शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
5
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
6
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
7
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
8
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
9
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
10
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
11
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
12
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
13
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
14
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
15
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
16
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
17
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
18
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
19
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...

कर्तारपूर म्हणजे खलिस्तान्यांना वाट मोकळी करून देण्याचा छुपा मार्ग तर नव्हे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:18 IST

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा होत असतानाच, भारताच्या पश्चिम सीमेवरील कर्तारपूरची मार्गिकाही खुली झाली.

कर्तारपूरमध्ये भाषण करताना इम्रान खान यांनी इन्सानियत व इन्साफचा उल्लेख करीत काश्मीरचा प्रश्न उकरून काढण्याची गरज नव्हती. मोदींनी भाषणात इम्रान खान यांना धन्यवाद दिले, तर इम्रान खान यांनी काश्मीरवरून मोदींवर टोमणे मारण्याची संधी साधली. हे चांगले लक्षण नव्हे.

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा होत असतानाच, भारताच्या पश्चिम सीमेवरील कर्तारपूरची मार्गिकाही खुली झाली. कर्तारपूर येथील दरबार साहिबमध्ये गुरू नानकदेव यांचे सन १५३९ पूर्वी आयुष्याची अखेरची १८ वर्षे वास्तव्य होते. शीख संप्रदाय घडविण्याचे काम मुख्यत: दरबार साहिब येथून झाले. फाळणीनंतर कर्तारपूर पाकिस्तानात गेल्याने दरबार साहिबचे दर्शन दुरापास्त झाले. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षांत रावी नदीवरील पूल ओलांडून तेथे जाता येई. मात्र, १९६५च्या युद्धात हा पूल उद्ध्वस्त झाला. या युद्धानंतर भारत व पाकिस्तान यांच्या संबंधात कटुता आली आणि दरबार साहिबला जाणे जवळपास अशक्य झाले. भारतीय सीमेपासून हे ठिकाण अवघे पाच-सहा किलोमीटर अंतरावर आहे. सीमेवरून दुर्बिर्णीच्या साहाय्याने दरबार साहिबचे दर्शन घेतले जाई. तेथे विनासायास जाता यावे, यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. दरबार साहिबचा भाग भारताकडे देऊन, त्या बदल्यात अन्य भूभाग पाकिस्तानला देण्याची तयारी इंदिरा गांधी यांनी दाखविली होती. पाकिस्तानमधून त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. काही निवडक लोकांना दरबार साहिबच्या दर्शनाची परवानगी पाकिस्तानकडून मिळत होती. मात्र, त्यासाठी लाहोरमार्गे १५० किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत असे.

कर्तारपूरला थेट जाण्याचा मार्ग खुला करावा, ही कल्पना अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना त्यांच्या लाहोर भेटीत मांडली. मनमोहन सिंग यांनीही त्याचा पाठपुरावा केला आणि जवळपास २० वर्षांनंतर ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुढाकार घेतला. पाकिस्तानच्या लष्कराने त्यामध्ये आडकाठी आणली नाही हे विशेष. दरबार साहिबची देखभाल फारशी केली जात नव्हती, परंतु गेल्या वर्षभरात पाकिस्तान सरकारने बराच पैसा खर्च करून तो परिसर अत्यंत सुशोभित आणि अद्ययावत सुखसोईंनी युक्त असा केला आहे. पाकिस्तानी हुकुमतने हे काम इतके झपाट्याने केल्याबद्दल खुद्द इम्रान खान यांनीही आश्चर्य व्यक्त केले. कर्तारपूरला जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका खुली होणे आणि व्हिसा न घेता शिखांना तेथे जाण्याची अनुमती मिळणे, हे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यातील महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी आशा अनेकांना वाटते. मोदी आणि इम्रान खान यांनी आपल्या भाषणात ही भावना व्यक्त केली. कर्तारपूरला भेट देणाऱ्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही याचा उच्चार केला. बर्लिनची भिंत पाडली जाण्याच्या ऐतिहासिक घटनेशी मोदींनी रविवारच्या समारंभाचा संबंध जोडला, तर इम्रान खान यांनी फ्रान्स व जर्मनी एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही, असा प्रश्न केला. भारत व पाकिस्तान यांच्या सामाईक बाजारपेठेचा उल्लेखही या भाषणांत झाला. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यात कर्तारपूरची मार्गिका हा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र, त्यासाठी दोन्ही देशांकडून प्रामाणिक व अथक प्रयत्न झाले पाहिजेत. पाकिस्तानकडून अशा प्रयत्नांची विशेष अपेक्षा आहे. कर्तारपूरमध्ये भाषण करताना इम्रान खान यांनी इन्सानियत व इन्साफचा उल्लेख करीत काश्मीरचा प्रश्न उकरून काढण्याची गरज नव्हती. मोदींनी आपल्या भाषणात इम्रान खान यांना धन्यवाद दिले.
मात्र इम्रान खान यांनी काश्मीरवरून मोदींना टोमणे मारण्याची संधी सोडली नाही. दरबार साहिबसाठी लष्कराने युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नांकडे यासाठीच भारताला सावधानतेने पाहावे लागते. १९६० व १९८०च्या दशकात पाकिस्तानने पोसलेले खलिस्तानचे भूत भारताला विसरता येत नाही. पुन्हा पंजाब पेटविण्याचे प्रयत्न पाककडून होत नाहीत ना, याकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. भारताशी संबंध सुधारण्याची प्रामाणिक इच्छा असती, तर भिंद्रनवालेंसारख्या खलिस्तानी समर्थकांची भित्तीपत्रके कर्तारपूरमध्ये पाकिस्तानने लावू दिली नसती. इन्सानियतच्या नावाखाली खलिस्तान्यांना वाट मोकळी करून देण्याचा छुपा उद्देश नाही ना, असा संशय यामुळे येतो आणि कर्तारपूरच्या मार्गिकेवरून सावध पावले टाकावी लागतात.

टॅग्स :Kartarpur Corridorकर्तारपूर कॉरिडोर