शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात?

By किरण अग्रवाल | Updated: July 26, 2023 09:07 IST

अपघातसमयी मदतीस धावणारे असोत, की पूरपाण्यातून जीव वाचवणारे; सामान्य लोकांनी आणि यंत्रणांनीही त्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी!

किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

हल्ली माणुसकी दुरापास्त होत चालली आहे, असा नकारात्मक सूर सर्वत्र आळवला जाताना दिसतो. परंतु, जी काही थोड्याफार प्रमाणात माणुसकी शिल्लक आहे, तिला अधिक वाढविण्यासाठी व्यक्ती, संस्था व यंत्रणा म्हणून आपण काय प्रयत्न करतो, असा प्रश्न केला तर उत्तर सापडणे अवघड! विशेषत: अपघात व नैसर्गिक संकटांच्या प्रसंगी जे स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीसाठी धावून येतात, अशांची कोणती वा कसलीच दखल घेतली जाणार नसेल, तर माणुसकी वाढीस कशी लागेल? 

प्रश्न अतिशय साधा आहे. परंतु,  सत्कार्य करणाऱ्यांची पाठ थोपटण्यात आपल्याकडून होणाऱ्या ‘कंजूस दुर्लक्षा”कडे लक्ष वेधणारा आहे.  संकटकाळी धावून येणाऱ्याबद्दल कौतुकाचे दोन शब्दही बोलले जाणार नसतील तर मुळात माणुसकीबद्दलच प्रश्न उपस्थित होतो! संवेदनाहीनपणा वाढीस लागलेल्या आजच्या काळात कळवळा वा करूणेचा प्रत्यय अपेक्षित असेल तर या साध्या गोष्टीकडे समाजाने व यंत्रणांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. 

सध्या पाणी-पावसाचे दिवस आहेत. जागोजागी नदी, नाल्यांना पूर आले असून, काही ठिकाणी लहान मुले नाल्याच्या पुरात वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशावेळी जिवाची बाजी लावत वाहून गेलेल्यांना शोधून काढणे हे खूप मुश्किलीचे असते. विहीर किंवा तलावातील संथ पाण्यात पोहणे वेगळे आणि पुराच्या पाण्यात पोहून मदतकार्य करणे वेगळे. सरावाचा, कौशल्याचा व धाडसाचाही अशावेळी कस लागतो. पट्टीचे पोहणारे ही जोखीम स्वीकारतात व वाहून गेलेल्यांना शोधून काढतात. पुरात अडकलेल्यांनाही सुखरूप बाहेर काढले जाते. अशा जीवरक्षकांसाठी कितीदा टाळ्या किंवा थाळ्या वाजतात?

अलीकडे रस्ता अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात मोठा अपघात होऊन २५ प्रवाशांना जीव गमवावा लागला. यात अपघातग्रस्त खासगी बस जळत असताना मदतीला न थांबता पुढे निघून जाणारे काही होते, अशी आपबिती सांगितली गेली. ते खरेच आहे. पण, घटनास्थळाजवळील पिंपळखुटा व सिंदखेड राजातील अनेक जणांनी मदतीसाठी धाव घेऊन आपल्याकडून शक्य ते सर्व काही केले.  नुकतीच सप्तशृंग गडाच्या मार्गावर एक बस सुमारे चारशे फूट दरीत घसरली. यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला व २२ प्रवासी जखमी झाले. यावेळी तेथील नांदुरीचे गावकरी तातडीने मदतीस धावून गेले होते. अशी इतरही काही उदाहरणे देता येतील, की ज्यात माणुसकी धावून जाताना दिसली. परंतु, ही समयसुचकता दाखविणाऱ्या व मदत करणाऱ्यांची कुठे, काय दखल घेतली गेली? अलीकडेच नागपूर-भुसावळ मार्गावर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरनजीक पावसाच्या पाण्यात रेल्वे रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याचे निदर्शनास आल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी तेथून जाणाऱ्या एका पॅसेंजर गाडीला थांबविले. हे झाले नसते तर कदाचित मोठा अपघात घडला असता. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळल्यावर अनेक स्वयंसेवक धावून गेले होते. अशा साऱ्या घटनांमध्ये कर्तव्यदत्त जबाबदारीखेरीज स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी धावून जाणाऱ्यांचीही कुठेतरी नोंद घेतली जावी, जेणेकरून चांगल्या कामासाठी पुढे येणाऱ्यांना बळ लाभेल. 

असे काही घडले की, फोटो काढण्यात किंवा व्हिडीओ शूट करण्यात धन्यता मानणारे अधिक असतात. पण,  अशाही स्थितीत माणुसकीधर्माला जागून मदतीला धावणारे काही जण पुढे येतात, ज्यांची दखल शासन-प्रशासनाकडून घेतली जाणे गरजेचे वाटते. अपवादात्मक प्रमाणात काही ठिकाणी ते होतेही. परंतु, इतरांवर ते परिणामकारक ठरेल अशी ती दखल असतेच असे नाही. आपत्ती निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात संबंधित यंत्रणांचे साहित्य आदी खर्चाचा मोठा समावेश असतो. पण, याखेरीज ऐनवेळी मदतीस धावणाऱ्यांचा गौरव, त्यांच्यासाठीही साहित्य व विमासारख्या बाबींची तरतूद केली गेली तर ते अधिक हिरीरीने मदतीस धावतील. माणुसकी धर्मावरील विश्वास वाढवण्यासही ते उपयोगी ठरेल!