शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात?

By किरण अग्रवाल | Updated: July 26, 2023 09:07 IST

अपघातसमयी मदतीस धावणारे असोत, की पूरपाण्यातून जीव वाचवणारे; सामान्य लोकांनी आणि यंत्रणांनीही त्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी!

किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

हल्ली माणुसकी दुरापास्त होत चालली आहे, असा नकारात्मक सूर सर्वत्र आळवला जाताना दिसतो. परंतु, जी काही थोड्याफार प्रमाणात माणुसकी शिल्लक आहे, तिला अधिक वाढविण्यासाठी व्यक्ती, संस्था व यंत्रणा म्हणून आपण काय प्रयत्न करतो, असा प्रश्न केला तर उत्तर सापडणे अवघड! विशेषत: अपघात व नैसर्गिक संकटांच्या प्रसंगी जे स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीसाठी धावून येतात, अशांची कोणती वा कसलीच दखल घेतली जाणार नसेल, तर माणुसकी वाढीस कशी लागेल? 

प्रश्न अतिशय साधा आहे. परंतु,  सत्कार्य करणाऱ्यांची पाठ थोपटण्यात आपल्याकडून होणाऱ्या ‘कंजूस दुर्लक्षा”कडे लक्ष वेधणारा आहे.  संकटकाळी धावून येणाऱ्याबद्दल कौतुकाचे दोन शब्दही बोलले जाणार नसतील तर मुळात माणुसकीबद्दलच प्रश्न उपस्थित होतो! संवेदनाहीनपणा वाढीस लागलेल्या आजच्या काळात कळवळा वा करूणेचा प्रत्यय अपेक्षित असेल तर या साध्या गोष्टीकडे समाजाने व यंत्रणांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. 

सध्या पाणी-पावसाचे दिवस आहेत. जागोजागी नदी, नाल्यांना पूर आले असून, काही ठिकाणी लहान मुले नाल्याच्या पुरात वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशावेळी जिवाची बाजी लावत वाहून गेलेल्यांना शोधून काढणे हे खूप मुश्किलीचे असते. विहीर किंवा तलावातील संथ पाण्यात पोहणे वेगळे आणि पुराच्या पाण्यात पोहून मदतकार्य करणे वेगळे. सरावाचा, कौशल्याचा व धाडसाचाही अशावेळी कस लागतो. पट्टीचे पोहणारे ही जोखीम स्वीकारतात व वाहून गेलेल्यांना शोधून काढतात. पुरात अडकलेल्यांनाही सुखरूप बाहेर काढले जाते. अशा जीवरक्षकांसाठी कितीदा टाळ्या किंवा थाळ्या वाजतात?

अलीकडे रस्ता अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात मोठा अपघात होऊन २५ प्रवाशांना जीव गमवावा लागला. यात अपघातग्रस्त खासगी बस जळत असताना मदतीला न थांबता पुढे निघून जाणारे काही होते, अशी आपबिती सांगितली गेली. ते खरेच आहे. पण, घटनास्थळाजवळील पिंपळखुटा व सिंदखेड राजातील अनेक जणांनी मदतीसाठी धाव घेऊन आपल्याकडून शक्य ते सर्व काही केले.  नुकतीच सप्तशृंग गडाच्या मार्गावर एक बस सुमारे चारशे फूट दरीत घसरली. यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला व २२ प्रवासी जखमी झाले. यावेळी तेथील नांदुरीचे गावकरी तातडीने मदतीस धावून गेले होते. अशी इतरही काही उदाहरणे देता येतील, की ज्यात माणुसकी धावून जाताना दिसली. परंतु, ही समयसुचकता दाखविणाऱ्या व मदत करणाऱ्यांची कुठे, काय दखल घेतली गेली? अलीकडेच नागपूर-भुसावळ मार्गावर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरनजीक पावसाच्या पाण्यात रेल्वे रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याचे निदर्शनास आल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी तेथून जाणाऱ्या एका पॅसेंजर गाडीला थांबविले. हे झाले नसते तर कदाचित मोठा अपघात घडला असता. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळल्यावर अनेक स्वयंसेवक धावून गेले होते. अशा साऱ्या घटनांमध्ये कर्तव्यदत्त जबाबदारीखेरीज स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी धावून जाणाऱ्यांचीही कुठेतरी नोंद घेतली जावी, जेणेकरून चांगल्या कामासाठी पुढे येणाऱ्यांना बळ लाभेल. 

असे काही घडले की, फोटो काढण्यात किंवा व्हिडीओ शूट करण्यात धन्यता मानणारे अधिक असतात. पण,  अशाही स्थितीत माणुसकीधर्माला जागून मदतीला धावणारे काही जण पुढे येतात, ज्यांची दखल शासन-प्रशासनाकडून घेतली जाणे गरजेचे वाटते. अपवादात्मक प्रमाणात काही ठिकाणी ते होतेही. परंतु, इतरांवर ते परिणामकारक ठरेल अशी ती दखल असतेच असे नाही. आपत्ती निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात संबंधित यंत्रणांचे साहित्य आदी खर्चाचा मोठा समावेश असतो. पण, याखेरीज ऐनवेळी मदतीस धावणाऱ्यांचा गौरव, त्यांच्यासाठीही साहित्य व विमासारख्या बाबींची तरतूद केली गेली तर ते अधिक हिरीरीने मदतीस धावतील. माणुसकी धर्मावरील विश्वास वाढवण्यासही ते उपयोगी ठरेल!