शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आपुले-परके मी कसे पारखू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 13:15 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या नाट्यात राजकीय पक्ष, उमेदवार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना एका भक्तिगीतातील ‘आपुले-परके मी कसे पारखू?’ या ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या नाट्यात राजकीय पक्ष, उमेदवार, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना एका भक्तिगीतातील ‘आपुले-परके मी कसे पारखू?’ या ओळीची प्रचिती आली असेल. संकटसमयी खऱ्या मित्राची पारख होते, असे आपण म्हणतो, त्याचा अनुभव या साऱ्यांना आला असेल. अपेक्षाभंग, प्रतारणेचे हे दु:ख मोठे असते. मनावर, हृदयावर त्याचा व्रण उमटतो, तो कायम राहतो. पुसता म्हटला तरी पुसला जात नाही.राजकीय मंडळींच्या जाहीर वक्तव्यातून व्यथा मांडल्या गेल्या. त्यातूनही वाद उद्भवले. जळगाव मतदारसंघाचे खासदार ए.टी.पाटील यांनी तर षडयंत्र असेच या सगळ्या घटनेचे वर्णन केले आहे. दहा वर्षे तुम्ही खासदार होतात, आता पक्ष दुसºया उमेदवाराला संधी देऊ इच्छितो, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींनी मांडली असती तर ती पाटील यांनी स्विकारली असती काय, हा देखील प्रश्न आहे. अलिकडे वयाची नव्वदी गाठल्यानंतरही उमेदवारीची अपेक्षा ज्येष्ठ नेत्यांना असते, त्यामुळे राजकारणात ज्येष्ठत्व, वय, अनुभव या शब्दांचे प्रसंगानुरुप अर्थ बदलत जातात. लोकनियुक्त नगराध्यक्ष ते खासदार असा राजकीय पल्ला गाठलेल्या पाटील यांना वैयक्तीक जीवनातील प्रसंगावरुन लक्ष्य करीत राजकीय जीवनातून बाद करण्याचा हा प्रकार राजकारणाची पातळी किती खालावली आहे,हे अधोरेखित करुन जातो. स्वकीयांनीच रचलेल्या षडयंत्राचे बळी ठरल्याची त्यांची भावना पाहता ‘आपुले-परके’ कोण हे ओळखणे त्यांना अवघड झाले होते, याची अनुभूती प्रकट होते.पाटील यांचे तिकीट कापून विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. एबी फॉर्मसह त्यांनी अर्ज दाखल केला. प्रचार सुरु केला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचीही उमेदवारी कापण्यात आली. ही उमेदवारी कापण्याच्या घटनेचे वर्णन वाघ दाम्पत्याने ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ अशा शब्दात केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष, आमदार अशी जबाबदारीची पदे भूषविणाºया महिला नेत्यावर तिकीट देऊन आठवडाभरात ‘कमकुवत’ उमेदवाराचा शिक्का बसविला जातो, हे कोणते सर्वेक्षण होते. मग तिकीट देताना सर्वेक्षण कोणते होते, हा त्यांचा सवाल रास्त आहे. हे सगळे करणारेदेखील ‘आपुले’च होते,ही त्यांची व्यथा आहे.ही प्रतारणा असह्य झाल्याने अमळनेरचे नाट्य घडले. त्याला कारणीभूत ठरले ते माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांचे पारोळ्यातील ए.टी.पाटील यांच्या मेळाव्यातील वादग्रस्त वक्तव्य. दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षमेळाव्यात शेजारी बसलेल्या जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी तीनदा आमदार म्हणून निवडून आलेल्या डॉ.पाटील यांना मारहाण करावी, हे कुणासाठीही अनपेक्षित होते. ‘आपुल्या’च लोकांनी परके होत असे कृत्य करावे, हे पाहून व्यथीत झालेले डॉ.बी.एस.पाटील नंतर प्रचारात उतरलेच नाहीत. आमदार स्मिता वाघ आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत डॉ.बी.एस.पाटील यांच्यासोबत व्यासपीठावर पुन्हा एकत्र आले. पक्षशिस्त म्हणून हे सगळे एकत्र आले असले तरी मनाने मात्र ते दुरावलेलेच राहिले असावे. कार्यकर्त्यांनादेखील हे चित्र तात्कालीक आणि अपरिहार्य वाटले असेल. त्यात जिवंतपणा, अनौपचारिकता, नैसर्गिकता जाणवली नसणारच.मुुंबईत शस्त्रक्रियेमुळे रुग्णालयात थांबलेल्या एकनाथराव खडसे यांना १८ दिवस प्रचारापासून लांब रहावे लागले. या काळातील त्यांची व्यथा बोदवडच्या सभेत जाहीरपणे मांडली गेली. ‘आता मी गेलो, परत येत नाही’ अशीच विरोधकांची भावना झाली होती, पण त्यांना पुढे घातल्याशिवाय मी जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. रावेरची जागा भाजपच्यादृष्टीने अवघड असल्याची कुजबूज सुरु झाली होतीच, ती मुंबईत नाथाभाऊंच्या कानी गेली नसेल, असे नाहीच. आणि हे कोण करतेय हेदेखील त्यांना ठाऊक असल्याने त्यांनी जाहीर समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने खडसे आणि गिरीष महाजन बºयाच दिवसांनंतर एकत्र व्यासपीठावर आले. रक्षा खडसे यांच्या प्रचार फलकांवर महाजन यांचे छायाचित्र दिसले. जामनेर आणि मुक्तार्इंनगरने एकमेकांची छायाचित्रे पूर्वीच बाद केली असताना निवडणुकीच्या निमित्ताने ‘आपुले-परके’मधील अंतर दूर करण्याचा सकारात्मक पाऊल उचलले गेले. फक्त हे तात्कालीक नसावे, अशी सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा असेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव