शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

संकटात धावून येणाऱ्यांसाठी कितीदा टाळ्या, थाळ्या वाजतात?

By किरण अग्रवाल | Updated: July 26, 2023 09:07 IST

अपघातसमयी मदतीस धावणारे असोत, की पूरपाण्यातून जीव वाचवणारे; सामान्य लोकांनी आणि यंत्रणांनीही त्यांची योग्य ती दखल घ्यायला हवी!

किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, लोकमत, अकोला

हल्ली माणुसकी दुरापास्त होत चालली आहे, असा नकारात्मक सूर सर्वत्र आळवला जाताना दिसतो. परंतु, जी काही थोड्याफार प्रमाणात माणुसकी शिल्लक आहे, तिला अधिक वाढविण्यासाठी व्यक्ती, संस्था व यंत्रणा म्हणून आपण काय प्रयत्न करतो, असा प्रश्न केला तर उत्तर सापडणे अवघड! विशेषत: अपघात व नैसर्गिक संकटांच्या प्रसंगी जे स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीसाठी धावून येतात, अशांची कोणती वा कसलीच दखल घेतली जाणार नसेल, तर माणुसकी वाढीस कशी लागेल? 

प्रश्न अतिशय साधा आहे. परंतु,  सत्कार्य करणाऱ्यांची पाठ थोपटण्यात आपल्याकडून होणाऱ्या ‘कंजूस दुर्लक्षा”कडे लक्ष वेधणारा आहे.  संकटकाळी धावून येणाऱ्याबद्दल कौतुकाचे दोन शब्दही बोलले जाणार नसतील तर मुळात माणुसकीबद्दलच प्रश्न उपस्थित होतो! संवेदनाहीनपणा वाढीस लागलेल्या आजच्या काळात कळवळा वा करूणेचा प्रत्यय अपेक्षित असेल तर या साध्या गोष्टीकडे समाजाने व यंत्रणांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. 

सध्या पाणी-पावसाचे दिवस आहेत. जागोजागी नदी, नाल्यांना पूर आले असून, काही ठिकाणी लहान मुले नाल्याच्या पुरात वाहून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अशावेळी जिवाची बाजी लावत वाहून गेलेल्यांना शोधून काढणे हे खूप मुश्किलीचे असते. विहीर किंवा तलावातील संथ पाण्यात पोहणे वेगळे आणि पुराच्या पाण्यात पोहून मदतकार्य करणे वेगळे. सरावाचा, कौशल्याचा व धाडसाचाही अशावेळी कस लागतो. पट्टीचे पोहणारे ही जोखीम स्वीकारतात व वाहून गेलेल्यांना शोधून काढतात. पुरात अडकलेल्यांनाही सुखरूप बाहेर काढले जाते. अशा जीवरक्षकांसाठी कितीदा टाळ्या किंवा थाळ्या वाजतात?

अलीकडे रस्ता अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात मोठा अपघात होऊन २५ प्रवाशांना जीव गमवावा लागला. यात अपघातग्रस्त खासगी बस जळत असताना मदतीला न थांबता पुढे निघून जाणारे काही होते, अशी आपबिती सांगितली गेली. ते खरेच आहे. पण, घटनास्थळाजवळील पिंपळखुटा व सिंदखेड राजातील अनेक जणांनी मदतीसाठी धाव घेऊन आपल्याकडून शक्य ते सर्व काही केले.  नुकतीच सप्तशृंग गडाच्या मार्गावर एक बस सुमारे चारशे फूट दरीत घसरली. यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला व २२ प्रवासी जखमी झाले. यावेळी तेथील नांदुरीचे गावकरी तातडीने मदतीस धावून गेले होते. अशी इतरही काही उदाहरणे देता येतील, की ज्यात माणुसकी धावून जाताना दिसली. परंतु, ही समयसुचकता दाखविणाऱ्या व मदत करणाऱ्यांची कुठे, काय दखल घेतली गेली? अलीकडेच नागपूर-भुसावळ मार्गावर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरनजीक पावसाच्या पाण्यात रेल्वे रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याचे निदर्शनास आल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी तेथून जाणाऱ्या एका पॅसेंजर गाडीला थांबविले. हे झाले नसते तर कदाचित मोठा अपघात घडला असता. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळल्यावर अनेक स्वयंसेवक धावून गेले होते. अशा साऱ्या घटनांमध्ये कर्तव्यदत्त जबाबदारीखेरीज स्वयंस्फूर्तीने मदतीसाठी धावून जाणाऱ्यांचीही कुठेतरी नोंद घेतली जावी, जेणेकरून चांगल्या कामासाठी पुढे येणाऱ्यांना बळ लाभेल. 

असे काही घडले की, फोटो काढण्यात किंवा व्हिडीओ शूट करण्यात धन्यता मानणारे अधिक असतात. पण,  अशाही स्थितीत माणुसकीधर्माला जागून मदतीला धावणारे काही जण पुढे येतात, ज्यांची दखल शासन-प्रशासनाकडून घेतली जाणे गरजेचे वाटते. अपवादात्मक प्रमाणात काही ठिकाणी ते होतेही. परंतु, इतरांवर ते परिणामकारक ठरेल अशी ती दखल असतेच असे नाही. आपत्ती निवारणासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यात संबंधित यंत्रणांचे साहित्य आदी खर्चाचा मोठा समावेश असतो. पण, याखेरीज ऐनवेळी मदतीस धावणाऱ्यांचा गौरव, त्यांच्यासाठीही साहित्य व विमासारख्या बाबींची तरतूद केली गेली तर ते अधिक हिरीरीने मदतीस धावतील. माणुसकी धर्मावरील विश्वास वाढवण्यासही ते उपयोगी ठरेल!