शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

औरंगाबादकरांच्या सहनशीलतेचे कौतुक करावे ते किती?

By गजानन दिवाण | Updated: March 10, 2018 00:48 IST

अन्याय करणारा जेवढा जबाबदार तेवढाच जबाबदार ते सहन करणारा देखील असतो. गेल्या २२ दिवसांपासून औरंगाबादेत कचरा कोंडी निर्माण झाली आहे. सर्वसामान्य औरंगाबादकरांना याचे काहीच सोयरसूतक नाही. घरातला कचरा बाहेर जातोय बस्स. तो गल्लीतच रस्त्यावर पडला काय किंवा शेजारच्या गल्लीत पडला काय? प्रशासन आणि पुढाºयांना ‘हे असे का’ म्हणण्याची हिंमत कोणी दाखवली नाही.

सध्या व्यक्त होण्यासाठी साधनांची कमी नाही. सोशल मीडियाने अनेक पर्याय दिले आहेत त्यासाठी. यावर कोण किती कामाचे व्यक्त होतो हा भाग निराळा. गावच्या सरपंचापासून ते अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल आम्ही व्यक्त होतोच की. त्याने काय बोलायला पाहिजे, कसे वागायला पाहिजे याचे सल्ले देत असतो. या विषयांच्या यादीत औरंगाबादेतील कचरा दिसला नाही, तो भाग वेगळा. सर्वसामान्य औरंगाबादकर यावर व्यक्त झालाच नाही. ना कुठल्या संघटनेने पत्रक काढले, ना कुठले उपोषण-आंदोलन झाले. साधा निषेधही कुणाला करावासा वाटला नाही. अपवाद काय तो एकदोन औरंगाबादकरांचा. त्यांच्याच सोशल मीडियाच्या वॉलवर हा प्रश्न जिवंत दिसला. नारेगावकर-मिटमट्यातील नागरिकांनी विरोध केला म्हणून तो मंत्रालयात पोहोचला.स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगात निघालेले किंवा तसे भासविले जाणारे औरंगाबाद शहर सध्या दुर्गंधीने त्रस्त आहे. कुठलाही रस्ता, चौक कच-याच्या ढिगा-यापासून मुक्त नाही. २२ दिवसांपासून कचराच उचलला जात नाही. औरंगाबादकरांचा हा कचरा वर्षनुवर्षे नारेगावकरांनी सहन केला. तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. आता शहराबाजूचा कुठलाही परिसर आणि तेथील नागरिक हा कचरा सहन करायला तयार नाही. यासाठी पोलिसांच्या लाठ्या-काठ्याही झेलायला स्थानिक मागेपुढे पाहत नाहीत. मुळात शहरातील कचरा या लोकांनी सहन का करायचा? काही दिवसांचा प्रश्न असेल तर ते सहन करतीलही. नारेगावकरांनी ते अनेक वर्षे सहन केले देखील. पण, त्यांनी सहन केले म्हणून की काय, कचºयावर कायमचा पर्याय शोधावा असे कुणालाच वाटले नाही. न्यायालयाने दिलेली डेडलाईन देखील पालिकेनी पाळली नाही. आता कोर्टानेच नारेगावचा दरवाजा बंद केला. मुख्यमंत्र्यांनी शहराबाजूच्या खदानीचा पर्याय दिला. खदानीच्या बाजूचे लोक तरी हा पर्याय का स्वीकारतील आणि त्यांनी तो स्वीकारलाच तरी हा प्रश्न कायमचा सुटेल याबाबत शंका असल्यानेच नगरविकास खात्याच्या सचिवांनी शुक्रवारी औरंगाबादेत मॅरेथॉन बैठक घेऊन या समस्येवर पंचसूत्रीचा उतारा शोधला. कचºयाची विकेंद्रित विल्हेवाट लावणे, कचरा डंप करण्याऐवजी प्रक्रिया करणे, कम्पोस्टिंग करणे, ओला व सुका असे कचºयाचे वर्गीकरण करणे, झोननिहाय कचरा प्रक्रिया करण्यावर शनिवारपासून भर देण्याचे ठरले. ठरल्यासारखे सारेकाही वेळेत होईल, असे वाटत नाही.तरी तब्बल २२ दिवसांनंतर उपाय निघाला हेही काही कमी नाही. खरी कमाल आहे ती एवढे दिवस ही कचराकोंडी सहन करणा-या औरंगाबादकरांची. त्यांच्या सहनशीलतेची. प्रश्न रस्त्याचा, धुळीचा, प्रदुषणाचा असो वा कच-याचा प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्यांना खेळवत असतात आणि औरंगाबादकर स्वत: आनंदाने ते सहन करीत असतात. घरासमोर, रस्त्यावर, चौकात एवढा मोठा कचरा आणि त्याची दुर्गंधी पसरली असताना कुणीच व्यक्त होत नाही. त्यांच्या या सहनशीलतेचे कौतुक करावे ते किती? या सहनशील औरंगाबादकरांनी, प्रशासकीय अधिकाºयांनी आणि राजकारण्यांनी आता एकच करावे. सचिवांनी सांगितलेल्या पंचसूत्रीवर कुठलेही कारण न देता तातडीने अंमलबजावणी करावी आणि हो, यापुढे शहरातील कुठलाही प्रश्न शहरातच सोडविण्याच्या भानगडीत पडू नये. मंत्रालयातूनच तो सोडवून घ्यावा. अगदी कचºयाचा प्रश्न सोडवून घेतला तसाच. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद