शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

राष्ट्रपतींची ऐतिहासिक भेट, के. आर. नारायणन यांच्यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे दुसरे राष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:12 IST

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अलीकडची नागपूर भेट ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीला एक वेगळे महत्त्व आहे व या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात तिची ठळकपणे नोंदही होणार आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अलीकडची नागपूर भेट ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीला एक वेगळे महत्त्व आहे व या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात तिची ठळकपणे नोंदही होणार आहे. के. आर. नारायणन यांच्यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे ते दुसरे राष्ट्रपती आहेत.कोविंद हे राष्ट्रपतिपदी आरुढ झाल्यानंतर पहिल्यांदाच दीक्षाभूमीला आले. राष्ट्रपतिपद हे देशाचे सर्वोच्च संविधानिक पद आहे. त्या पदाच्या काही परंपरा आणि शिष्टाचार आहेत. या परंपरेमुळे या पदावर असलेल्या व्यक्तींना अनेक मर्यादा असतात. ती बंधने इच्छा असूनही तोडता येत नाहीत. डॉ. शंकरदयाल शर्मा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी या महामहिम व्यक्तींनी त्याबद्दलची आपली खंत अनेकदा बोलूनही दाखविली आणि प्रसंगी हे जोखड तोडण्याचा प्रयत्नही केला. डॉ. शंकरदयाल शर्मा राष्ट्रपती असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या सत्कार समारंभाला आले होते. या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार करण्यासाठी डॉ. शर्मा परंपरा झुगारुन व्यासपीठावरुन खाली उतरले आणि त्यांनी सत्कारमूर्र्तींच्या जवळ जाऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना वंदन केले. सार्वजनिक समारंभात व्यासपीठावर राष्ट्रपतींसाठी ठेवण्यात येणाºया स्वतंत्र आसन व्यवस्थेचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना प्रचंड संताप यायचा. त्यांना अशी व्यवस्था नकोशी होती. परवा राष्ट्रपती कोविंदसुद्धा अशाच साधेपणाने वावरले. राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर या पदावरील व्यक्तीला कुठे भेट द्यायची असेल तर एखाद्या राज्याच्या राजधानीला प्राधान्य द्यावे, असा शिरस्ता आहे. पण, राष्ट्रपती कोविंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेने पुनित झालेल्या दीक्षाभूमीवर सर्वप्रथम आले. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा संदेश दिला, त्या महापुरुषाचा धम्मभूमीला राष्ट्रपती कोविंद यांनी सर्वप्रथम भेट देणे, ही घटना लोकशाही प्रदान देशात ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. याच भेटीत राष्ट्रपती महोदयांनी जैन संत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचीही भेट घेतली. विद्यासागरजी महाराज यांनी यावेळी ‘इंडियाला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या’, असे राष्ट्रपतींना केलेले आवाहन वर्तमान राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. केंद्र सरकारची धोरणे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतक-याला कुमकुवत करणारी आहेत. ‘हे सरकार आपले नाही’ ही भावना गरीब माणसाच्या मनात बळावत आहे. वंचितांचा हा मोठा वर्ग आत्मनिर्भर व्हावा, ही आचार्य श्रींची कळकळ राष्ट्रपतींनाही आपली वाटावी, एवढे आत्मबळ कोविंद यांना नागपूर भेटीने नक्कीच दिले असणार.