शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

उन्हाचे चटके मोजण्यासाठी हवेत 'हीट इंडेक्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 07:59 IST

केवळ दिवसा नाही, तर रात्रीदेखील उष्णतेची दाहकता (हीट स्ट्रेस) वाढताना दिसते. उष्णतेचे योग्य मोजमाप करायची व्यवस्था तत्काळ उभारणे गरजेचे आहे.

आदित्य चुनेकर, प्रयास ऊर्जा गटअभिराम सहस्रबुद्धे, प्रयास ऊर्जा गट

महाराष्ट्रात फेब्रुवारीपासूनच उन्हाने जोर धरलाय आणि यावर्षीचा उन्हाळा सरासरीपेक्षा अधिक तीव्र असायचे संकेतही हवामान खात्याने दिले आहेत. गेल्या दोन आठवड्यांत मुंबईत दोनदा उष्णतेच्या लाटेचा इशारा मिळालेला आहे. या अतिउष्णतेमुळे बेशुद्ध पडणे, पुरळ उठणे, स्नायूत गोळे येणे तर उष्माघातामुळे जीवही जाऊ शकतो. अप्रत्यक्षपणे विविध अवयवांवर ताण आल्याने होणारे आजार व मृत्यूंचे प्रमाण हे उष्णतेच्या थेट परिणामांमुळे होणाऱ्या आजार व मृत्यूंपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात उष्माघाताने ९ मृत्यू झाल्याची नोंद आहे. पण इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) यांच्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस (GBD) या अभ्यासानुसार उष्णतेच्या दुष्परिणामांमुळे राज्यात सुमारे १६ हजार मृत्यू (त्या वर्षातील एकूण मृत्यूंपैकी दोन टक्के) झालेले असावेत, असा अंदाज आहे. 

आरोग्याखेरीज इतर सामाजिक आणि आर्थिक बाबींवरही वाढत्या तापमानाचे परिणाम होतात. २०२३ मध्ये उष्णतेमुळे कामगार उत्पादकता कमी झाल्यामुळे भारताने सुमारे १४१ अब्ज डॉलर इतके उत्पन्न गमावले. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक पंखे, कूलर, आणि एअर कंडिशनर वापरतात. ज्यांच्यामुळे विजेची मागणी वाढून विद्युत पुरवठ्यावर ताण येऊ शकतो. जास्त वीजनिर्मितीमुळे ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन वाढते. कारण भारतातील बहुतेक वीज कोळशापासून तयार होते. हे उत्सर्जन हवामान बदलास कारणीभूत ठरते, ज्यामुळे तापमान आणखी वाढते. तापमानवाढ या जागतिक प्रश्नाची उत्तरे ही स्थानिक पातळीवर शोधावी लागतील. त्यासाठी या प्रश्नाचे स्थानिक स्वरूप योग्यप्रकारे समजून घेणे अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्रातील उन्हाळ्याबद्दल बोलताना आपल्याला नागपूर, चंद्रपूर अशा भागांचीच आठवण येते, जिथे तापमान ४५ डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाते. पण उष्णतेचा त्रास फक्त तापमानावर आधारित नसतो. हवेतील दमटपणा, वाऱ्याचा वेग, तुम्हाला किती प्रमाणात उष्णतेला सामोरं जावं लागतं, तुमचे सध्याचे आजार आणि अनुकूलन करण्याची क्षमता हे सर्व घटक व्यक्तीच्या आरोग्याला असलेली जोखीम ठरवतात. या सर्व घटकांचा मानवी आरोग्यावर एकत्रित परिणाम मोजण्यासाठी जागतिक स्तरावर काही 'हीट इंडेक्स' विकसित केलेले आहेत. हे हीट इंडेक्स फक्त प्रत्यक्ष तापमानाऐवजी या सर्व घटकांच्या आधारे आपल्या शरीराला किती तापमान भासते, हे मोजतात...

या अनेक हीट इंडेक्सपैकी Universal Thermal Climate Index (UTCI) याचा वापर करून आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्रतेची स्थिती काय आहे, याचा अभ्यास केला. केवळ दिवसा नाही, तर रात्रीदेखील उष्णतेची दाहकता (हीट स्ट्रेस) वाढलेली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ती अधिक आहे. आपल्या शरीराची उष्णता सहन करण्याची क्षमता ही आपल्याला सवय असलेल्या हवामानापेक्षा सद्यपरिस्थितीत किती वेगळी आहे, यावर आधारित असते. म्हणूनच ही असमान वाढ चिंताजनक आहे.

ज्या दिवशी उष्णतेची दाहकता खूप जास्त असते, अशा 'विशेष काळजीच्या दिवसां'नी मागच्या वर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जवळजवळ एक तृतीयांश उन्हाळा व्यापला होता. असे अनेक चिंताजनक दिवस आणि रात्री एकापाठोपाठ एक येताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शरीराला थंड होण्यासाठी आवश्यक असलेली उसंत मिळत नाही आणि त्यामुळे आरोग्यावर होणारा परिणाम अनेक पटींनी वाढतो. या अभ्यासाबद्दल अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध (http://bit.ly/MHsummer2024). आहे

महाराष्ट्र कोकणपट्टीपासून मध्य भारतातील जंगल क्षेत्रापर्यंत पसरलेला आहे. विविध ठिकाणी हवेचा कोरडेपणा, दमटपणा, जंगलांची व्याप्ती, लोकसंख्या आणि तिची घनता, तसेच शहरीकरण यामध्येही मोठा फरक आहे. या सर्व गोष्टींचा हवामानावर आणि लोकांच्या उष्णता सहन करण्याच्या क्षमतेवर किती प्रभाव पडतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्थानिक परिस्थितीला अनुसरून स्थानिक हीट इंडेक्स विकसित करायला हवे आहेत. लोकांना उष्णतेच्या जोखमेचा नीट अंदाज देण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर उष्णतेचा स्थानिकृत अभ्यास करण्यासाठी आणि लोकांना प्रभावी इशारे देण्यासाठी हवामानाचा डेटा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. भारतीय हवामान खात्याची (IMD) महाराष्ट्रात सुमारे ६० हवामान केंद्रे आहेत. हवामान खाते या केंद्राची संख्या वाढवू शकते आणि हवामानाबद्दलचा डेटा लगेचच (near real time) सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देऊ शकते.

उष्णतेच्या या गंभीर समस्यांचे पद्धतशीरपणे निराकरण करण्यासाठी या दिशेने प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचेदेखील आहे. नाहीतर हा ही उन्हाळा जाईल आणि पुढील वर्षी नेमेचि येतो म्हणत, बहुधा अधिकच तीव्रतेने परत येईल.

aditya@prayaspune.org abhiram@prayaspune.org 

टॅग्स :TemperatureतापमानHeat Strokeउष्माघात