शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात?

By किरण अग्रवाल | Updated: July 26, 2023 09:07 IST

अपघातसमयी मदतीस धावणारे असोत, की पूरपाण्यातून जीव वाचवणारे; सामान्य लोकांनी आणि यंत्रणांनीही त्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी!

किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

हल्ली माणुसकी दुरापास्त होत चालली आहे, असा नकारात्मक सूर सर्वत्र आळवला जाताना दिसतो. परंतु, जी काही थोड्याफार प्रमाणात माणुसकी शिल्लक आहे, तिला अधिक वाढविण्यासाठी व्यक्ती, संस्था व यंत्रणा म्हणून आपण काय प्रयत्न करतो, असा प्रश्न केला तर उत्तर सापडणे अवघड! विशेषत: अपघात व नैसर्गिक संकटांच्या प्रसंगी जे स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीसाठी धावून येतात, अशांची कोणती वा कसलीच दखल घेतली जाणार नसेल, तर माणुसकी वाढीस कशी लागेल? 

प्रश्न अतिशय साधा आहे. परंतु,  सत्कार्य करणाऱ्यांची पाठ थोपटण्यात आपल्याकडून होणाऱ्या ‘कंजूस दुर्लक्षा”कडे लक्ष वेधणारा आहे.  संकटकाळी धावून येणाऱ्याबद्दल कौतुकाचे दोन शब्दही बोलले जाणार नसतील तर मुळात माणुसकीबद्दलच प्रश्न उपस्थित होतो! संवेदनाहीनपणा वाढीस लागलेल्या आजच्या काळात कळवळा वा करूणेचा प्रत्यय अपेक्षित असेल तर या साध्या गोष्टीकडे समाजाने व यंत्रणांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. 

सध्या पाणी-पावसाचे दिवस आहेत. जागोजागी नदी, नाल्यांना पूर आले असून, काही ठिकाणी लहान मुले नाल्याच्या पुरात वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशावेळी जिवाची बाजी लावत वाहून गेलेल्यांना शोधून काढणे हे खूप मुश्किलीचे असते. विहीर किंवा तलावातील संथ पाण्यात पोहणे वेगळे आणि पुराच्या पाण्यात पोहून मदतकार्य करणे वेगळे. सरावाचा, कौशल्याचा व धाडसाचाही अशावेळी कस लागतो. पट्टीचे पोहणारे ही जोखीम स्वीकारतात व वाहून गेलेल्यांना शोधून काढतात. पुरात अडकलेल्यांनाही सुखरूप बाहेर काढले जाते. अशा जीवरक्षकांसाठी कितीदा टाळ्या किंवा थाळ्या वाजतात?

अलीकडे रस्ता अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात मोठा अपघात होऊन २५ प्रवाशांना जीव गमवावा लागला. यात अपघातग्रस्त खासगी बस जळत असताना मदतीला न थांबता पुढे निघून जाणारे काही होते, अशी आपबिती सांगितली गेली. ते खरेच आहे. पण, घटनास्थळाजवळील पिंपळखुटा व सिंदखेड राजातील अनेक जणांनी मदतीसाठी धाव घेऊन आपल्याकडून शक्य ते सर्व काही केले.  नुकतीच सप्तशृंग गडाच्या मार्गावर एक बस सुमारे चारशे फूट दरीत घसरली. यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला व २२ प्रवासी जखमी झाले. यावेळी तेथील नांदुरीचे गावकरी तातडीने मदतीस धावून गेले होते. अशी इतरही काही उदाहरणे देता येतील, की ज्यात माणुसकी धावून जाताना दिसली. परंतु, ही समयसुचकता दाखविणाऱ्या व मदत करणाऱ्यांची कुठे, काय दखल घेतली गेली? अलीकडेच नागपूर-भुसावळ मार्गावर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरनजीक पावसाच्या पाण्यात रेल्वे रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याचे निदर्शनास आल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी तेथून जाणाऱ्या एका पॅसेंजर गाडीला थांबविले. हे झाले नसते तर कदाचित मोठा अपघात घडला असता. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळल्यावर अनेक स्वयंसेवक धावून गेले होते. अशा साऱ्या घटनांमध्ये कर्तव्यदत्त जबाबदारीखेरीज स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी धावून जाणाऱ्यांचीही कुठेतरी नोंद घेतली जावी, जेणेकरून चांगल्या कामासाठी पुढे येणाऱ्यांना बळ लाभेल. 

असे काही घडले की, फोटो काढण्यात किंवा व्हिडीओ शूट करण्यात धन्यता मानणारे अधिक असतात. पण,  अशाही स्थितीत माणुसकीधर्माला जागून मदतीला धावणारे काही जण पुढे येतात, ज्यांची दखल शासन-प्रशासनाकडून घेतली जाणे गरजेचे वाटते. अपवादात्मक प्रमाणात काही ठिकाणी ते होतेही. परंतु, इतरांवर ते परिणामकारक ठरेल अशी ती दखल असतेच असे नाही. आपत्ती निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात संबंधित यंत्रणांचे साहित्य आदी खर्चाचा मोठा समावेश असतो. पण, याखेरीज ऐनवेळी मदतीस धावणाऱ्यांचा गौरव, त्यांच्यासाठीही साहित्य व विमासारख्या बाबींची तरतूद केली गेली तर ते अधिक हिरीरीने मदतीस धावतील. माणुसकी धर्मावरील विश्वास वाढवण्यासही ते उपयोगी ठरेल!