शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

ऐतिहासिक पाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 01:13 IST

ताजमहाल ही जगातली सर्वात सुंदर व देखणी वास्तू आहे. ती पाहायला साऱ्या जगातून येणाºया पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून देशाला मिळणारे चलनही मोठे आहे.

ताजमहाल ही जगातली सर्वात सुंदर व देखणी वास्तू आहे. ती पाहायला साऱ्या जगातून येणाºया पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडून देशाला मिळणारे चलनही मोठे आहे. शहाजहान बादशहाने आपली लाडकी पत्नी मुमताजमहल हिच्या स्मरणार्थ बांधलेली ही वास्तू आरंभापासूनच जगाच्या आकर्षणाचे केंद्र बनली आणि जगातल्या थोड्या मानवनिर्मित आश्चर्यात तिची गणना झाली. अशा वास्तूचे जतन करणे हा राष्ट्रीय संपत्तीएवढाच देशाचा सांस्कृतिक वैभवाच्या रक्षणाचाही भाग आहे. पाश्चात्त्य देशातील अशा वैभवशाली वास्तूंचे रक्षण केवढे काळजीपूर्वक व दक्षतेने केले जाते ते पाहिले की ताजमहालकडे होत असलेल्या दुर्लक्षाविषयी आपलेही मन विषण्ण होते. या दुर्लक्षाबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व उत्तरप्रदेशच्या सरकारांना तंबी दिली असून या वास्तूचे जतन करता येत नसेल तर ती बंद करा किंवा सरळ पाडून टाका असे त्यांना वैतागाने ऐकविले आहे. देशातील सर्वाधिक सुंदर इमारतीचा असा शेवट झालेला देशातील कोणत्याही नागरिकाला आवडणार नाही. शिवाय तो देशाच्या सांस्कृतिक इतिहासावरील सर्वात मोठा डागही ठरेल. अलाहाबादेत मायावतीचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हापासूनच या वास्तूकडे सरकार जाणीवपूर्वक वा अजाणतेपणे दुर्लक्ष करू लागले. मायावतींना स्वत:चे पुतळे व त्याभोवती हत्ती या त्यांच्या निवडणूक चिन्हांची रांग उभी करण्याची जी खोड होती त्यापुढे त्यांना ताजमहालचे जागतिक महात्म्य जाणवलेही नाही. परिणामी पर्यावरणातील बिघाडामुळे ताजमहालचा संगमरवर पिवळा होऊ लागला आणि मायावतींच्या सरकारने त्याच्या यमुनेकडील भागात फुटकळ दुकाने बांधायलाही परवानगी दिली. मायावतींच्या पश्चात सत्तेवर आलेल्या अखिलेश यादवांनी त्या वास्तूचे जतन करण्याचे काही प्रयत्न केले. मात्र त्यासाठी हव्या असलेल्या साºया सोई व सुधारणा पुरविण्यात त्यांचेही सरकार अपुरेच पडले. आताचे योगी आदित्यनाथ यांचे भगवे सरकार हे ठरवूनच ताजमहालचा द्वेष करणारे आहे. या सरकारच्या मते ही जगातली सुंदर वास्तू नसून एका मुस्लीम राणीचा तो मकबरा आहे. आदित्यनाथांच्या हिंदुत्ववादाला असा मकबरा खुपणाराही आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारने प्रथम ताजमहाल ही वास्तू उत्तर प्रदेशच्या पर्यटनस्थळांच्या यादीतून वजा केली. त्यामुळे स्वाभाविकच पर्यटनस्थळांना दिले जाणारे संरक्षण व त्यांच्या जतनाच्या यादीतूनही ताजमहाल वजा झाले. तेव्हापासून या वास्तूची अवकळा दिवसेंदिवस वाढत गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आज जे संतापाने ऐकविले त्यामागे एका देखण्या वास्तूला या सरकारांनी आज आणलेली ही अवकळा आहे. भारताचा इतिहास हा केवळ कोणा एका धर्माचा वा संस्कृतीचा इतिहास नाही. तो त्यात आलेल्या सर्वच धर्मांचा, राजांचा आणि राजवटींचा इतिहास आहे. तो जसाच्या तसा जतन करणे व त्याचे रक्षण करीत त्याचे सौंदर्य वाढवीत नेणे ही सरकारची सांस्कृतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी सरकारला मोठ्या प्रमाणावर जागतिक चलन प्राप्त करून देणारीही आहे. एका अर्थाने इतिहासाने वर्तमानाला दिलेले हे आर्थिक वरदान आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यामागे आदित्यनाथांच्या सरकारची धार्मिक वक्रदृष्टी असेल तर मात्र ते एका मोठ्या सांस्कृतिक व राष्ट्रीय अपराधाचे धनी ठरणारे सरकार ठरेल. भारतात जैन, बुद्ध, इस्लाम व ब्रिटिश राज्यांचा इतिहास सांगणाºया अनेक देखण्या वास्तू आज उभ्या आहेत. त्या या देशाच्या ऐतिहासिक वैभवासोबतच त्याच्या वर्तमान देखणेपणात भर घालीत आहेत. ताजमहाल ही या साºया वास्तूत सर्वाधिक देखणी व मौल्यवान वास्तू आहे. तिने जगभरच्या अनेक चित्रकारांना, कवींना व कलाकारांना प्रतिभेच्या प्रेरणा दिल्या आहेत. जगाच्या वाङ्मयात अमर झालेली व साºया जगात वाखाणली जाणारी ही भारतीय वास्तू आहे. अशा वास्तूचे जतन करण्याची जबाबदारी सरकार टाळत असेल तर तो त्याचा केवळ धार्मिक वा सांस्कृतिकच गुन्हा ठरणार नसून ते त्याचे ऐतिहासिक पाप म्हणूनही वर्तमानात नोंदविले जाणार आहे.

टॅग्स :Taj MahalताजमहालGovernmentसरकार