शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

हस्ताक्षर कसे असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:25 IST

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या एकोणिसाव्या दशकात लेखनक्रिया या प्रकरणात, हस्ताक्षर कसे असावे याचे सुंदर विवेचन केले आहे.

- डॉ. रामचंद्र देखणे समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या एकोणिसाव्या दशकात लेखनक्रिया या प्रकरणात, हस्ताक्षर कसे असावे याचे सुंदर विवेचन केले आहे.वाटोळे सरळे मोकळे।वोतले मसीचे काळे।कुळकुळीत वोळी चालिल्या ढाळे।मुक्तमाळा जैशा।। (दासबोध) काळीभोर मसी म्हणजे शाई करून अक्षर वाटोळे, सरळ व मोकळे लिहावे. एकसारख्या लिहिलेल्या ओळी जणू मोत्यांच्या माळा वाटाव्यात इतके हस्ताक्षर सुंदर असावे. सुधड, सरळ आणि ठसठशीत मोकळे अक्षर, काना, मात्रा वेलांट्यांच्या लेखनातील स्पष्टता, दोन ओळीतील पुरेसे अंतर, अक्षरांचे आणि ओळीतील अंतरांचे सर्वत्र सारखेपण, ओळीमधल्या आणि समासातल्या शोधांचा अभाव, कागद झडून गेल्यावर मजकुराला बाधा येऊ नये अशा दक्षतेने चारही बाजूंना सोडलेल्या कोऱ्या जागा या सर्वांचे सूक्ष्मतेने चिंतन करून समर्थांनी केवळ हस्ताक्षर आणि लेखनक्रिया या विषयी एक समास लिहिला आहे. शब्दांबरोबर अर्थ, अर्थाबरोबर भाव आणि भावाबरोबरच उच्चारांची शुद्धता येण्यासाठी लेखनक्रिया शुद्ध आणि स्वच्छ असायला हवी. आजही मातृभाषा मराठी असलेल्या आणि त्याच भाषेतून पदवी घेतलेल्या अनेकांना शुद्ध मराठी लिहिता येत नाही. मराठी भाषेसारखेच मराठी हस्ताक्षरही ठसठशीत, स्पष्ट आणि सुंदर असायला हवे. हस्ताक्षराचा आणि लेखनक्रियेचा काही संबंध नाही, असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की हस्ताक्षर हाच अंतर्मनाचा आरसा आहे. असेही म्हणतात की, हस्ताक्षरावरून मन कळते, वळणदार अक्षर येण्यासाठी वळणदार मन असावे लागते. मनाला आणि अक्षरालाही संस्कारातूनच वळणदारपणा येत असतो. पूर्वीच्या काळी हस्ताक्षर सुधारण्यासाठी शाळेत गुरुजी खूप परिश्रम करून घेत असत. ज्ञानेश्वरीमध्येही माऊलींनी संदर्भ दिला आहे. ‘‘हे बहु असो पंडितु।धरोनि बाळकाचा हातु।वोळी लिही व्यक्तु। आपणची।।’’ (ज्ञानेश्वरी. १३-२०८) मुलाचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी पंतोजी म्हणजे शिक्षक मुलांचा हात धरून त्याच्याकडून सुंदर हस्ताक्षर लिहून घेत असत. पूर्वीच्या काळी हस्ताक्षर सुधारण्यासाठी बोरुने लिहिण्याची एक शुद्धलेखन पुस्तिका असायची. त्यात वरची ओळ छापलेली असायची आणि त्याप्रमाणे वळणदार पद्धतीने खालच्या ओळी या एकेका अक्षराला घटवून लिहिण्यासाठी जागा असायची. त्या पुस्तिकेच्या मागच्या पानावर म. गांधी काहीतरी लिहित आहेत, असे चित्र होते आणि त्या चित्राच्या खाली गांधीजींचे हस्ताक्षराविषयीचे विचार होते. त्यात त्यांनी लिहिले होते, शिक्षण, मन आणि हस्ताक्षर यांचा किती सुंदर समन्वय आहे, ते यावरून लक्षात येईल.