शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आपुले-परके मी कसे पारखू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 13:15 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या नाट्यात राजकीय पक्ष, उमेदवार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना एका भक्तिगीतातील ‘आपुले-परके मी कसे पारखू?’ या ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या नाट्यात राजकीय पक्ष, उमेदवार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना एका भक्तिगीतातील ‘आपुले-परके मी कसे पारखू?’ या ओळीची प्रचिती आली असेल. संकटसमयी खऱ्या मित्राची पारख होते, असे आपण म्हणतो, त्याचा अनुभव या साऱ्यांना आला असेल. अपेक्षाभंग, प्रतारणेचे हे दु:ख मोठे असते. मनावर, हृदयावर त्याचा व्रण उमटतो, तो कायम राहतो. पुसता म्हटला तरी पुसला जात नाही.राजकीय मंडळींच्या जाहीर वक्तव्यातून व्यथा मांडल्या गेल्या. त्यातूनही वाद उद्भवले. जळगाव मतदारसंघाचे खासदार ए.टी.पाटील यांनी तर षडयंत्र असेच या सगळ्या घटनेचे वर्णन केले आहे. दहा वर्षे तुम्ही खासदार होतात, आता पक्ष दुसºया उमेदवाराला संधी देऊ इच्छितो, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींनी मांडली असती तर ती पाटील यांनी स्विकारली असती काय, हा देखील प्रश्न आहे. अलिकडे वयाची नव्वदी गाठल्यानंतरही उमेदवारीची अपेक्षा ज्येष्ठ नेत्यांना असते, त्यामुळे राजकारणात ज्येष्ठत्व, वय, अनुभव या शब्दांचे प्रसंगानुरुप अर्थ बदलत जातात. लोकनियुक्त नगराध्यक्ष ते खासदार असा राजकीय पल्ला गाठलेल्या पाटील यांना वैयक्तीक जीवनातील प्रसंगावरुन लक्ष्य करीत राजकीय जीवनातून बाद करण्याचा हा प्रकार राजकारणाची पातळी किती खालावली आहे,हे अधोरेखित करुन जातो. स्वकीयांनीच रचलेल्या षडयंत्राचे बळी ठरल्याची त्यांची भावना पाहता ‘आपुले-परके’ कोण हे ओळखणे त्यांना अवघड झाले होते, याची अनुभूती प्रकट होते.पाटील यांचे तिकीट कापून विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. एबी फॉर्मसह त्यांनी अर्ज दाखल केला. प्रचार सुरु केला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचीही उमेदवारी कापण्यात आली. ही उमेदवारी कापण्याच्या घटनेचे वर्णन वाघ दाम्पत्याने ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ अशा शब्दात केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष, आमदार अशी जबाबदारीची पदे भूषविणाºया महिला नेत्यावर तिकीट देऊन आठवडाभरात ‘कमकुवत’ उमेदवाराचा शिक्का बसविला जातो, हे कोणते सर्वेक्षण होते. मग तिकीट देताना सर्वेक्षण कोणते होते, हा त्यांचा सवाल रास्त आहे. हे सगळे करणारेदेखील ‘आपुले’च होते,ही त्यांची व्यथा आहे.ही प्रतारणा असह्य झाल्याने अमळनेरचे नाट्य घडले. त्याला कारणीभूत ठरले ते माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांचे पारोळ्यातील ए.टी.पाटील यांच्या मेळाव्यातील वादग्रस्त वक्तव्य. दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षमेळाव्यात शेजारी बसलेल्या जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी तीनदा आमदार म्हणून निवडून आलेल्या डॉ.पाटील यांना मारहाण करावी, हे कुणासाठीही अनपेक्षित होते. ‘आपुल्या’च लोकांनी परके होत असे कृत्य करावे, हे पाहून व्यथीत झालेले डॉ.बी.एस.पाटील नंतर प्रचारात उतरलेच नाहीत. आमदार स्मिता वाघ आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत डॉ.बी.एस.पाटील यांच्यासोबत व्यासपीठावर पुन्हा एकत्र आले. पक्षशिस्त म्हणून हे सगळे एकत्र आले असले तरी मनाने मात्र ते दुरावलेलेच राहिले असावे. कार्यकर्त्यांनादेखील हे चित्र तात्कालीक आणि अपरिहार्य वाटले असेल. त्यात जिवंतपणा, अनौपचारिकता, नैसर्गिकता जाणवली नसणारच.मुुंबईत शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात थांबलेल्या एकनाथराव खडसे यांना १८ दिवस प्रचारापासून लांब रहावे लागले. या काळातील त्यांची व्यथा बोदवडच्या सभेत जाहीरपणे मांडली गेली. ‘आता मी गेलो, परत येत नाही’ अशीच विरोधकांची भावना झाली होती, पण त्यांना पुढे घातल्याशिवाय मी जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. रावेरची जागा भाजपच्यादृष्टीने अवघड असल्याची कुजबूज सुरु झाली होतीच, ती मुंबईत नाथाभाऊंच्या कानी गेली नसेल, असे नाहीच. आणि हे कोण करतेय हेदेखील त्यांना ठाऊक असल्याने त्यांनी जाहीर समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने खडसे आणि गिरीष महाजन बºयाच दिवसांनंतर एकत्र व्यासपीठावर आले. रक्षा खडसे यांच्या प्रचार फलकांवर महाजन यांचे छायाचित्र दिसले. जामनेर आणि मुक्तार्इंनगरने एकमेकांची छायाचित्रे पूर्वीच बाद केली असताना निवडणुकीच्या निमित्ताने ‘आपुले-परके’मधील अंतर दूर करण्याचा सकारात्मक पाऊल उचलले गेले. फक्त हे तात्कालीक नसावे, अशी सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा असेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव