शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हरिसाल खरंच किती डिजिटल झाले, सरकारचे खरे लाभार्थी कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:16 IST

मेळघाटातील हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल व्हिलेज असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

मेळघाटातील हरिसाल हे देशातील पहिले डिजिटल व्हिलेज असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. या गावाची डिजिटल जाहिरात देशभरात गाजली. मात्र काँग्रेसने आॅन दी स्पॉट रिपोर्ट करीत हरिसाल खरंच किती डिजिटल झाले, याचे वास्तव जनतेसमोर मांडले. त्यामुळे सरकारचे खरे लाभार्थी कोण, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा असलेल्या नागपुरातील ग्रामपंचायतीकडे पैसे नसल्याने ग्रामपंचायतींचे वायफाय ‘आॅफ’ झाले आहेत. डिजिटल इंडियाअंतर्गत जिल्ह्यातील ७७० ग्रामपंचायतींमध्ये वायफाय कनेक्शन देण्यात आले. बीएसएनएल आणि एका खासगी कंपनीच्या माध्यमातून या सेवा पुरविण्यात आल्या. ग्रामपंचायतीकडे असलेले उत्पन्नाचे स्रोत आणि वायफायचे बिल याचा ताळमेळ बसत नसल्याने आज ९० टक्के ग्रामपंचायतीत वायफाय सुविधा बंद झाल्या आहेत. सरकारचा डिजिटल व्हिलेज आणि डिजिटल जिल्ह्यामागचा उद्देश प्रामाणिक असला तरी त्याचे नेमके लाभार्थी कोण? ज्यांच्या हितासाठी ही संकल्पना तयार करण्यात आली त्यांना या योजनांचा लाभ मिळतोय का? याचे आॅडिट सरकारी यंत्रणांनी करणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडियावर ‘मी लाभार्थी, हे माझं सरकार...’ या जाहिरातींना उत्तर देण्यासाठी विरोधकांनी सरकारचे खरे लाभार्थी कोण ? कुणाला कुठे कसा फायदा झाला ? हे पटवून देणारे डिजिलट बॉम्ब व्हायरल केले आहेत. त्यामुळे भक्त अस्वस्थ आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या लाभार्थ्यांची पोलखोल करण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. नागपुरात कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या घरापर्यंत आमदार निधीतून रस्ता बांधण्यात आला. या रस्त्याच्या बांधकामाची माहिती देणाºया फलकावर आंबेकरचे नाव झळकले. सोशल मीडियावर संतोष आंबेकरच्या फोटोसह ‘होय मी लाभार्थी, हे माझं सरकार’ या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे भाजप नेते अस्वस्थ झाले. एरवी देशात कुठेही काही झाले तरी प्रतिक्रिया देण्यास तत्पर असलेले भाजपचे नागपुरातील प्रवक्ते या मुद्यावर आऊट आॅफ कव्हरेज राहिले. परवा महापालिकेच्या स्थायी समितीने नागपुरातील कचरा संकलन करणाºया कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेडला मंजूर खर्चापेक्षा ७.३३ कोटी रुपयांचा अधिकचा निधी वाढवून दिला. कनकने प्रामाणिकपणे कचरा उचलला असता तर नागपूरचा नंबर देशातील स्वच्छ शहराच्या यादीत अग्रकमावर असता. मात्र कनकच्या वाढीव बिलात ‘लाभार्थी’ अनेक असल्याने मनपात नेमके सरकार कुणाचे ? हा प्रश्न चर्चिला जात आहे.

टॅग्स :digitalडिजिटल