शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींची ऐतिहासिक भेट, के. आर. नारायणन यांच्यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे दुसरे राष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:12 IST

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अलीकडची नागपूर भेट ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीला एक वेगळे महत्त्व आहे व या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात तिची ठळकपणे नोंदही होणार आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अलीकडची नागपूर भेट ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीला एक वेगळे महत्त्व आहे व या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात तिची ठळकपणे नोंदही होणार आहे. के. आर. नारायणन यांच्यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे ते दुसरे राष्ट्रपती आहेत.कोविंद हे राष्ट्रपतिपदी आरुढ झाल्यानंतर पहिल्यांदाच दीक्षाभूमीला आले. राष्ट्रपतिपद हे देशाचे सर्वोच्च संविधानिक पद आहे. त्या पदाच्या काही परंपरा आणि शिष्टाचार आहेत. या परंपरेमुळे या पदावर असलेल्या व्यक्तींना अनेक मर्यादा असतात. ती बंधने इच्छा असूनही तोडता येत नाहीत. डॉ. शंकरदयाल शर्मा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी या महामहिम व्यक्तींनी त्याबद्दलची आपली खंत अनेकदा बोलूनही दाखविली आणि प्रसंगी हे जोखड तोडण्याचा प्रयत्नही केला. डॉ. शंकरदयाल शर्मा राष्ट्रपती असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या सत्कार समारंभाला आले होते. या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार करण्यासाठी डॉ. शर्मा परंपरा झुगारुन व्यासपीठावरुन खाली उतरले आणि त्यांनी सत्कारमूर्र्तींच्या जवळ जाऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना वंदन केले. सार्वजनिक समारंभात व्यासपीठावर राष्ट्रपतींसाठी ठेवण्यात येणाºया स्वतंत्र आसन व्यवस्थेचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना प्रचंड संताप यायचा. त्यांना अशी व्यवस्था नकोशी होती. परवा राष्ट्रपती कोविंदसुद्धा अशाच साधेपणाने वावरले. राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर या पदावरील व्यक्तीला कुठे भेट द्यायची असेल तर एखाद्या राज्याच्या राजधानीला प्राधान्य द्यावे, असा शिरस्ता आहे. पण, राष्ट्रपती कोविंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेने पुनित झालेल्या दीक्षाभूमीवर सर्वप्रथम आले. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा संदेश दिला, त्या महापुरुषाचा धम्मभूमीला राष्ट्रपती कोविंद यांनी सर्वप्रथम भेट देणे, ही घटना लोकशाही प्रदान देशात ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. याच भेटीत राष्ट्रपती महोदयांनी जैन संत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचीही भेट घेतली. विद्यासागरजी महाराज यांनी यावेळी ‘इंडियाला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या’, असे राष्ट्रपतींना केलेले आवाहन वर्तमान राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. केंद्र सरकारची धोरणे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतक-याला कुमकुवत करणारी आहेत. ‘हे सरकार आपले नाही’ ही भावना गरीब माणसाच्या मनात बळावत आहे. वंचितांचा हा मोठा वर्ग आत्मनिर्भर व्हावा, ही आचार्य श्रींची कळकळ राष्ट्रपतींनाही आपली वाटावी, एवढे आत्मबळ कोविंद यांना नागपूर भेटीने नक्कीच दिले असणार.