शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 10:38 IST

‘पार्टी विथ अ डिफरन्स’ नव्हे, ‘पार्टी विथ अ रिलेव्हन्स’! ‘कालसंगत’ पक्ष होण्याची गरज वाटणाऱ्या भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्लीशेवटी एकदाचे पोतडीतून मांजर बाहेर आले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात कुठेतरी काहीतरी गडबड असल्याची कुजबुज गेले काही महिने सत्तावर्तुळात सातत्याने चालू होती. आता ती थांबली आहे. भाजपचे शक्तिशाली सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष हे माध्यमांच्या प्रकाशझोतातून बाहेर गेले तेव्हापासून या चर्चेला सुरुवात झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेल्या संतोष यांना भाजपच्या संघटनात्मक बाबीत लक्ष घालण्यासाठी नेमलेले असल्याने पंतप्रधान मोदी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एखादा कार्यक्रम पक्षाच्या मुख्यालयात झाला तर संतोष यांना व्यासपीठावर आसन दिले जात असे. परंतु अलीकडे ते रहस्यमयरीत्या गायब झाल्याने परिवारात काहीतरी बिनसले आहे अशी चर्चा सुरू झाली. 

विशेषत: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे पानिपत झाल्यानंतर संतोष यांच्या म्हणण्याकडे पक्षाचे नेतृत्व पुरेसे लक्ष देत नसल्याचे बोलले जाऊ लागले. संघाचा पूर्णवेळ प्रचारक भाजपकडे लक्ष देण्यासाठी नेमलेला असताना त्याचे म्हणणे ऐकले जात नाही, याचे परिणाम होणारच होते.  भाजपला आता ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ होण्याऐवजी ‘पार्टी विथ अ रिलेव्हन्स’ - राष्ट्रीय पातळीवरील ‘कालसंगत’ पक्ष होण्याची गरज वाटू लागली आहे. त्याचे महत्त्वाचे कारण, पहिल्यांदाच भाजपची पदचिन्हे संपूर्ण भारतात दिसू लागली आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यापुढे पक्षाचा वैचारिक मार्गदर्शक राहील. परंतु रोजच्या कामकाजात लक्ष घालणार नाही. भूमिकेत झालेल्या या बदलावर अद्याप शिक्कामोर्तब मात्र व्हावयाचे आहे.

नव्या वर्गाची मनधरणी४ जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेअर बाजार मोठी उसळी घेईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला हे नक्कीच आश्चर्यकारक होते. निवडणुका चालू असताना १९ मे रोजी एका  मुलाखतीत पंतप्रधानांनी हा विश्वास व्यक्त करणे हे जरा विचित्र होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १३ मे रोजी हेच म्हटले होते. भाजप आणि त्याचे मित्रपक्ष ४०० पार होतील आणि बाजार वाढेल, असे शाह म्हणाले. चार जूनपूर्वी शेअर खरेदी करून नफा कमवा, असा सल्लाही त्यांनी दिला होता. 

सत्तावर्तुळातील या उभयतांचे निकटवर्तीय सांगतात की, ते कोणतीही गोष्ट विनाकारण करत नाहीत. अशा प्रकारची भविष्यवाणी करून भाजप एका अत्यंत महत्त्वाच्या वर्गाला दिलासा देत असल्याची चर्चा आहे. शेअर बाजारात सध्या ८ कोटींपेक्षा जास्त छोटे गुंतवणूकदार असून भाजप पुन्हा सत्तेवर न आल्यास आपल्या गुंतवणुकीचे काय होईल? याची काळजी त्यांना लागली आहे. 

 भारतीय अर्थव्यवस्था भरारी घेईल, असा विश्वास वाटून २०१५ नंतर हे छोटे गुंतवणूकदार बाजाराकडे वळले. बाजार पडत असल्याने सध्या ते सचिंत आहेत. भाजपच्या पक्षनेतृत्वाला त्यांना दिलासा देणे आवश्यक होते.  माध्यमांवर अहोरात्र लक्षदेशातील साधारणत: ९०० च्या घरात असलेल्या दूरचित्रवाणी वाहिन्या अहोरात्र कोणत्या बातम्या देतात आणि काय भाष्य करतात, यावर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे बारीक लक्ष असते. या वाहिन्यांवर २४ तास लक्ष ठेवण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. हिंदी, इंग्रजीबरोबरच सर्व प्रादेशिक भाषांत प्रसारित होणारी प्रत्येक बातमी आणि भाष्य या मंडळींच्या नजरेखालून जाते. तीन पाळ्यांमध्ये ही मंडळी काम करतात. माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या कार्यालयालाही नियमितपणे अहवाल जातो.

आधीच्या कारकिर्दीतही अशी व्यवस्था होती; पण ती फारशी प्रभावी नव्हती. आता सुमारे २४०० निरीक्षक टीव्हीच्या प्रसारणावर लक्ष ठेवून आहेत. नभोवाणी आणि वृत्तपत्रांमध्ये काय म्हटले जाते, याकडे लक्ष द्यायला स्वतंत्र व्यवस्था आहे. रोजच्या रोज ही सगळी कवायत होत असते. स्वाभाविकच सत्तारूढ बाजू अत्यंत जलद गतीने प्रतिसाद देते आणि गरज असेल तेथे धोरणातही बदल केला जातो.

शिवराजसिंह यांना वाढती मागणीमध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे भाजपचे नवे स्टार प्रचारक असून पक्षनेतृत्वाशी त्यांनी छान जुळवून घेतले आहे. त्यांना जिथे जिथे प्रचाराला पाठवले जाते तेथे तेथे ते केंद्रीय नेतृत्वावर प्रभाव टाकतात. शिवराजसिंह इतर मागासवर्गीय समाजातील असून या वर्गाला आकृष्ट करण्यासाठी भाजपला ते उपयोगी पडतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसरे मागणी असलेले प्रचारक असून त्यांनाही भारतभर प्रतिसाद मिळतो. विशेषत: राजपूत समाजात त्यांचा प्रभाव पडतो. परंतु देशात इतर मागासवर्गीयांची संख्या ५५ टक्क्यांच्या घरात असल्यामुळे शिवराजसिंह यांना अधिक मागणी असते. 

चालू निवडणुकीच्या पहिल्या फेरीत मतदानाचे प्रमाण खूपच कमी आढळल्यानंतर त्यात लक्ष घालण्यास शिवराजसिंह यांना सांगण्यात आले. विदिशामधून ते लोकसभेची निवडणूक पक्षातर्फे लढवत असले तरीही त्यांच्या मनात आपल्याला बाजूला ठेवल्याचे शल्य टोचत होते. छिंदवाड्यात ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांनी गेली चार दशके बस्तान बसवले आहे, ते मोडीत काढण्यासाठी शिवराजसिंह यांना छिंदवाड्यातून उमेदवारी हवी होती. परंतु बलाढ्य नेत्याला हरविण्याची संधी पक्षाने त्यांना नाकारली. अर्थात नंतर झाले ते बऱ्यासाठी. कारण अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या तुलनेत शिवराजसिंह यांची मागणी वाढली. शिवराज सिंह यांच्यावर ही भगवंताची कृपाच म्हणायची!

टॅग्स :BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPoliticsराजकारण