शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

हस्ताक्षर कसे असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:25 IST

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या एकोणिसाव्या दशकात लेखनक्रिया या प्रकरणात, हस्ताक्षर कसे असावे याचे सुंदर विवेचन केले आहे.

- डॉ. रामचंद्र देखणे समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या एकोणिसाव्या दशकात लेखनक्रिया या प्रकरणात, हस्ताक्षर कसे असावे याचे सुंदर विवेचन केले आहे.वाटोळे सरळे मोकळे।वोतले मसीचे काळे।कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळे।मुक्तमाळा जैशा।। (दासबोध) काळीभोर मसी म्हणजे शाई करून अक्षर वाटोळे, सरळ व मोकळे लिहावे. एकसारख्या लिहिलेल्या ओळी जणू मोत्यांच्या माळा वाटाव्यात इतके हस्ताक्षर सुंदर असावे. सुधड, सरळ आणि ठसठशीत मोकळे अक्षर, काना, मात्रा वेलांट्यांच्या लेखनातील स्पष्टता, दोन ओळीतील पुरेसे अंतर, अक्षरांचे आणि ओळीतील अंतरांचे सर्वत्र सारखेपण, ओळीमधल्या आणि समासातल्या शोधांचा अभाव, कागद झडून गेल्यावर मजकुराला बाधा येऊ नये अशा दक्षतेने चारही बाजूंना सोडलेल्या कोऱ्या जागा या सर्वांचे सूक्ष्मतेने चिंतन करून समर्थांनी केवळ हस्ताक्षर आणि लेखनक्रिया या विषयी एक समास लिहिला आहे. शब्दांबरोबर अर्थ, अर्थाबरोबर भाव आणि भावाबरोबरच उच्चारांची शुद्धता येण्यासाठी लेखनक्रिया शुद्ध आणि स्वच्छ असायला हवी. आजही मातृभाषा मराठी असलेल्या आणि त्याच भाषेतून पदवी घेतलेल्या अनेकांना शुद्ध मराठी लिहिता येत नाही. मराठी भाषेसारखेच मराठी हस्ताक्षरही ठसठशीत, स्पष्ट आणि सुंदर असायला हवे. हस्ताक्षराचा आणि लेखनक्रियेचा काही संबंध नाही, असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की हस्ताक्षर हाच अंतर्मनाचा आरसा आहे. असेही म्हणतात की, हस्ताक्षरावरून मन कळते, वळणदार अक्षर येण्यासाठी वळणदार मन असावे लागते. मनाला आणि अक्षरालाही संस्कारातूनच वळणदारपणा येत असतो. पूर्वीच्या काळी हस्ताक्षर सुधारण्यासाठी शाळेत गुरुजी खूप परिश्रम करून घेत असत. ज्ञानेश्वरीमध्येही माऊलींनी संदर्भ दिला आहे. ‘‘हे बहु असो पंडितु।धरोनि बाळकाचा हातु।वोळी लिही व्यक्तु। आपणची।।’’ (ज्ञानेश्वरी. १३-२०८) मुलाचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी पंतोजी म्हणजे शिक्षक मुलांचा हात धरून त्याच्याकडून सुंदर हस्ताक्षर लिहून घेत असत. पूर्वीच्या काळी हस्ताक्षर सुधारण्यासाठी बोरुने लिहिण्याची एक शुद्धलेखन पुस्तिका असायची. त्यात वरची ओळ छापलेली असायची आणि त्याप्रमाणे वळणदार पद्धतीने खालच्या ओळी या एकेका अक्षराला घटवून लिहिण्यासाठी जागा असायची. त्या पुस्तिकेच्या मागच्या पानावर म. गांधी काहीतरी लिहित आहेत, असे चित्र होते आणि त्या चित्राच्या खाली गांधीजींचे हस्ताक्षराविषयीचे विचार होते. त्यात त्यांनी लिहिले होते, शिक्षण, मन आणि हस्ताक्षर यांचा किती सुंदर समन्वय आहे, ते यावरून लक्षात येईल.