शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीतून महत्त्वाचे विषय गायब कसे होतात?

By सुधीर महाजन | Updated: April 13, 2019 16:58 IST

अजून निवडणुकीचे वातावरण तापायचे आहे. दुष्काळात ते किती तापते हे पाहायचे.

- सुधीर महाजन

उभ्या-आडव्या भारतात प्रचाराचा उडालेला गदारोळ, छप्परफाड आश्वासनांची खैरात आणि आरोप-प्रत्यारोपांची धुळवड ती इतकी की, तेथे तारतम्य, स्त्री दाक्षिण्य आदी ‘संस्कार’ गुंडाळून ठेवलेले. ज्याला मोहित करण्यासाठी या सगळ्या मोहिनी अस्त्रांचा वापर चालू असताना तो सामान्य भारतीय नागरिक म्हणजे औट घटकेचा ‘मतदारराजा’ नेमका यावर काय विचार करतो, हे धुंडाळण्यासाठी जालना जिल्ह्याची वाट धरली. जालना यासाठी की, दुष्काळाची सर्वात जास्त झळ औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्येच जाणवते. गेल्या चार वर्षांपासून वर्षागणिक पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने यावर्षीची ‘बखाडी’ (हो दुष्काळाचा हा खास मराठवाडी शब्द) जरा कठीणच आहे.

सगळे शिवार वैराण. नजर पोहोचेल तेथपर्यंत कुठेही हिरवे ठिगळ दिसत नाही. तापलेले ऊन, वैराण माळराण आणि वातावरणात एक प्रकारचा उदासपणा. हे उदासवाणेपण अख्ख्या गावावर उतरलेले. पारांवर, मंदिरांमध्ये शून्याकडे पाहत बसलेली मंडळी ना गप्पा रंगतात, ना काही करावेसे वाटते. रस्त्याच्या कडेला गाडी लावून ढवळेश्वराच्या शिवारात रणरणत्या उन्हात ढेकळे तुडवीत किलोमीटरभर अंतर तुडवून आले भानुदास तिडकेंचे शेत. एकरभर डाळिंब आणि एकरभर द्राक्षाची बाग. लिंबाच्या गार सावलीत थांबलो, तर भानुदासभाऊ मोटारसायकलवर आले. न थांबताच म्हणाले, ‘तेवढं पाण्याचं पाहतो, थांबा थोडं.’ सावलीत काही मजूर विसाव्याला बसलेले. त्यांच्याही डोळ्यात आश्चर्य, हे कोण लोक़ थोड्या वेळात भानुदासभाऊ येताच ओळखपाळख झाली. हवा-पाण्याच्या गप्पा करीत गाडी निवडणुकीवर येऊन पोहोचली. बाबासाहेब तिडके म्हणाले, ‘गेल्यावर्षीच्या गारपिटीचे ५८ हजार अजून मिळाले नाहीत; पण मोदींनी २ हजार खात्यात जमा केले. निवडणुकीच्या तोंडावर तांब्या-तांब्या पाणी टाकून बाग वाचवली; पण द्राक्षाला भाव नाही. तिसरे वर्ष तोट्यात गेले. कसली कर्जमाफी न् काय. सगळे नुसता तमाशा करतात. काहीही पिकवा. भाव पडलेलेच. शेती म्हणजे घाट्याचा धंदा. निवडणुका त्यांच्यासाठी. आपले कष्ट कुठे संपतात. 

कैलास हा तरुण पोरगा टॅक्ट्रर उभा करून आला. निवडणूक म्हणताच ‘पाकिस्तानला घरात घुसून हाणले एकदम बेस केलं!’ ही त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया. ‘असा धडा शिकवायलाच पाहिजे होता.’ पुढे रस्त्याने पीरपिंपळगावजवळ रसवंती चालविणारा रामेश्वर कोल्हे गप्पा मारत बसला. निवडणुका आल्या की, रस्त्याची कामे सुरू करतात. एरवी रस्ते खड्ड्यात. त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सगळा देखावा; पण मोदी सरकारने पाकिस्तानवर बदला घेतला. हे काम चांगले केले! काँग्रेस, राहुल गांधी यांची चर्चा निघाली. काँग्रेसही चांगला पक्ष आहे; पण आता भावना राहिली नाही! असे बोलत त्याने विषय बदलला. तो शेतमालाच्या भावावर; पण बेरोजगारी, दुष्काळ हे विषय त्याच्या गावीही नव्हते.

असलम बेगला तर सर्वांना घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष असावा, असे वाटते. या सरकारने भेदभाव वाढवला. सत्तेवर येईपर्यंत आश्वासन देतात आणि नंतर विसरून जातात. पाच वर्षांपूर्वीची सगळीच आश्वासने लोकांना आठवतात. १५ लाख खात्यात हे सगळ्यांच्या लक्षात आहे. समाजाची स्मृती अल्पकालीन असते; पण हे पंधरा लाखांचे आश्वासन सर्वांनाच लक्षात आहे. रसवंतीवर हळूहळू लोक गोळा व्हायला लागले. कल्याण पाटील हा शेतकरी, काँग्रसने नेहमी गरिबांचा विचार केला. भाजपची पाच वर्षे पोपटपंची चालू होती. प्रत्यक्षात काहीच केले नाही; पण काही न करता, नुसता गाजावाजा केला की, लोकांना भुरळ पडते, असे जनतेचे झाले आहे.

ग्रामीण भागातील चर्चा यापलीकडे जात नव्हती. दुष्काळ, बेरोजगारी शेतमालाचे भाव, हे प्रश्न पुलवामापेक्षा कमी महत्त्वाचे वाटत होते. या प्रश्नावर कोणी फारसे हिरीरीने बोलताना दिसत नव्हते. एव्हाना ऊन कलले होते, म्हणून जालना शहराकडे मोर्चा वळवला. जालना ही व्यापारीपेठ-उद्योगनगरी. गेल्या काही वर्षांपासून भाजपची सत्ता असलेला जिल्हा. महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाकडे गेल्या ४०-४५ वर्षांपासून चिकित्सक नजरेने पाहणारे प्रा. बी.वाय. कुलकर्णी यांची भेट घेतली. ते राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आणि राजकीय अभ्यासक. निवडणुकीचा प्रचार भलत्याच दिशेने फिरतो ही त्यांची चिंता. ‘नॉन इश्यू’ हे इश्यू होतात, म्हणजे दुष्काळ, पाणी, बेरोजगारी, महाग होत जाणारे शिक्षण, औद्योगिक उत्पादनात होणारी घट, अर्थव्यवस्थेची स्थिती, परराष्ट्रसंबंध, हे महत्त्वाचे विषय निवडणुकीतून गायब कसे होऊ शकतात, ही सरांची चिंता. या विषयावर सत्ताधारी अजिबात बोलत नाहीत. चौकीदाराचा विषय निघतो. ‘चौकीदार’ हा श्रीमंताचे रक्षण करणार असतो. हे आपण विसरलो. गरिबांना चौकीदाराची कधी गरज पडत नाही. असे असतानाही ‘चौकीदार’ हा निवडणुकीचा राष्ट्रीय विषय ठरतो, हे आश्चर्यच आहे. या देशाचे परराष्ट्र धोरण, रोजगारवाढीचा कार्यक्रम, संरक्षण या विषयांऐवजी जात-पात धर्माचे राजकारण वरचढ ठरते आहे.

काँग्रेसने जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचा मुद्दा मांडून मोठी चूक केली आहे. जाहीरनामा तयार करण्यासाठी बुद्धिवंत, अनुभवी मंडळी असताना, असे वादग्रस्त आश्वासन कसे दिले जाते, याचेच त्यांना आश्चर्य वाटत होते. निवडणुकांमुळे समाजात दुही निर्माण होते. सामाजिक स्वास्थ्य बिघडते, याचे भान कोणी ठेवत नाही. गेल्या पंचवीस वर्षांच्या राजकारणाने या पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक वीण उधडून टाकली गेली, हे पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांना कसे कळले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीची चर्चा दिवसभर चालली; पण ती मी सुरू ठेवली म्हणून; परंतु प्रत्यक्षात ग्रामीण किंवा शहरी भागात कुठेही निवडणुकीचे वातावरण नव्हते. चर्चेचे फड रंगताना दिसत नव्हते. दोन-दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री येऊन गेले; पण त्याचीही चर्चा नव्हती. अजून वातावरण तापायचे आहे. दुष्काळात ते किती तापते हे पाहायचे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबादMarathwadaमराठवाडा