शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कशी सर्वेनं थट्टा मांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 04:44 IST

छे. छे. छे. शक्यच नाही. कदापिही शक्य नाही. नोव्हेंबर २०१७चा कोणता तरी एक सर्वे येतो आणि म्हणतो की आमच्या महाराष्टÑापेक्षा आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचे विद्यार्थी सरस आहेत.

- सुमंत अयाचितछे. छे. छे. शक्यच नाही. कदापिही शक्य नाही. नोव्हेंबर २०१७चा कोणता तरी एक सर्वे येतो आणि म्हणतो की आमच्या महाराष्टÑापेक्षा आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचे विद्यार्थी सरस आहेत. अहो, कसा विश्वास ठेवावा यावर? गोविंदाग्रजांनी मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्टÑ देशा या महाराष्टÑ गीतात पुढे काय म्हणून ठेवलं आहे, लक्षात आहे ना. भावभक्तीच्या आणिक बुद्धीच्या देशा, हे त्यांनी म्हटलेलं फार फार म्हणजे फारच महत्त्वाचं आहे. अहो, त्यांच्यासारख्या प्रतिभावान लेखक, कवीनं म्हटलं म्हणजे बरोबरच असणार. कारण या गीतात वर्णन केल्याप्रमाणे महाराष्टÑातील नागरिक कणखर आहेत, नाजूक आहेत, कोमल तर आहेतच आणि शिवाय बुद्धिवानही आहेत. असे असताना इथली भावी पिढी अभ्यासात मागे राहीलच कशी?तिसरी, पाचवी व आठवीतील गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासून महाराष्टÑ अभ्यासात पिछाडीवर गेला, असा धक्कादायक निष्कर्ष काढण्याचं धारिष्ट्य झालं तरी कसं या सर्वेकारांचं. महाराष्टÑ म्हणजे काय साधा-सुधा आहे का? संपूर्ण देशात वेगवेगळ्या क्षेत्रात नंबर एकवर असलेला हा प्रदेश आहे आणि तो अभ्यासात असा कसा पिछाडीवर जाईल? गणितात आमचे चिल्ले-पिल्ले मागे कसे राहतील? गणित त्यांच्या किती आवडीचा विषय आहे, हे तर आपल्याला माहीत आहेच. त्यांचे पालक ज्याकाळी दहावीला असायचे त्यावेळी गणित-इंग्रजीला माय-बाप विषय म्हणायचे. तेव्हा एखाद्याने दहावीत गोची खाल्ली तर त्याला सर्रास विचारले जायचे की, माय-बापाने दगा दिला का? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे उत्तर होकारार्थी देण्यात त्यालाही काही गैर वाटायचे नाही. आता त्यांची पोरे झाली म्हणून काय ती तशीच राहणार आहेत? आडातच नाही तर पोहºयात कुठून येणार, असेही कुणी कुत्सितपणे म्हणतील. पण सांप्रत काळी किती बदल झाला, तो तरी लक्षात घ्या. मोबाईल, कॅलक्युलेटर, कॉम्प्युटर यामुळे गणित, आकडेमोड करणं कितीतरी सोप्पं झालं. त्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असल्या क्षुल्लक गोष्टींत आपली पोरं वेळ वाया घालवत नाहीत. तीच गत इंग्रजीची. हे वाघिणीचे दूध तर आम्ही एवढे पचवून आहोत की मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरतो की इंग्रजी बोलताना मधे-मधे मराठी तोंडी लावतो, तेच कळत नाही. पण ते महत्त्वाचं नाही.आमच्या पोरांचं सामाजिक शास्त्रही कच्चं कसं राहील हो? हा प्रदेश म्हणजे सामाजिक घुसळणीचं मोठं केंद्र पूर्वी होतं, आजही आहे आणि भविष्यातही राहील. त्यात आमच्या शिक्षण संस्थांच्या टोलेजंग इमारती तर पाहा. त्यात शिकणारी मुलं एवढी कच्ची कशी राहतील? एवढे लाखो रुपये फी भरून आम्ही त्यांना तेथे पाठवतो, त्याशिवाय त्याच्यापेक्षा दुप्पट फी भरून ट्यूशन लावतो. तरीही पोरं कच्चीच? याही पलीकडे विचार करण्याची गोष्ट म्हणजे आमचे विद्यार्थी, शिक्षकांना काय कमी कामं आहेत का? सतराशे साठ निवडणुका, पायलीचे पन्नास सर्वे, जनगणना, योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षकांचं. त्यातून त्यांना वेळ मिळाला तर विद्यार्थ्यांना मोबाईल, टीव्ही, क्रिकेट यातून सवड कुठंय. एवढ्या व्यापातून ते अभ्यास करणार कसा? तेव्हा या सर्वेतच गडबड असणार. आमचे पोरं मात्र हुश्शारच. नक्कीच.

टॅग्स :Studentविद्यार्थी