शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

केवढे हे क्रौर्य?

By admin | Updated: February 28, 2017 23:52 IST

दहशतवाद, बॉम्बस्फोट, भूसुरुंग सर्वात मोठी इमारत उडविली, रेल्वे रूळावरून घसरली, विमान कोसळले

दहशतवाद, बॉम्बस्फोट, भूसुरुंग सर्वात मोठी इमारत उडविली, रेल्वे रूळावरून घसरली, विमान कोसळले, शेकडो नागरिकांची हत्त्या अशा सारख्या बातम्या वाचून आणि दूरचित्रवाणीवरील दृश्ये पाहून मन बधीर झाले आहे़ काही वाटेनासे झाले आहे़ जीवघेणे क्रौर्य हासुद्धा आपल्या जगण्याचा भाग होऊन बसले आहे़ काहीच टाळता येत नाही, निवड करायला संधी नाही़ जे घडते ते उघड्या डोळ्यांनी पाहाणे, कानांनी ऐकणे आणि न बोलता तोंडावर बोट ठेवून सोशीत राहणे एवढेच आपल्या हाती आहे़ ‘कालचक्र हे अविरत फिरते/सारखा काळ चालला पुढे’ काळाबरोबर आपली फरपट़ त्याचे नाव जीवऩ सगळ्या गोष्टीला सीमा असते; पण क्रौर्याला नाही़ जातपात, गरीब श्रीमंत, उच्चनीच भेदाभेद नाहीत़ ते रोखण्याचे सामर्थ्य ईश्वराकडेसुद्धा नाही़ माणूस नावाचा प्राणी निर्माण करून तोही पस्तावला आहे़सृष्टीचे सुंदर दर्शन घेण्यासाठी त्याने दृष्टी दिली, दुसऱ्याचे दु:ख समजून घेण्यासाठी मन दिले़ कारुण्य ओळखण्याची शक्ती दिली़ डोळ्यात अश्रू दिले़ एकच अश्रू; पण नावे दु:खाश्रु आणि आनंदाश्रु़ जीवन साफल्यपूर्ण जगण्याचा मंत्र दिला़ मानवाने प्रतिसृष्टी उभी करून ईश्वरावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालविला आणि जगणेच अवघड होऊन गेले़ रेव्हरंड टिळकांची ‘केवढे हे क्रौर्य’ शालेय जीवनातील कविता आठवली़ करुणरसाने भरलेल्या या कवितेच्या वाचनाने वर्गातील सारी मुले रडत़ मुखी कवळ घेऊन पिलाला भरविणाऱ्या पक्षिणीचा व्याधाने घेतलेला बळी़ शेवट तर केवढा करुणामय़ ‘मातीत ते पसरिले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले’ अश्रूंचा गहीवर आवरता घेणे जमत नसे़ त्या कविता गेल्या़ बालमनही उडून गेले़ क्रौंच पक्षाचा वध एवढे क्षुल्लक कारण रामायण नावाच्या महाकाव्याला जन्मास घालते झाले़‘मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: सभा: यत्क्रौंच मिथुनाद् एकम् अवधी: काममोहितम्’ शोक श्लोकबद्ध होऊन बाहेर पडला़ पक्षाच्या मरणाने दु:खी होणारे हे मन कोठले? हजारो निरपराधांचे क्षणात बळी घेणारे क्रौर्य पाहून काहीही वेदना न होणारे आमचे मन कसले हो ! कळेल का? आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपणच शोधावी लागतात़ ‘फु लासारखे केवळ कोमल देऊ नको रे मन मज देवाअसती सुंदर हसरी सुमने जग आहे परि जळता लाव्हा’ ही शोधलेली उत्तरे म्हणजे असते आपुल्यापुरती पळवाट़ दगड झालेल्या मनाला विश्रांती भेटली काय आणि नाही काय? सगळे सारखेच़ ही आणखी एक पळवाट़ -डॉ. गोविंद काळे