शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
3
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
4
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
5
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
6
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
7
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
8
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
9
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
10
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
11
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
12
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
13
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
14
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
15
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
16
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
17
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
19
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
20
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!

कशी सर्वेनं थट्टा मांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 04:44 IST

छे. छे. छे. शक्यच नाही. कदापिही शक्य नाही. नोव्हेंबर २०१७चा कोणता तरी एक सर्वे येतो आणि म्हणतो की आमच्या महाराष्टÑापेक्षा आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचे विद्यार्थी सरस आहेत.

- सुमंत अयाचितछे. छे. छे. शक्यच नाही. कदापिही शक्य नाही. नोव्हेंबर २०१७चा कोणता तरी एक सर्वे येतो आणि म्हणतो की आमच्या महाराष्टÑापेक्षा आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकचे विद्यार्थी सरस आहेत. अहो, कसा विश्वास ठेवावा यावर? गोविंदाग्रजांनी मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्टÑ देशा या महाराष्टÑ गीतात पुढे काय म्हणून ठेवलं आहे, लक्षात आहे ना. भावभक्तीच्या आणिक बुद्धीच्या देशा, हे त्यांनी म्हटलेलं फार फार म्हणजे फारच महत्त्वाचं आहे. अहो, त्यांच्यासारख्या प्रतिभावान लेखक, कवीनं म्हटलं म्हणजे बरोबरच असणार. कारण या गीतात वर्णन केल्याप्रमाणे महाराष्टÑातील नागरिक कणखर आहेत, नाजूक आहेत, कोमल तर आहेतच आणि शिवाय बुद्धिवानही आहेत. असे असताना इथली भावी पिढी अभ्यासात मागे राहीलच कशी?तिसरी, पाचवी व आठवीतील गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयातील गुणवत्ता तपासून महाराष्टÑ अभ्यासात पिछाडीवर गेला, असा धक्कादायक निष्कर्ष काढण्याचं धारिष्ट्य झालं तरी कसं या सर्वेकारांचं. महाराष्टÑ म्हणजे काय साधा-सुधा आहे का? संपूर्ण देशात वेगवेगळ्या क्षेत्रात नंबर एकवर असलेला हा प्रदेश आहे आणि तो अभ्यासात असा कसा पिछाडीवर जाईल? गणितात आमचे चिल्ले-पिल्ले मागे कसे राहतील? गणित त्यांच्या किती आवडीचा विषय आहे, हे तर आपल्याला माहीत आहेच. त्यांचे पालक ज्याकाळी दहावीला असायचे त्यावेळी गणित-इंग्रजीला माय-बाप विषय म्हणायचे. तेव्हा एखाद्याने दहावीत गोची खाल्ली तर त्याला सर्रास विचारले जायचे की, माय-बापाने दगा दिला का? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे उत्तर होकारार्थी देण्यात त्यालाही काही गैर वाटायचे नाही. आता त्यांची पोरे झाली म्हणून काय ती तशीच राहणार आहेत? आडातच नाही तर पोहºयात कुठून येणार, असेही कुणी कुत्सितपणे म्हणतील. पण सांप्रत काळी किती बदल झाला, तो तरी लक्षात घ्या. मोबाईल, कॅलक्युलेटर, कॉम्प्युटर यामुळे गणित, आकडेमोड करणं कितीतरी सोप्पं झालं. त्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असल्या क्षुल्लक गोष्टींत आपली पोरं वेळ वाया घालवत नाहीत. तीच गत इंग्रजीची. हे वाघिणीचे दूध तर आम्ही एवढे पचवून आहोत की मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरतो की इंग्रजी बोलताना मधे-मधे मराठी तोंडी लावतो, तेच कळत नाही. पण ते महत्त्वाचं नाही.आमच्या पोरांचं सामाजिक शास्त्रही कच्चं कसं राहील हो? हा प्रदेश म्हणजे सामाजिक घुसळणीचं मोठं केंद्र पूर्वी होतं, आजही आहे आणि भविष्यातही राहील. त्यात आमच्या शिक्षण संस्थांच्या टोलेजंग इमारती तर पाहा. त्यात शिकणारी मुलं एवढी कच्ची कशी राहतील? एवढे लाखो रुपये फी भरून आम्ही त्यांना तेथे पाठवतो, त्याशिवाय त्याच्यापेक्षा दुप्पट फी भरून ट्यूशन लावतो. तरीही पोरं कच्चीच? याही पलीकडे विचार करण्याची गोष्ट म्हणजे आमचे विद्यार्थी, शिक्षकांना काय कमी कामं आहेत का? सतराशे साठ निवडणुका, पायलीचे पन्नास सर्वे, जनगणना, योजना या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षकांचं. त्यातून त्यांना वेळ मिळाला तर विद्यार्थ्यांना मोबाईल, टीव्ही, क्रिकेट यातून सवड कुठंय. एवढ्या व्यापातून ते अभ्यास करणार कसा? तेव्हा या सर्वेतच गडबड असणार. आमचे पोरं मात्र हुश्शारच. नक्कीच.

टॅग्स :Studentविद्यार्थी