शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

आजचा अग्रलेख: अखेर घोडे गंगेत न्हाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 07:59 IST

महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे घोडे अखेर गंगेत न्हाले.

महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे घोडे अखेर गंगेत न्हाले. राज्याचे निवृत्त मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील समर्पित मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला आणि दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. निकाल येताच राजकीय श्रेयवादही सुरू झाला आहे. 

नाट्यमय सत्तांतरानंतर पदारूढ झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आपल्या सरकारचे यश असल्याचे म्हटले आहे, तर बांठिया आयोगाचे गठन आमच्या काळात झाले, त्याचे कामही आम्हीच सत्तेवर असताना पूर्ण झाले. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे श्रेय आमचेच, असा महाविकास आघाडीचा दावा आहे. राजकीय नेत्यांचे हे असे ‘गोविंद घ्या, गोपाळ घ्या’ सुरू असले तरी ओबीसींमधील समाज आनंदी आहेत का, हे लगेच सांगता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुरू झालेला जल्लोष राजकीय पक्षांचाच आहे. किमान त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सगळेच आरक्षण संपविण्याचे सुनियोजित षडयंत्र असून, ते ओबीसींच्या निमित्ताने उघड झाल्याचे बाेलले जात होते. परंतु, लोकशाहीत लोकांना जे हवे ते संपविले जाऊ शकत नाही, हे निकालाने स्पष्ट झाले. 

अर्थात, मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्राच्या आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीच्या विश्वासार्हतेचा विचार न्यायालयाने केलेला नाही. ट्रिपल टेस्टनुसार आकडेवारी आणि तिची प्रक्रिया एवढ्याच आधारावर अनुसूचित जाती व जमातीच्या घटनादत्त आरक्षणासह एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढे जाणार नाही आणि ओबीसींना कमाल २७ टक्के आरक्षण देता येईल, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. १९९४ पासून ग्रामपंचायतींपासून महापालिकांपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या २७ टक्के आरक्षणाला आकडेवारीचा ठोस आधार नाही व अनेक ठिकाणी त्यामुळे एकूण आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडते, असा आक्षेप होता. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने २०१० मधील के. कृष्णमूर्ती खटल्यातील संदर्भ देत समर्पित आयोगाचे गठन, मागास जातींची आकडेवारी व लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्वाचा इम्पिरिकल डेटा अशा ट्रिपल टेस्टची सूचना केली. आयोगाचा अहवाल सादर होईपर्यंत आरक्षण देता येणार नाही, असा आदेश मार्च २०२१मध्ये आला आणि तोवर न्यायालयाला झुलवणारे सरकार अडचणीत आले. तेव्हा महाविकास आघाडी सरकार नुकतेच सत्तेत आले होते. आघाडी सरकारने वर्षभर सर्वच बाबतीत प्रचंड वेळकाढूपणा केला. कसले तरी अर्ज न्यायालयापुढे सादर केले गेले. दरवेळी न्यायालयाने फटकारले तरी त्यात सुधारणा झाली नाही. मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचाही प्रकार घडला. 

सत्ताधारी आघाडीतील ओबीसी नेते मात्र बाहेर मेळावे घेऊन भाषणे करीत राहिले. वर्षभरानंतर स्पष्ट झाले, की न्यायालयाच्या तंतोतंत अंमलबजावणीशिवाय तरणोपाय नाही. तेव्हा कुठे बांठिया आयोगाचे गठन करण्यात आले. त्या आयोगाचा अहवाल दहा दिवसांपूर्वी मुख्य सचिवांकडे सादर झाला. त्याच्याच आधारे सर्वोच्च न्यायालयाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली आहे. असे असले तरी बांठिया आयोगाचा अहवाल परिपूर्ण नाही, अशा तक्रारी तो सादर झाल्यापासून होत आहेत. आयोगाने राज्यातील ओबीसी लोकसंख्या ३७ टक्के गृहीत धरल्याबद्दल आक्षेप आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या कमी आहे, तिथे पन्नास टक्क्यांचा उंबरठा गाठील, असे वाढीव आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. ही मागणी आता सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकेल. त्याहीपलीकडे जातीनिहाय जनगणनेची जुनी मागणी पुन्हा उफाळून आली आहे. 

बिहार सरकारने तर जातगणनेचा ठरावही घेऊन टाकला व त्यावरून राजकीय रणकंदनही माजले. अशारीतीने जातगणना व्हावी की नको, यावर मतमतांतरेही आहेत. यामुळे जाती-जातींमध्ये कटुता वाढेल, असे विरोधकांचे म्हणणे आहे तर लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व या तत्त्वानुसार, तसेच जात हा आपल्या राजकारणाचा पाया असल्याने कुणाची किती लोकसंख्या हे एकदा स्पष्ट होऊन जाऊ द्या, असे या गणनेच्या समर्थकांचे म्हणणे आहे. दोन्ही मतांची तीव्रता पाहता या मागणीकडे कोणत्याही सरकारला अधिक दुर्लक्ष करता येणार नाही.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय