शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

डॉक्टरांवर होणारे हल्ले कसे रोखता येतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 04:36 IST

संभाव्य धोके ओळखणे, हिंसक शक्यतांचा सामना करण्यासाठी नियमित प्रशिक्षण आणि रुग्णांशी सतत संवाद!

प्रवीण दीक्षित (‘मॅट’चे उपाध्यक्ष, राज्याचे माजी पोलीस महासंचालक) -

कोरोना महामारी आल्यावर डॉक्टरांसह विविध स्तरांवरचे आरोग्यसेवक रुग्णांच्या मदतीला धावून आले. ते त्यांचे काम उत्तम प्रकारे करत असताना त्यांच्यावरच हल्ले होऊ लागले. हे हल्ले अजूनही चालूच आहेत. अशा घटनांची गय होणार नाही, असे गुन्हे अजामीनपात्र ठरवण्यासह केंद्रीय कायद्यानुसार हल्लेखोरांना कठोर शिक्षा होईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी वेळोवेळी बजावले आहे. डॉक्टरांविरुद्ध हिंसा रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारसह इतर राज्यांनीही कायदे केले आहेत. केंद्रीय स्तरावरून एवढी कठोर दटावणी मिळाल्यानंतर आणि आवश्यक ते कायदे केल्यानंतरही डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रमाण कमी झाले नाही. हे हल्ले होतच राहिले. शिवाय समाजमाध्यमातून या घटना वेगाने पसरत राहिल्या. अशा एखाद्या प्रकरणात हल्लेखोरांना शिक्षा झाल्याचेही कुठे निदर्शनास आले नाही, त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसेल, असेही काही घडले नाही.विविध सरकारी इस्पितळात हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर त्या रोखण्याच्या, उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मला बोलावले गेले. वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधीक्षकांशी सल्लामसलत करून इमर्जन्सी वॉर्डस ठरवले गेले. तेथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सशस्र जवान नेमले गेले. या जवानांकडे अतिरिक्त कुमक मागवण्यासाठी संपर्कसाधने पुरवण्यात आली. जमाव तसेच रुग्णांचे नातेवाईक यांना कसे हाताळायचे याचे खास प्रशिक्षण या जवानांना दिलेले असते. निवडक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात.या व्यतिरिक्त इमर्जन्सी वॉर्डस्मध्ये कोण जाऊ शकेल यावर कठोर नियंत्रणे घालण्यात आली. नातेवाइकांच्या भेटीच्या वेळेवरही बंधने घालण्यात आली. कोणत्याही आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अलार्म यंत्रणेची सोय करण्यात आली.सर्वसाधारणत: याबाबतची एक सिस्टीम उभारली गेली आणि ती चांगल्याप्रकारे काम करते आहे, हे दिसूही लागले. या सगळ्यामुळे निवासी डॉक्टर्सनी समाधान व्यक्त केले. त्यांना तणावमुक्त वातावरणात काम करता येईल असे दिसू लागले असले, तरीही एकूण परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आणखीही बराच वाव आहे.

खासगी रुग्णालयातील परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे. अशा ठिकाणी बहुतेक डॉक्टर्स एकेकटे काम करतात. जेथे हॉस्पिटल आहे अशा फार थोड्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे यासारखे उपाय योजलेले दिसतात, अर्थात तरीही तेथील परिस्थितीत फार फरक पडलेला नाही; म्हणूनच अतिरिक्त उपायांची गरज आहे.आरोग्य केंद्रावरील हिंसेची कारणे ‘सवयीची’ नसतात. कोणत्या कारणाने तेथील परिस्थिती हाताबाहेर जाईल, याचा अंदाज येणे मुश्कील असते. त्याशिवाय अपुरे प्रशिक्षण, सुविधांचा अभाव आणि अशा घटना हाताळण्यासाठी निश्चित धोरण ठरलेले नसणे; याहीमुळे अनेकदा परिस्थिती हाताबाहेर जाते.त्यासाठी सर्वात महत्त्वाची अशी एकच गोष्ट आहे : संबंधित कर्मचाऱ्यांना तज्ज्ञांकरवी सातत्याने दिले जाणारे प्रशिक्षण ! रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स, तंत्रज्ञ, वॉर्डबॉईज, परिचारिका, स्वागतिका, बिलिंग क्लार्क अशा सगळ्यांची प्रत्येक पातळीवरील गरज पाहून प्रशिक्षणाची व्यवस्था करावी लागेल. काय करावे, काय करू नये याच्या अमलात आणता येतील अशा बारीकसारीक सूचना द्याव्या लागतील.सहभागी सदस्यांनी केसेसचा अभ्यास करावा, त्यावर चर्चा करावी, तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्यावर निष्कर्ष काढावेत. जिथे काही चुका होतील त्या नोंदवाव्यात. साधारणत: हे केले जात नाही. आधीच्या घटनांचा तपशील उपलब्ध असेल तर गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारी काही समान कारणे त्यात सापडतात का? - हे शोधता येईल. हे रेकॉर्डिंग संबंधितांना वेळोवेळी दाखवून काय चुकले, ते कसे रोखता आले असते हे सांगता येईल. आणखी एक गोष्ट म्हणजे पोलीस किंवा न्यायालयांकडे अशा घटना न नेण्याकडेही कल असतो. तो टाळला पाहिजे.आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात होणारा हिंसाचार रोखण्यासाठी अमेरिकेत पुढील मार्गदर्शक तत्त्वे अनुसरली जातात : १) व्यवस्थापनाची बांधिलकी २) कर्मचाऱ्यांचा सहभाग ३) कार्यस्थळाचा अभ्यास आणि धोके ओळखणे ४) संकट रोखणे आणि नियमन ५) सुरक्षितता आणि आरोग्य प्रशिक्षण ६) घटनांच्या नोंदी आणि मूल्यमापन.

हिंसा होऊ नये म्हणून हे सर्व केले तरी ती होणारच नाही याची हमी देता येत नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी थेट संबंध येणाऱ्या आरोग्यसेवेतील सर्व सदस्यांनी एकत्र येणे, संकटाचा सामना करण्याची तयारी, चांगले धोरण आणि प्रमाणित परिचालन पद्धती, सगळ्याची अधुनमधून रंगीत तालीम, कायदा यंत्रणेशी सतत सहयोग अशा काही गोष्टी केल्या तर आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले टाळता येतील. डॉक्टर मंडळींनी रुग्णांबद्दल सहानुभूती बाळगून परिस्थितीची सुस्पष्ट जाणीव वेळोवेळी दिली तरीही अनेक अनुचित प्रसंग टाळता येतील. 

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय