शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च चपराक

By admin | Updated: April 7, 2016 00:16 IST

न्या.राजेन्द्रमल लोढा समितीच्या अहवालातील शिफारसींच्या अंमलबाजवणीच्या मुद्यावरून, गत काही काळापासून सातत्याने निशाण्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट

न्या.राजेन्द्रमल लोढा समितीच्या अहवालातील शिफारसींच्या अंमलबाजवणीच्या मुद्यावरून, गत काही काळापासून सातत्याने निशाण्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा एकदा चपराक हाणली. देशातील या सर्वाधिक धनवान क्रीडा संस्थेची निधी वितरणाची पद्धत अत्यंत चुकीची असल्याचा टोला न्यायालयाने लगावला. संलग्न संस्थांना निधीचे वितरण करताना अत्यंत सदोष व अन्यायकारक पद्धत अवलंबून, काहींना प्रचंड झुकते माप दिले जाते, तर काही संस्थांवर अन्याय केला जातो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. संस्था सदस्यांनी एकमेकांचे हित सांभाळणाऱ्या समाजाची निर्मिती केली असून, त्यामुळे खेळाचे भले न होता, भ्रष्टाचारास चालना मिळत असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर अशा प्रकारे शरसंधान साधण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. लोढा समितीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीस विरोध करण्याच्या बीसीसीआयच्या भूमिकेवरही न्यायालयाने ताशेरे ओढले होते. बीसीसीआयच्या उत्तरदायित्वात वाढ करण्यासाठी लोढा समितीने अनेक शिफारसी केल्या असल्या तरी तिला त्या नको आहेत. देशातील राजकारण्यांना पाच वर्षातून एकदा का होईना, जनतेला सामोरे जावे लागते, उद्योगपतींचे समभागधारक व गुंतवणुकदारांप्रती उत्तरदायित्व असते; पण हे दोन वर्ग बीसीसीआयमध्ये एकत्र आले, की त्यांना कुणाला उत्तर देण्याची गरजच उरत नाही! गत दीड-दोन दशकात बीसीसीआयकडे पैशाचा अक्षरश: धबधबाच सुरू आहे. त्या बळावरच, कधीकाळी इंग्लंड आणि आॅस्टे्रलियाच्या क्रिकेट मंडळांच्या ओंजळीने पाणी पिणारे बीसीसीआय, आज त्या दोन्ही मंडळांना जसे हवे तसे वाकवते! या श्रीमंतीचा खेळाला लाभ झालाच नाही, असे नाही; पण त्यापेक्षाही अधिक तो मंडळाच्या कारभाऱ्यांना झाला आहे. असा लाभ घेणाऱ्यातील ललित मोदी यांना परागंदा व्हावे लागले असले तरी, त्यांच्यासारखे आणखी किती तरी आजही लाभ उपटतच आहेत. मोदींना तरी परागंदा का व्हावे लागले? कारण एकमेकांची उणीदुणी जाहीररीत्या काढायची नाहीत, हा अलिखित नियम त्यांनी मोडला. दुसरीकडे श्रीनिवासन यांनी मौन धारण केले म्हणून त्यांचे काहीही वाकडे झाले नाही! ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू कुपंथ' याचे यापेक्षा दुसरे समर्पक उदाहरण शोधूनही सापडणार नाही. बीसीसीआयची स्वच्छता करायची असेल, तर त्या संस्थेची सध्याची स्वायत्तता संपुष्टात आणून तिला उत्तरदायी बनवावे लागेल व त्यानंतर राजकारणी, उद्योगपती व माजी क्रिकेटपटूंना बाजूला सारत, खऱ्या व्यावसायिक व्यवस्थापकांच्या हाती तिला सुपूर्द करावे लागेल.