शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

राष्ट्रपतींची ऐतिहासिक भेट, के. आर. नारायणन यांच्यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे दुसरे राष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:12 IST

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अलीकडची नागपूर भेट ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीला एक वेगळे महत्त्व आहे व या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात तिची ठळकपणे नोंदही होणार आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अलीकडची नागपूर भेट ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीला एक वेगळे महत्त्व आहे व या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात तिची ठळकपणे नोंदही होणार आहे. के. आर. नारायणन यांच्यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे ते दुसरे राष्ट्रपती आहेत.कोविंद हे राष्ट्रपतिपदी आरुढ झाल्यानंतर पहिल्यांदाच दीक्षाभूमीला आले. राष्ट्रपतिपद हे देशाचे सर्वोच्च संविधानिक पद आहे. त्या पदाच्या काही परंपरा आणि शिष्टाचार आहेत. या परंपरेमुळे या पदावर असलेल्या व्यक्तींना अनेक मर्यादा असतात. ती बंधने इच्छा असूनही तोडता येत नाहीत. डॉ. शंकरदयाल शर्मा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी या महामहिम व्यक्तींनी त्याबद्दलची आपली खंत अनेकदा बोलूनही दाखविली आणि प्रसंगी हे जोखड तोडण्याचा प्रयत्नही केला. डॉ. शंकरदयाल शर्मा राष्ट्रपती असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या सत्कार समारंभाला आले होते. या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार करण्यासाठी डॉ. शर्मा परंपरा झुगारुन व्यासपीठावरुन खाली उतरले आणि त्यांनी सत्कारमूर्र्तींच्या जवळ जाऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना वंदन केले. सार्वजनिक समारंभात व्यासपीठावर राष्ट्रपतींसाठी ठेवण्यात येणाºया स्वतंत्र आसन व्यवस्थेचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना प्रचंड संताप यायचा. त्यांना अशी व्यवस्था नकोशी होती. परवा राष्ट्रपती कोविंदसुद्धा अशाच साधेपणाने वावरले. राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर या पदावरील व्यक्तीला कुठे भेट द्यायची असेल तर एखाद्या राज्याच्या राजधानीला प्राधान्य द्यावे, असा शिरस्ता आहे. पण, राष्ट्रपती कोविंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेने पुनित झालेल्या दीक्षाभूमीवर सर्वप्रथम आले. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा संदेश दिला, त्या महापुरुषाचा धम्मभूमीला राष्ट्रपती कोविंद यांनी सर्वप्रथम भेट देणे, ही घटना लोकशाही प्रदान देशात ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. याच भेटीत राष्ट्रपती महोदयांनी जैन संत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचीही भेट घेतली. विद्यासागरजी महाराज यांनी यावेळी ‘इंडियाला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या’, असे राष्ट्रपतींना केलेले आवाहन वर्तमान राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. केंद्र सरकारची धोरणे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतक-याला कुमकुवत करणारी आहेत. ‘हे सरकार आपले नाही’ ही भावना गरीब माणसाच्या मनात बळावत आहे. वंचितांचा हा मोठा वर्ग आत्मनिर्भर व्हावा, ही आचार्य श्रींची कळकळ राष्ट्रपतींनाही आपली वाटावी, एवढे आत्मबळ कोविंद यांना नागपूर भेटीने नक्कीच दिले असणार.