शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

सर्वोच्च चपराक

By admin | Updated: April 7, 2016 00:16 IST

न्या.राजेन्द्रमल लोढा समितीच्या अहवालातील शिफारसींच्या अंमलबाजवणीच्या मुद्यावरून, गत काही काळापासून सातत्याने निशाण्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट

न्या.राजेन्द्रमल लोढा समितीच्या अहवालातील शिफारसींच्या अंमलबाजवणीच्या मुद्यावरून, गत काही काळापासून सातत्याने निशाण्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पुन्हा एकदा चपराक हाणली. देशातील या सर्वाधिक धनवान क्रीडा संस्थेची निधी वितरणाची पद्धत अत्यंत चुकीची असल्याचा टोला न्यायालयाने लगावला. संलग्न संस्थांना निधीचे वितरण करताना अत्यंत सदोष व अन्यायकारक पद्धत अवलंबून, काहींना प्रचंड झुकते माप दिले जाते, तर काही संस्थांवर अन्याय केला जातो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. संस्था सदस्यांनी एकमेकांचे हित सांभाळणाऱ्या समाजाची निर्मिती केली असून, त्यामुळे खेळाचे भले न होता, भ्रष्टाचारास चालना मिळत असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर अशा प्रकारे शरसंधान साधण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. लोढा समितीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीस विरोध करण्याच्या बीसीसीआयच्या भूमिकेवरही न्यायालयाने ताशेरे ओढले होते. बीसीसीआयच्या उत्तरदायित्वात वाढ करण्यासाठी लोढा समितीने अनेक शिफारसी केल्या असल्या तरी तिला त्या नको आहेत. देशातील राजकारण्यांना पाच वर्षातून एकदा का होईना, जनतेला सामोरे जावे लागते, उद्योगपतींचे समभागधारक व गुंतवणुकदारांप्रती उत्तरदायित्व असते; पण हे दोन वर्ग बीसीसीआयमध्ये एकत्र आले, की त्यांना कुणाला उत्तर देण्याची गरजच उरत नाही! गत दीड-दोन दशकात बीसीसीआयकडे पैशाचा अक्षरश: धबधबाच सुरू आहे. त्या बळावरच, कधीकाळी इंग्लंड आणि आॅस्टे्रलियाच्या क्रिकेट मंडळांच्या ओंजळीने पाणी पिणारे बीसीसीआय, आज त्या दोन्ही मंडळांना जसे हवे तसे वाकवते! या श्रीमंतीचा खेळाला लाभ झालाच नाही, असे नाही; पण त्यापेक्षाही अधिक तो मंडळाच्या कारभाऱ्यांना झाला आहे. असा लाभ घेणाऱ्यातील ललित मोदी यांना परागंदा व्हावे लागले असले तरी, त्यांच्यासारखे आणखी किती तरी आजही लाभ उपटतच आहेत. मोदींना तरी परागंदा का व्हावे लागले? कारण एकमेकांची उणीदुणी जाहीररीत्या काढायची नाहीत, हा अलिखित नियम त्यांनी मोडला. दुसरीकडे श्रीनिवासन यांनी मौन धारण केले म्हणून त्यांचे काहीही वाकडे झाले नाही! ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू कुपंथ' याचे यापेक्षा दुसरे समर्पक उदाहरण शोधूनही सापडणार नाही. बीसीसीआयची स्वच्छता करायची असेल, तर त्या संस्थेची सध्याची स्वायत्तता संपुष्टात आणून तिला उत्तरदायी बनवावे लागेल व त्यानंतर राजकारणी, उद्योगपती व माजी क्रिकेटपटूंना बाजूला सारत, खऱ्या व्यावसायिक व्यवस्थापकांच्या हाती तिला सुपूर्द करावे लागेल.