शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

सणावाराचे दिवस, गर्दी टाळणे गरजेचे...

By किरण अग्रवाल | Updated: September 2, 2021 12:32 IST

Corona Viurs Threat : नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निर्बंधांचे पालन केले व खबरदारी घेतली तर तिसरी लाट रोखता येऊ शकेल; पण तेच होताना दिसत नाही.

- किरण अग्रवाल

 दहीहंडी फोडून झाली, आता गणेशोत्सव येऊ घातला आहे. त्यानंतर लागोपाठ सण उत्सवाचे दिवस असल्याने बाजारात आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. कोरोनाच्या सावटातून दूर होत आकारास आलेले हे चलनवलन व चैतन्य टिकवून ठेवायचे तर कोरोना गेला असे समजून चालणार नाही. शासनाने सक्ती करण्याची वेळ येऊ न देता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने निर्बंधांचे पालन केले व खबरदारी घेतली तर तिसरी लाट रोखता येऊ शकेल; पण तेच होताना दिसत नाही. सणासुदीत सभा, मेळावे घेऊन गर्दी करणे टाळा असे निर्देश देत केंद्राने कोरोनाविषयक निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढविले आहेत. राज्यानेही मार्गदर्शक सूचना दिल्या असून, सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे मुंबई उच्च न्यायालयानेही सांगितले आहे; परंतु अशी गर्दी व विशेषतः राजकीय आंदोलने कमी झालेली नाहीत. केरळमध्ये ओणमनंतर रुग्ण वाढले, तसे आपल्याकडे होऊ द्यायचे नसेल तर प्रत्येकानेच आपली जबाबदारी ओळखून सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

दुसरी लाट ओसरली असे म्हटले जाते; पण अजूनही देशात प्रतिदिनी सुमारे चाळीस हजारावर रुग्ण आढळत असून, ३५०पेक्षा अधिक जणांचा मृत्यू होत आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या पावणेचार लाखांच्या घरात आहे. महाराष्ट्रात प्रतिदिनी सुमारे चार हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून, शंभरपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. पन्नास हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत, त्यामुळे देशात केरळपाठोपाठ महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक म्हटली जात आहे. तिसरी लाट येणार की नाही येणार, येणार तर कधी येणार व कितपत नुकसानदायी राहणार? याबद्दल विविध मतप्रवाह आहेत खरे; पण ती येणार याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. मुंबईच्या मानखुर्द येथील एका बालगृहातील १८ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून, औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील बारा कैदीही बाधित आढळून आले आहेत. तिसरी लाट आगामी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कमाल उंची गाठेल व तेव्हा प्रतिदिनी एक लाख लोकांना बाधा होईल, अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच सेंटर फॉर डिसिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी)चा एक अहवाल आला असून, लसींचा कालांतराने प्रभाव कमी होत चालल्याचे त्यात म्हटले आहे. पण असे सारे चित्र असूनही लोक म्हणावी तशी खबरदारी घेताना दिसत नाहीत.

राज्यात कोरोनाविषयक निर्बंध आहेत; पण ते कागदावरच असल्यासारखे दिसते आहे. लोकांकडून स्वयंस्फूर्तीने त्यांचे पालन होत नाहीच, आणि सरकारी यंत्रणाही त्याबाबत गंभीर दिसत नाहीत. यातही सामान्य माणसे व संस्था थोड्याफार भीतीपोटी सावध राहताना दिसतात; परंतु राजकीय पक्ष मात्र निर्बंध न जुमानता सक्रिय झाले आहेत. मंदिरे खुली करण्यासाठी नुकताच राज्यभरात भाजपतर्फे शंखनाद करण्यात आला, तर शासनाने निर्बंध घातले असतानाही मनसेतर्फे काही ठिकाणी दहीहंडी फोडली गेली. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक प्रकरणावरून भाजप व शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसून आले. इतरही विविध कारणांवरून जागोजागी राजकीय आंदोलने जोमात असून, यात कोरोनाविषयक निर्बंधांचे कुठलेही पालन होताना दिसत नाही. कोरोना गेला, तो आता पुन्हा येणार नाही अशा अविर्भावात सारे सुरू आहे. पूर्ण क्षमतेने वाहतूकही सुरू झाली आहे. ग्रामीण भागात अजून एसटी सुरू झालेली नाही, परंतु ज्या मार्गावर ती सुरू आहे ती एसटी असो की खासगी वाहने, भरभरून धावत आहेत. यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा तर उडतोच आहे; पण मास्कदेखील वापरले जाताना दिसत नाहीत. यापुढे गणेशोत्सव व अन्य सणवार आहेत, यातही असेच सुरू राहिले तर तिसऱ्या लाटेला आपसूक निमंत्रण मिळून जाणे स्वाभाविक ठरेल.

महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडे आपण डेल्टा प्लस या विषाणूची चिंता करतो आहोत; पण दक्षिण आफ्रिका व चीन, मॉरिशस, इंग्लंड आदी काही देशात सी 1.2 हा कोरोनाचा नवा विषाणू आढळला असून, तो अधिक घातक व कोरोना लसींनाही दाद न देणारा असण्याची शक्यता नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसिजेसच्या संशोधनातून पुढे आली आहे. हा विषाणू शरीरात अँटिबॉडीज विकसित होण्याच्या प्रक्रियेतही बाधा निर्माण करतो, असेही अहवालात म्हटले आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी ही स्थिती आहे. केंद्र व राज्य सरकारही लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे खरा परंतु लस घेतली म्हणजे आपण पूर्णता सुरक्षित झालो असे समजून चालणार नाही. लॉकडाऊन तर कुणालाच नको आहे, उद्योगांनाही व नोकरदारांनाही; कारण त्यामुळे सर्वांनाच खूप भोगावे लागले, आर्थिक आघाडीवर आपण मागे पडलो. तेव्हा आता पुन्हा बंदची वेळ यायलाच नको. कोरोना आता नेहमीचा साथी आहे हे समजूनच सारे सुरू ठेवावे लागेल, पण ते करताना खबरदारीकडे दुर्लक्ष नको. तेव्हा कोरोनापासून व तिसऱ्या लाटेपासून बचावायचे तर स्वयंशिस्त व शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन कटाक्षाने केले जाणे गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस