शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

भरवसा कसा ठेवावा?

By admin | Updated: February 15, 2016 03:32 IST

‘भारताचा आर्थिक पाया अत्यंत मजबूत आहे. जेव्हा संपूर्ण जग मंदीच्या भोवऱ्यात सापडले होते तेव्हाही या पायाला तडा गेला नव्हता आणि देशाचा वार्षिक वृद्धीदर कायम राखला गेला होता.

‘भारताचा आर्थिक पाया अत्यंत मजबूत आहे. जेव्हा संपूर्ण जग मंदीच्या भोवऱ्यात सापडले होते तेव्हाही या पायाला तडा गेला नव्हता आणि देशाचा वार्षिक वृद्धीदर कायम राखला गेला होता. भांडवली बाजार हा एकप्रकारचा सट्टा आहे, त्यामुळे तिथे होणाऱ्या हालचाली किंवा पडझडी म्हणजे देशाची आर्थिक स्थिती मोजण्याचा मापदंड नव्हे’ असे आजवरचा देशाचा प्रत्येक अर्थमंत्री सांगत आला व ते ऐकून लोकांचे कानही किटले. विद्यमान अर्थमंत्री यांनीही आता त्यांच्या पूर्वसुरींची री ओढली आहे. देशाच्या मजबूत आर्थिक पायावर भरवसा आणि विश्वास ठेवावा असे आवाहनही केले आहे. पण तो कसा ठेवायचा याचे मार्गदर्शन मात्र केले नाही. देशातील समस्त सरकारी बँकांनी बड्या कर्जदारांची अब्जावधी रुपयांची कर्जे कशी वाऱ्यावर सोडून दिली हे गेल्याच आठवड्यात दिसून आले. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील या बँकांच्या प्रगतीचे (?) जे आकडे प्रसिद्ध झाले आणि भांडवली बाजारात जो ‘रक्तपात’ झाला त्यापेक्षा चौथ्या आणि अखेरच्या तिमाहीतील प्रगती अधिकच गंभीर असेल असा संबंधित क्षेत्राचा आडाखा आहे. गेल्या आर्थिक वर्षाची तुलना करायची तर बारा महिन्यात सरकारी बँकांची बुडीत खाती २.६७ लाख कोटींच्या घरातील होती, तर यंदा नऊ महिन्यांमधील हा आकडा ३.०१ लाख कोटींच्या घरात गेला आहे. सामान्य आणि मध्यमवर्गीय ऋणकोंच्या पाठीमागे हात धुऊन लागणाऱ्या आणि कर्जाचा त्यांचा एखादा हप्ता जरी चुकला तरी त्यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारणाऱ्या सरकारी बँका सशक्त करण्याच्या दृष्टीने लवकरच महत्त्वाची पावले उचलली जाणार असल्याचे जेटली यांनी मोघमपणे म्हटले आहे आणि त्यावर लोकांनी विश्वास ठेवावा असे आवाहनही केले आहे. पण या मोघमपणावर कोण आणि कसा भरवसा ठेवणार?