शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आयुर्वेदिक पाण्याद्वारा कर्करोग व एड्ससारखे दुर्धर आजार बरे करण्याचा हा पेच सुटावा तरी कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:52 IST

गत काही दिवसांत विदर्भात उघडकीस आलेली काही प्रकरणे बघू जाता, आसाराम, राम रहीम, राधे माँ, रामपाल यासारख्या प्रकरणांपासून सर्वसामान्य नागरिकांनी काहीही धडा घेतला नसल्याचे कटु सत्यच अधोरेखित होते.

गत काही दिवसांत विदर्भात उघडकीस आलेली काही प्रकरणे बघू जाता, आसाराम, राम रहीम, राधे माँ, रामपाल यासारख्या प्रकरणांपासून सर्वसामान्य नागरिकांनी काहीही धडा घेतला नसल्याचे कटु सत्यच अधोरेखित होते. बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी अशोक पवार ऊर्फ पाणीवाले बाबाच्या विरोधात काही गावक-यांनी पोलिसांकडे तक्रार केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही या बाबाची भेट घेऊन त्याला आव्हान दिले. हा बाबा कर्करोग व एड्ससारखे दुर्धर आजार केवळ कथित आयुर्वेदिक पाण्याद्वारा बरे करण्याचा दावा करतो. तत्पूर्वी बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील कोपरी गावात अघोरी उपचार करणाºया एका मांत्रिकाने एका युवतीचा विनयभंग केल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गत आठवड्यात अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण येथे पतीसाठी औषध आणण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर नईमबाबा नामक भोंदूने बलात्कार केल्याची घटना समोर आली. हा नईमबाबा सध्या कारागृहाची हवा खात आहे. अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत भोंदूगिरीची तीन प्रकरणे उघडकीस येतात, यावरून अंधश्रद्धांची पाळेमुळे समाजात किती खोलवर रुजलेली आहेत, याची जाणीव होते. शिक्षणाचे प्रमाण जसे वाढत जाईल, तशा अंधश्रद्धा आपोआप कमी होत जातील, अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने वस्तुस्थिती विपरीत आहे. शिक्षणाचा अभाव आणि अंधश्रद्धा यांचा काहीही संबंध नसल्याचे, उच्च शिक्षितांच्या वर्तनावरून वारंवार सिद्ध होत आहे. एखाद्या बाबाच्या कृपाप्रसादासाठी रांगांमध्ये उभे असलेले डॉक्टर, प्राध्यापक, अभियंते, सनदी लेखापालांसारखे उच्च शिक्षित प्रत्येक शहराने बघितले आहेत. एकविसाव्या शतकाचे दुसरे दशक उलटत आले असताना ही स्थिती असेल, तर आमच्या शिक्षण प्रणालीसंदर्भात गांभीर्याने विचार व्हायला हवा. पुढील पिढ्यांना केवळ शिक्षितच नव्हे, तर बुद्धिप्रामाण्यवादी बनविणारी शिक्षण प्रणाली ही काळाची गरज आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये बदल गरजेचे आहेत. अर्थात, अशी शिक्षण प्रणाली प्रत्यक्षात आणणे खूप कठीण आहे; कारण श्रद्धा व अंधश्रद्धा यामधील सीमा अत्यंत धूसर आहे. या वस्तुस्थितीचा लाभ घेऊन, आमच्या श्रद्धास्थानांवर हल्ले होत असल्याची ओरड सुरू करणाºया मंडळीची आमच्या देशात अजिबात कमतरता नाही. अशांची संख्या कमी होत नाही, तोवर बुद्धिप्रामाण्यवादी तयार करणारी शिक्षण प्रणाली प्रत्यक्षात आणणे कठीण आहे आणि जोवर अशी शिक्षण प्रणाली प्रत्यक्षात येत नाही, तोवर अशांची संख्या कमी होणे शक्य नाही. मग हा पेच सुटावा तरी कसा?