शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

राष्ट्रपतींची ऐतिहासिक भेट, के. आर. नारायणन यांच्यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे दुसरे राष्ट्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:12 IST

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अलीकडची नागपूर भेट ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीला एक वेगळे महत्त्व आहे व या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात तिची ठळकपणे नोंदही होणार आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अलीकडची नागपूर भेट ही सर्वार्थाने ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. राष्ट्रपतींच्या या भेटीला एक वेगळे महत्त्व आहे व या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात तिची ठळकपणे नोंदही होणार आहे. के. आर. नारायणन यांच्यानंतर दीक्षाभूमीला भेट देणारे ते दुसरे राष्ट्रपती आहेत.कोविंद हे राष्ट्रपतिपदी आरुढ झाल्यानंतर पहिल्यांदाच दीक्षाभूमीला आले. राष्ट्रपतिपद हे देशाचे सर्वोच्च संविधानिक पद आहे. त्या पदाच्या काही परंपरा आणि शिष्टाचार आहेत. या परंपरेमुळे या पदावर असलेल्या व्यक्तींना अनेक मर्यादा असतात. ती बंधने इच्छा असूनही तोडता येत नाहीत. डॉ. शंकरदयाल शर्मा, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी या महामहिम व्यक्तींनी त्याबद्दलची आपली खंत अनेकदा बोलूनही दाखविली आणि प्रसंगी हे जोखड तोडण्याचा प्रयत्नही केला. डॉ. शंकरदयाल शर्मा राष्ट्रपती असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या सत्कार समारंभाला आले होते. या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा सत्कार करण्यासाठी डॉ. शर्मा परंपरा झुगारुन व्यासपीठावरुन खाली उतरले आणि त्यांनी सत्कारमूर्र्तींच्या जवळ जाऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना वंदन केले. सार्वजनिक समारंभात व्यासपीठावर राष्ट्रपतींसाठी ठेवण्यात येणाºया स्वतंत्र आसन व्यवस्थेचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना प्रचंड संताप यायचा. त्यांना अशी व्यवस्था नकोशी होती. परवा राष्ट्रपती कोविंदसुद्धा अशाच साधेपणाने वावरले. राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर या पदावरील व्यक्तीला कुठे भेट द्यायची असेल तर एखाद्या राज्याच्या राजधानीला प्राधान्य द्यावे, असा शिरस्ता आहे. पण, राष्ट्रपती कोविंद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेने पुनित झालेल्या दीक्षाभूमीवर सर्वप्रथम आले. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, जगाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा संदेश दिला, त्या महापुरुषाचा धम्मभूमीला राष्ट्रपती कोविंद यांनी सर्वप्रथम भेट देणे, ही घटना लोकशाही प्रदान देशात ऐतिहासिक ठरावी अशीच आहे. याच भेटीत राष्ट्रपती महोदयांनी जैन संत आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचीही भेट घेतली. विद्यासागरजी महाराज यांनी यावेळी ‘इंडियाला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या’, असे राष्ट्रपतींना केलेले आवाहन वर्तमान राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. केंद्र सरकारची धोरणे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतक-याला कुमकुवत करणारी आहेत. ‘हे सरकार आपले नाही’ ही भावना गरीब माणसाच्या मनात बळावत आहे. वंचितांचा हा मोठा वर्ग आत्मनिर्भर व्हावा, ही आचार्य श्रींची कळकळ राष्ट्रपतींनाही आपली वाटावी, एवढे आत्मबळ कोविंद यांना नागपूर भेटीने नक्कीच दिले असणार.