शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
3
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
4
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
5
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
6
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
7
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
8
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
9
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
10
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
11
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
12
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
13
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
14
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
15
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
16
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
17
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
18
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
19
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
20
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार

कलेला कोंदण

By admin | Updated: February 16, 2016 03:09 IST

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कला अकादमी स्थापन होण्याचा मार्ग सुकर आणि प्रशस्त झाला, हे कलोपासकांच्या दृष्टीने सुचिन्ह आहे

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कला अकादमी स्थापन होण्याचा मार्ग सुकर आणि प्रशस्त झाला, हे कलोपासकांच्या दृष्टीने सुचिन्ह आहे. लोकशाही व्यवस्थेत राजाश्रय हा शब्द वाच्यार्थाने हद्दपार झाला, पण लक्ष्यार्थाने त्याची गरज शिल्लक आहेच. त्याच कारणास्तव तब्बल ६२ वर्षांपूर्वी दिल्लीत राष्ट्रीय पातळीवरील ललित कला अकादमीची स्थापना झाली. काळाच्या ओघात अनेक राज्यांमध्ये तिची केंद्रे उभी राहिली. कोलकाता, लखनौ, भुवनेश्वर अशा काही ठिकाणी तिची विभागीय केंद्रेही कार्यरत झाली. आश्चर्य म्हणजे ललित कला अकादमीचे केंद्र, एकूणच सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ आणि कलेच्या प्रांतात अग्रेसर राहिलेल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आले नाही. चित्रकार, शिल्पकार आणि तत्सम दृश्य कलांना नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम महाराष्ट्रातील अनेक कलाकारांनी अशी व्यापक संस्थात्मक रचना पाठीशी नसतानाही केले. पण म्हणून अकादमीसारख्या संस्थेची या राज्याला गरजच नाही, असे मानण्याचे कारण नाही. पूर्वसूरींकडून मिळालेल्या भव्य-दिव्य वारशात समकालीन कलाविष्कारांची अभिजात स्वरूपाची भर पडावयाची असेल, तर असे संस्थात्मक बळ गरजेचे आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष आणि ख्यातकीर्त चित्रकार वासुदेव कामत यांनी राज्यभरातील असंख्य कलाकारांच्या मनातील याबद्दलच्या सुप्त इच्छेला मोठ्या खुबीने मूर्त स्वरूप दिले. १२७ वर्षांची परंपरा असलेल्या मुंबईतील बॉम्बे आर्ट सोसायटीच्या नव्या वास्तूच्या उद््घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत वासुदेव कामत यांनी राज्यात ललित कला अकादमी नसल्याचा मुद्दा जाहीरपणे मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अकादमी स्थापन करण्याची व तिला जागा देण्याची घोषणा केल्याने आता हा विषय लालफितीत अडकू नये. उपद्रवमूल्य कमी असलेल्या कलावंतांसाठी अकादमी देऊ करतेवेळी मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली तत्परता अभिनंदनीय आहे. तिला पंतप्रधान मोदींची कलेप्रती असलेली भूमिकाही कारणीभूत आहे. कलांच्या जोपासनेसाठी भक्कम संस्थात्मक पाठबळ स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत मौलिक राहिले. पं. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बरोबरीने कलांच्या जोपसनेसाठीही संस्थात्मक रचनेचा जो पाया घातला, त्यावर राज्यातील अकादमीच्या निमित्ताने आणखी एक वीट रचली गेली आहे. त्यातून साकारणारे कलोपासनेचे नवे चित्र महाराष्ट्राच्या वैभवात भरच टाकेल.