शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

सुचिन्ह मानावे ?

By admin | Updated: February 3, 2016 03:03 IST

‘पाकिस्तान सरकारने काश्मीरमधील घातपाती कृत्यांना अजिबात प्रोत्साहित करु नये आणि तिथे असे उद्योग करणाऱ्या प्रतिबंधित संघटनांवर कडक कारवाई करुन

‘पाकिस्तान सरकारने काश्मीरमधील घातपाती कृत्यांना अजिबात प्रोत्साहित करु नये आणि तिथे असे उद्योग करणाऱ्या प्रतिबंधित संघटनांवर कडक कारवाई करुन त्यायोगे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मनातील चिंता दूर करावी’ असे आवाहन चक्क पाकिस्तानी संसदेतील परराष्ट्र धोरणविषयक स्थायी समितीच्या सदस्यांनी एका लेखी अहवालाद्वारे आपल्या सरकारला करावे हे उभय देशांदरम्यानच्या संबंधांमध्ये सकारात्मक बदल होण्याचे सुचिन्ह मानावे का, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. तथापि त्यांनी केलेल्या या शिफारसींमध्येच पाक आजवर काश्मीरातील घातपाती कृत्यांना प्रोत्साहन देत आल्याची आणि ज्या संघटनांवर बंदी आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची स्वच्छ कबुलीदेखील आहे. भारताची त्या राष्ट्राकडे असलेली मागणी नेमकी याच संदर्भातली आहे. पाकिस्तानातील सत्ताधारी ‘पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ’ या पक्षाचे संसद सदस्य आवीस अहमद लेघारी यांच्या नेतृत्वाखालील या स्थायी समितीने आपल्या अहवालात असेही नमूद केले आहे की, भारतात दहशत माजविणाऱ्या (पाक पुरस्कृत?) शक्तींच्या विरोधात पाकिस्तान कोणतीच कारवाई करीत नाही, ही जी काही चिंता आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मनात उत्पन्न झाली आहे ती दूर करणे आवश्यक आहे. समितीने सरकारपुढे एक चार कलमी कार्यक्रमदेखील ठेवला आहे. भारताच्या पुढे केलेल्या सहकार्याच्या प्रस्तावास प्रतिसाद देणे, तणाव कमी करणे, चर्चा सुरु करणे आणि चांगला परिणाम साध्य करणे यांचा त्यात समावेश आहे. खुद्द पाकिस्तानची आजवरची भूमिका केवळ काश्मीर प्रश्नावरच चर्चा करु अशी आडमुठेपणाची राहिली आहे. तिला समितीने छेद दिला असून एकाचवेळी सर्व विषयांवर चर्चा करीत राहिले पाहिजे असे समितीने म्हटले आहे. हे विषय कोणते याचा तपशीलदेखील समितीने अहवालाद्वारे सादर केला आहे. त्यात समितीने काश्मीर, पाणी, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या विषयांचा अंतर्भाव केला आहे. आजवर भारतात सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारची भूमिका प्रत्यक्षात हीच आणि अशीच राहिली आहे. काश्मीरचा प्रश्न जटील आहे व प्रदीर्र्घ चर्चेनंतरच त्यात तोडगा निघू शकतो हे उघड आहे. त्यामुळे तिथेच घोटाळत न राहाता व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर चर्चा करुन उभयपक्षी मान्य धोरणे निश्चित करावीत हीच भारताची भूमिका राहिलेली आहे. तिचा या पद्धतीने पाकिस्तानच्या संसदेतील एका महत्वाच्या समितीने स्वीकार करावा हे नाही म्हटले तरी निश्चितच स्वागतार्ह आहे. पण आजवरचा अनुभव लक्षात घेता समितीच्या शिफारसींना तेथील सरकार आणि विशेषत: तेथील लष्कर कितपत प्रतिसाद देईल याविषयी शंका वाटणे प्रस्तुत आहे. युद्धज्वराने आणि सूड भावनेने पेटलेल्या लष्कराला बाजूला सारुन त्या देशातील लोकनियुक्त सरकार स्वत:च्या मर्जीने काही ठाम निर्णय घेणार असेल तर तो एक इतिहासच ठरेल.