शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाचे रखवालदार!  ऐतिहासिक वारशांबाबत प्रशासन कमालीचे बेफिकीर

By सुधीर महाजन | Updated: September 27, 2017 03:25 IST

ऐतिहासिक वारसा हा अनमोल खजिन्यासारखा असतो. सर्व शहरे किंवा परिसराला हे भाग्य मिळत नाही. औरंगाबाद शहर आणि परिसर हा त्यासाठी समृद्ध आहे. अगदी सातवाहनांपासून हा वारसा या परिसराला लाभलेला आहे.

ऐतिहासिक वारसा हा अनमोल खजिन्यासारखा असतो. सर्व शहरे किंवा परिसराला हे भाग्य मिळत नाही. औरंगाबाद शहर आणि परिसर हा त्यासाठी समृद्ध आहे. अगदी सातवाहनांपासून हा वारसा या परिसराला लाभलेला आहे. यादवांची राजधानीच देवगिरी होती. वेरुळ, अजिंठा ही जागतिक ओळख आहे. सोबत औरंगाबाद शहरही त्या दृष्टीने समृद्धच म्हणावे लागेल. ४०० वर्षांपूर्वी मलिकअंबरने ते नावारूपाला आणले. पुढे मोगल, निझाम यांच्यासाठी हे शहर महत्त्वाचे होते. मोगलांचा दख्खन सुभा असल्याने औरंगजेबाचे वास्तव्य, अशा वेगवेगळ्या राजवटीच्या खुणा पावलोपावली आज शहरात दिसतात. बुलंद दरवाजे, इमारतींच्या रूपाने आजही शहराची शान वाढवतात. शे-दोनशे वर्षे उन्हाळे-पावसाळे सोसूनही त्या तग धरून आहेत. या शहराच्या ऐतिहासिक वारशांबाबत प्रशासन कमालीचे बेफिकीर असल्यामुळे यातील काही तटबंदी इमारती पडल्या. काही लोकांनी पाडल्या. तरीही प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही.आपल्या देदीप्यमान ऐतिहासिक वारशाची परंपरा सांगत जनमत वळवण्याचा आणि मतपेटी वाढवण्याचा हा काळ; पण मतांसाठी इतिहासाचा जागर करणारे तो जतन करीत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीने या शहराचा इतिहास जतन करण्यासाठी उभी केलेली लोकचळवळ हा अलीकडच्या काळात सुस्त पडलेल्या औरंगाबाद शहरासाठी अतिशय सुखद असा अनुभव आहे. अशाच चळवळीतून इतिहासाचे जतन होत असते. औरंगाबादेत या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे. प्रशासन ते प्रशासनच. सर्वसामान्य लोकांमध्ये तर या वारशांबाबत कुठे आपुलकी आहे? लोकांमध्येही या वारशांबाबत कमालीची अनास्था आहे. जोपर्यंत लोक पुढे येणार नाहीत तोपर्यंत त्याचे संरक्षण व संवर्धन होणार नाही, हे तितकेच खरे. म्हणून इतिहासाविषयी लोकजागृती आवश्यक असते. हे काम ‘औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी’ जाणीवपूर्वक पार पाडत आहे. डॉ. वि.ल. धारूरकर, डॉ. बिना सेंगर, डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, अ‍ॅड. स्वप्निल जोशी, चंद्रशेखर बोर्डे, निखिल भालेराव आदी इतिहासतज्ज्ञ आणि इतिहासप्रेमी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी हा लोकजागर सुरू केला. शहराचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी सुरू केलेला हेरिटेज वॉक हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. इतिहास लोकांना सांगणे, तो जतन करण्यासाठी सतत प्रयत्न करणे तसेच संवर्धनासाठी प्रशासनाकडे आग्रह धरणे यासोबतच सामान्य माणसाला शहराचे ऐतिहासिक महत्त्व समजावे यासाठी हा वॉक घेतला जातो. ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन त्यांचे महत्त्व, तेथे घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी याची माहिती लोकांना दिली जाते. यातून जागृती निर्माण केली जाते. त्याला शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शेकडो लोक या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होत आहेत. या इतिहासप्रेमींना संवर्धनाच्या कामात सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी अशा जुन्या इमारतींची स्वच्छता करणे, या वास्तूंचे नकाशा मापन करणे, त्यांची चित्रे काढून घेणे यासोबत शहरात ऐतिहासिक विषयांवर कार्यशाळा आयोजित करणे, आंतरराष्ट्रीय परिषदा भरवून देशोदेशीचे इतिहासतज्ज्ञ बोलविणे असे वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून राबविले जातात. केवळ इतिहासपे्रमींच्या बळावर हे आयोजन केले जाते. प्रशासनाच्या अनास्थेमुळे दमडीमहल, खासगेटसारख्या वास्तू पाडण्यात आल्या. त्याचा निषेध करण्यासाठी मेणबत्ती मोर्चा काढून प्रशासनाला चुकींची जाणीव करून दिलीच शिवाय लोकांचा सहभागही वाढविला. असे एक ना अनेक उपक्रम ही संस्था राबविते.