शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

कर्तारपूर म्हणजे खलिस्तान्यांना वाट मोकळी करून देण्याचा छुपा मार्ग तर नव्हे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:18 IST

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा होत असतानाच, भारताच्या पश्चिम सीमेवरील कर्तारपूरची मार्गिकाही खुली झाली.

कर्तारपूरमध्ये भाषण करताना इम्रान खान यांनी इन्सानियत व इन्साफचा उल्लेख करीत काश्मीरचा प्रश्न उकरून काढण्याची गरज नव्हती. मोदींनी भाषणात इम्रान खान यांना धन्यवाद दिले, तर इम्रान खान यांनी काश्मीरवरून मोदींवर टोमणे मारण्याची संधी साधली. हे चांगले लक्षण नव्हे.

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा होत असतानाच, भारताच्या पश्चिम सीमेवरील कर्तारपूरची मार्गिकाही खुली झाली. कर्तारपूर येथील दरबार साहिबमध्ये गुरू नानकदेव यांचे सन १५३९ पूर्वी आयुष्याची अखेरची १८ वर्षे वास्तव्य होते. शीख संप्रदाय घडविण्याचे काम मुख्यत: दरबार साहिब येथून झाले. फाळणीनंतर कर्तारपूर पाकिस्तानात गेल्याने दरबार साहिबचे दर्शन दुरापास्त झाले. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही वर्षांत रावी नदीवरील पूल ओलांडून तेथे जाता येई. मात्र, १९६५च्या युद्धात हा पूल उद्ध्वस्त झाला. या युद्धानंतर भारत व पाकिस्तान यांच्या संबंधात कटुता आली आणि दरबार साहिबला जाणे जवळपास अशक्य झाले. भारतीय सीमेपासून हे ठिकाण अवघे पाच-सहा किलोमीटर अंतरावर आहे. सीमेवरून दुर्बिर्णीच्या साहाय्याने दरबार साहिबचे दर्शन घेतले जाई. तेथे विनासायास जाता यावे, यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. दरबार साहिबचा भाग भारताकडे देऊन, त्या बदल्यात अन्य भूभाग पाकिस्तानला देण्याची तयारी इंदिरा गांधी यांनी दाखविली होती. पाकिस्तानमधून त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. काही निवडक लोकांना दरबार साहिबच्या दर्शनाची परवानगी पाकिस्तानकडून मिळत होती. मात्र, त्यासाठी लाहोरमार्गे १५० किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत असे.

कर्तारपूरला थेट जाण्याचा मार्ग खुला करावा, ही कल्पना अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना त्यांच्या लाहोर भेटीत मांडली. मनमोहन सिंग यांनीही त्याचा पाठपुरावा केला आणि जवळपास २० वर्षांनंतर ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुढाकार घेतला. पाकिस्तानच्या लष्कराने त्यामध्ये आडकाठी आणली नाही हे विशेष. दरबार साहिबची देखभाल फारशी केली जात नव्हती, परंतु गेल्या वर्षभरात पाकिस्तान सरकारने बराच पैसा खर्च करून तो परिसर अत्यंत सुशोभित आणि अद्ययावत सुखसोईंनी युक्त असा केला आहे. पाकिस्तानी हुकुमतने हे काम इतके झपाट्याने केल्याबद्दल खुद्द इम्रान खान यांनीही आश्चर्य व्यक्त केले. कर्तारपूरला जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका खुली होणे आणि व्हिसा न घेता शिखांना तेथे जाण्याची अनुमती मिळणे, हे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यातील महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी आशा अनेकांना वाटते. मोदी आणि इम्रान खान यांनी आपल्या भाषणात ही भावना व्यक्त केली. कर्तारपूरला भेट देणाऱ्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही याचा उच्चार केला. बर्लिनची भिंत पाडली जाण्याच्या ऐतिहासिक घटनेशी मोदींनी रविवारच्या समारंभाचा संबंध जोडला, तर इम्रान खान यांनी फ्रान्स व जर्मनी एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही, असा प्रश्न केला. भारत व पाकिस्तान यांच्या सामाईक बाजारपेठेचा उल्लेखही या भाषणांत झाला. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यात कर्तारपूरची मार्गिका हा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र, त्यासाठी दोन्ही देशांकडून प्रामाणिक व अथक प्रयत्न झाले पाहिजेत. पाकिस्तानकडून अशा प्रयत्नांची विशेष अपेक्षा आहे. कर्तारपूरमध्ये भाषण करताना इम्रान खान यांनी इन्सानियत व इन्साफचा उल्लेख करीत काश्मीरचा प्रश्न उकरून काढण्याची गरज नव्हती. मोदींनी आपल्या भाषणात इम्रान खान यांना धन्यवाद दिले.
मात्र इम्रान खान यांनी काश्मीरवरून मोदींना टोमणे मारण्याची संधी सोडली नाही. दरबार साहिबसाठी लष्कराने युद्धपातळीवर केलेल्या प्रयत्नांकडे यासाठीच भारताला सावधानतेने पाहावे लागते. १९६० व १९८०च्या दशकात पाकिस्तानने पोसलेले खलिस्तानचे भूत भारताला विसरता येत नाही. पुन्हा पंजाब पेटविण्याचे प्रयत्न पाककडून होत नाहीत ना, याकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. भारताशी संबंध सुधारण्याची प्रामाणिक इच्छा असती, तर भिंद्रनवालेंसारख्या खलिस्तानी समर्थकांची भित्तीपत्रके कर्तारपूरमध्ये पाकिस्तानने लावू दिली नसती. इन्सानियतच्या नावाखाली खलिस्तान्यांना वाट मोकळी करून देण्याचा छुपा उद्देश नाही ना, असा संशय यामुळे येतो आणि कर्तारपूरच्या मार्गिकेवरून सावध पावले टाकावी लागतात.

टॅग्स :Kartarpur Corridorकर्तारपूर कॉरिडोर