असेल. कोविडचा प्रादुर्भाव थांबणार किंवा संपणारा नाही. परिणामी २४ मार्चपासून पाच महिन्यांच्या लॉकडाऊनने संपूर्ण अर्थव्यवस्था मंदावली आहे. व्यवहार ठप्प झालेत. उत्पादन वाढीवर परिणाम झाला असून, सरकारच्या महसुलापासून प्रत्येक कुटुंबाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. अशा संकटकाळी मान्सूनच्या पावसाने मात्र संपूर्ण भारतवर्ष चिंब करून टाकले आहे. सेवाक्षेत्र आणि आयटी उद्योगाची भरभराटी होण्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेची घडी नीट असेल का, या प्रश्नाचे उत्तर देताना मान्सूनचा पाऊस कसा होता, यावर सर्वकाही अवलंबून आहे. हा महत्त्वाचा निकष लावला जात होता. अर्थशास्त्रीय भाषेत या जर-तरच्या उत्तराला काही अर्थ नसतो. हे जरी खरे असले तरी ती वस्तुस्थिती होती. चालू हंगामात १ जूनपासूनच मान्सूनने वेळेवर आणि दमदार हजेरी लावली. जुलैचा मध्य पंधरवडा सोडला तर सतत पाऊस होतो आहे. बिहार, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यांत अतिरिक्त पावसाने थैमान घालून नद्यांना महापूर आला आहे. जम्मू-काश्मीर, उत्तरप्रदेश आणि केरळमध्ये सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस आहे. भात, सोयाबीन, कापूस, कांदा, तृणधान्ये पिकणाऱ्या मध्य आणि पश्चिम तसेच दक्षिण भारतात सरासरीपेक्षा १५ ते २९ टक्के पाऊस अधिक झाला आहे. मान्सूनचा पाऊस सरासरी समाधानकारक होणारे हे तिसरे वर्ष आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

मान्सूनच्या पावसाचे अर्थशास्त्रीय विश्लेषण आवश्यक असल्याने या विभागाने यावर्षी ५२५ ठिकाणी हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी आवश्यक माहिती जमविणारी केंद्रे उभारली आहेत. परिणामी, चालू वर्षी हवामानाचा अंदाज खरा ठरण्यास मदत होत आहे. १ जून ते २० आॅगस्टपर्यंत देशात सरासरी ८५१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ही अपेक्षित सरासरी ७२८.५ मि.मी. असते. महाराष्टÑात सुमारे १७ टक्के अधिक पाऊस झाला. यवतमाळ, गोंदिया आणि अकोला हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व तेहतीस जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस चालू वर्षी झाला. ही समाधानाची बाब आहे. कोविडमुळे लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प होत असताना मान्सूनच्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे की, शासकीय गोदामामध्ये दोन वर्षे पुरेल इतका धान्यसाठा आहे. चालू खरीप हंगाम आणि रब्बी हंगामातील सर्व पिके उत्तम येणार असल्याने बाजारात धान्याचा मुबलक पुरवठा होणार आहे. साखरही अतिरिक्त असताना येत्या हंगामात उसाचे अधिक उत्पादन अपेक्षित आहे. हा मोठा दिलासा राज्यकर्त्यांनादेखील आहे. आता झालेल्या पावसाने भूजल पातळी वाढणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामही उत्तम येण्यात मदत होणार आहे. महाराष्टÑातील सर्व धरणांमध्ये सरासरी ८४.२० टक्के पाणीसाठा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा होणाºया सातही धरणांत पुरेपूर साठा झाला आहे. या मान्सूनचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्टÑाच्या मराठवाडा व मध्य महाराष्टÑात तुलनेने कमी पाऊस होतो. तो सध्या सरासरीपेक्षा अधिक आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड व तृणधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे महाराष्टÑात तरी अतिरिक्त उत्पादन व त्याच्या हमीभावाचे गणित बिघडले तरी आश्चर्य वाटायला नको. हीच अवस्था पश्चिम महाराष्टÑातील उसाबाबत होणार आहे. उसाचा हमीभाव केंद्र सरकारने टनामागे शंभर रुपयांनी वाढविला असला, तरी साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाने त्याचे दर स्थिर राहतील का? हा प्रश्न भेडसावणार आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर मंदिरांपासून शाळा-महाविद्यालयांपर्यंत व व्यापार-हॉटेल्सपासून कारखानदारीपर्यंत सर्व काही बंद ठेवण्याची वेळ आली. त्या पार्श्वभूमीवर वेळेवर आणि नियमित पाऊस होत असल्याने शेतीची कामे चालू आहेत. भारताला अन्नधान्याची काळजी करण्याचे कारण पडणार नाही. धरणातील पाणीसाठा पूर्ण होत असल्याने पिण्याच्या पाण्याची तसेच बारमाही शेतीची काळजी निसर्गाने मिटविली आहे. कोविड रुग्णांच्या उपचारार्थ वाढता खर्च शासन तसेच जनता सोसत आहे. त्याला शेती उत्पादनाने छेद दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. निसर्गाने तरी सर्वांवर मात केली आहे. कोरोनावर मात करण्याचे आव्हान तुम्हा-आम्हा साऱ्यांवर आहे.