शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

हे का शुद्धोदक?

By admin | Updated: December 23, 2016 23:56 IST

मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यासह स्मारकाचा आज होणारा भूमिपूजन

मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यासह स्मारकाचा आज होणारा भूमिपूजन समारोहदेखील राजकारणरहित राहू नये आणि येथेही विविध पक्ष-संघटना आणि खुद्द सत्तारुढ युतीमधीलच दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवाद उफाळून यावा हे घसरलेल्या राजकीय संस्कृतीचे तर लक्षण आहेच पण ज्या स्मारकापासून महाराष्ट्राच्या रयतेने स्फूर्ती आणि प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा आहे त्या अपेक्षेबाबत हे सारे श्रेयवादी भर समुद्रामध्येही कसे कोरडे राहू इच्छितात याचेही निदर्शक आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी त्या काली जसे सप्त सिंधूंचे जल मागविण्यात आले होते, त्याच धर्तीवर आजच्या समारोहासाठीदेखील महाराष्ट्रातील विविध नद्यांमधले पाणी आणि गड किल्ल्यांवरील मृत्तिका नेली जाणार आहे. कल्पना तशी वाईट नसली तरी तिथेही श्रेयवाद कोणी टाळलेला नाही. श्रेयवादाच्या याच झुंझीमधून भाजपाने मुसंडी मारुन नाशिकमधील रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथील गोदावरीच्या जलाच्या कावडी म्हणे भरुन घेतल्या. केवळ तितकेच नव्हे तर त्या वाजत गाजत मुंबईकडे मार्गस्थ करण्याचे नियोजनदेखील केले. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणूनही आदराने संबोधले जात असल्याने त्यांच्या नियोजित स्मारकाचा भूमिपूजन समारोह यथासांग आणि हिन्दू धर्मशास्त्रसंमत अशाच रितीने केला जावा आणि तसा आग्रह धरला जावा हेदेखील तसे रास्तच. परंतु प्रश्न जेव्हां धर्मसंमत रितीने कार्य सिद्धीस नेण्याचा मनसुबा रचला जातो, तेव्हां या रितीमध्ये कोणतीही तडजोड क्षम्य ठरत नाही. सप्तसिंधूंचे किंवा महाराष्ट्र प्रांतातील नद्यांचे नेले जाणारे उदक हे शुद्धोदकच असणे मग अनिवार्य ठरते. नाशकातील ज्या रामकुंडातले जल बेगडी शिवभक्तांनी संकलित केले आहे त्या रामकुंडात भले गोदावरी वाहून (अर्थात गंगापूर धरणातून विसर्ग घेतल्यावरच) येत असली तरी रामकुंडाची ख्याती शुद्ध कर्मासाठी नव्हे तर अशुद्ध कर्मासाठी आहे. तिथे श्राद्धादि संस्कार होत असतात. खुद्द रामचन्द्राने त्याचा पिता दशरथ याचे तर्पण याच रामकुंडात केल्याची आख्यायिका आहे. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तामध्ये मुळात गोदावरीचेच जल असते की त्याच गावातल्या एका सरोवरातील पाणी पंप लावून आणविलेले असते, याविषयी कोणीही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. याचा अर्थ स्मारकाच्या भूमिपूजनासाठी जे उदक वाजतगाजत नाशकातून अरबी समुद्रात नेले जाईल ते शुद्धोदकच असेल याची शाश्वती नाही. किंबहुना ते शुद्धोदक नसेल याचीच अधिक शक्यता. अर्थात भूमिपूजनाचे यजमानत्व आणि पौरोहित्यदेखील हिंन्दुत्वनिष्ठांच्याच हाती असल्याने हा इतका उहापोह करायचा इतकेच!