शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हे का शुद्धोदक?

By admin | Updated: December 23, 2016 23:56 IST

मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यासह स्मारकाचा आज होणारा भूमिपूजन

मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यासह स्मारकाचा आज होणारा भूमिपूजन समारोहदेखील राजकारणरहित राहू नये आणि येथेही विविध पक्ष-संघटना आणि खुद्द सत्तारुढ युतीमधीलच दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवाद उफाळून यावा हे घसरलेल्या राजकीय संस्कृतीचे तर लक्षण आहेच पण ज्या स्मारकापासून महाराष्ट्राच्या रयतेने स्फूर्ती आणि प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा आहे त्या अपेक्षेबाबत हे सारे श्रेयवादी भर समुद्रामध्येही कसे कोरडे राहू इच्छितात याचेही निदर्शक आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी त्या काली जसे सप्त सिंधूंचे जल मागविण्यात आले होते, त्याच धर्तीवर आजच्या समारोहासाठीदेखील महाराष्ट्रातील विविध नद्यांमधले पाणी आणि गड किल्ल्यांवरील मृत्तिका नेली जाणार आहे. कल्पना तशी वाईट नसली तरी तिथेही श्रेयवाद कोणी टाळलेला नाही. श्रेयवादाच्या याच झुंझीमधून भाजपाने मुसंडी मारुन नाशिकमधील रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथील गोदावरीच्या जलाच्या कावडी म्हणे भरुन घेतल्या. केवळ तितकेच नव्हे तर त्या वाजत गाजत मुंबईकडे मार्गस्थ करण्याचे नियोजनदेखील केले. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणूनही आदराने संबोधले जात असल्याने त्यांच्या नियोजित स्मारकाचा भूमिपूजन समारोह यथासांग आणि हिन्दू धर्मशास्त्रसंमत अशाच रितीने केला जावा आणि तसा आग्रह धरला जावा हेदेखील तसे रास्तच. परंतु प्रश्न जेव्हां धर्मसंमत रितीने कार्य सिद्धीस नेण्याचा मनसुबा रचला जातो, तेव्हां या रितीमध्ये कोणतीही तडजोड क्षम्य ठरत नाही. सप्तसिंधूंचे किंवा महाराष्ट्र प्रांतातील नद्यांचे नेले जाणारे उदक हे शुद्धोदकच असणे मग अनिवार्य ठरते. नाशकातील ज्या रामकुंडातले जल बेगडी शिवभक्तांनी संकलित केले आहे त्या रामकुंडात भले गोदावरी वाहून (अर्थात गंगापूर धरणातून विसर्ग घेतल्यावरच) येत असली तरी रामकुंडाची ख्याती शुद्ध कर्मासाठी नव्हे तर अशुद्ध कर्मासाठी आहे. तिथे श्राद्धादि संस्कार होत असतात. खुद्द रामचन्द्राने त्याचा पिता दशरथ याचे तर्पण याच रामकुंडात केल्याची आख्यायिका आहे. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तामध्ये मुळात गोदावरीचेच जल असते की त्याच गावातल्या एका सरोवरातील पाणी पंप लावून आणविलेले असते, याविषयी कोणीही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. याचा अर्थ स्मारकाच्या भूमिपूजनासाठी जे उदक वाजतगाजत नाशकातून अरबी समुद्रात नेले जाईल ते शुद्धोदकच असेल याची शाश्वती नाही. किंबहुना ते शुद्धोदक नसेल याचीच अधिक शक्यता. अर्थात भूमिपूजनाचे यजमानत्व आणि पौरोहित्यदेखील हिंन्दुत्वनिष्ठांच्याच हाती असल्याने हा इतका उहापोह करायचा इतकेच!