शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

संस्कृतीचा प्राण जपण्याची आशा!

By किरण अग्रवाल | Updated: December 9, 2017 05:07 IST

समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उन्नयनाच्या विचारांचे मंथन ज्यात घडावे असे अपेक्षित आहे, त्या कुंभमेळ्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश केला गेल्याने संस्कार व सामाजिक उद्बोधनाचा प्रवाह अविरत

समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक उन्नयनाच्या विचारांचे मंथन ज्यात घडावे असे अपेक्षित आहे, त्या कुंभमेळ्याचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश केला गेल्याने संस्कार व सामाजिक उद्बोधनाचा प्रवाह अविरत, अखंडित राहण्याबरोबरच संस्कृतीचा प्राण जपला जाण्याची अपेक्षाही बळावून गेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.देशातील अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन व नाशिक-त्र्यंबकेश्वर क्षेत्री दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा दिवसेंदिवस ‘हायटेक’ होत चालल्याने तशीही त्याची कीर्ती जागतिक पातळीपर्यंत पोहोचली आहेच. ‘विरक्ती’चा उपदेश करीत अत्याधुनिक सुख-सुविधांत रमणाºया आणि तीर्थाची थोरवी सांगत असतानाच स्वत: मात्र बाटलीबंद पाण्याचा वापर करणाºया बाबा आणि त्यांच्या चेल्यांच्या अनेकविध कथांनी कुंभमेळ्याच्या कीर्तीत अधिकचीच भर घातली आहे. कुंभमेळ्यातील साधू-महंतांचे वर्तन व व्यवहार चर्चित ठरत असतानाच त्यांच्या असण्यापेक्षा ‘दिसण्या’चीही चर्चा मोठ्या प्रमाणात झडत असते. त्यामुळेही अलीकडच्या काळात कुंभमेळ्याला गर्दी उलटून ‘जत्रे’चे स्वरूप प्राप्त होत गेले. तो केवळ आध्यात्मिक सोहळा न राहता शासकीय यंत्रणांच्या व भाविकांच्या दृष्टीनेही ‘इव्हेंट’ ठरू लागला आहे. अशा या सोहळ्याला आता ‘युनेस्को’च्या यादीत स्थान मिळाल्याने कुंभमेळ्याला अधिकृतरीत्या जागतिक परिमाण लाभणार आहे. कुंभस्थळांच्या पर्यटन विकास व वृद्धीच्या दृष्टीने तर ही बाब महत्त्वाची ठरावीच; पण त्याशिवाय सिंहस्थ कुंभपर्वाच्या योजनेमागे अभिप्रेत असलेल्या संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने उपायात्मक गोष्टी घडून येण्याचीही अपेक्षा यानिमित्ताने पुन्हा बळावून जाणे स्वाभाविक ठरून गेले आहे.कुंभमेळ्याला आज भलेही काहीसे वेगळे रूप व स्वरूप आलेले दिसत असले तरी, समाजाच्या सर्वांगीण उन्नयनाच्या सम्यक कृतीचा एक प्रवाह म्हणून त्याकडे पाहिले गेले आहे. मनुष्याला अशाश्वताकडून शाश्वताकडे, सांताकडून अनंताकडे व ध्येयशून्यतेकडून ध्येयवादाकडे नेणाºया संस्कृतीचे विचारमंथन होणे, त्यातून अध्यात्माधिष्ठित समाजाच्या धारणा अधिक दृढ होणे व पर्यायाने संस्कृती संवर्धनाचे मूळ प्राणतत्त्व जपले जाणे अभिप्रेत आहे. आज हे तसे अपवादानेच घडते. बुवा-बाबांच्या चमत्कृतींपुढे साधू-सन्याशांचे अध्यात्म मागे पडते. आजचे भक्त दिखाऊपणाला भुलतात त्यामुळे परंपरांमागील हेतंूचाच संकोच झाल्याखेरीज राहात नाही. साधूंचे ‘जलवे’ पाहून झाले व गंगा-गोदास्नानाची तिसरी पर्वणी आटोपली की सारेच कसे एकदम रिते झाल्यासारखे भासते, यामागील कारणही हेच की कुंभमेळ्याच्या आयोजनामागील अध्यात्माची बैठक मोडताना दिसून येते आहे. या लयास जाऊ पाहणाºया अगर क्षीण होऊ पाहणाºया ‘नाळे’ला बळकटी देण्याचे काम ‘युनेस्को’च्या सहभागामुळे घडून येत असते. भारतातील वैदिक मंत्रोच्चार परंपरा, मणिपूर नृत्य, छाऊ नृत्य आदींच्या यापूर्वीच्या समावेशाने ते दिसूनही येते. त्यामुळेच ‘ग्लॅमर’च्या डोळे दिपवून सोडणाºया वावटळीत अंग चोरून तग धरू पाहणारा मूळ संस्कृतीच्या संवर्धनाचा प्रवाह कुंभमेळ्याचाही ‘युनेस्को’च्या ऐतिहासिक वारसा यादीतील समावेशाने अधिक प्रशस्त होण्याची आशा जागली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक