शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

खरंच पीडितांना न्याय मिळतो आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 04:58 IST

हाथरसची घटना पुन्हा एकदा माणसातील विकृती दर्शवते. या घटनेमुळे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झालाय की कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करूनसुद्धा अशा घटना वारंवार का घडतात?

- अ‍ॅड. अनिकेत निकम, विधिज्ञ, उच्च न्यायालयसर्पो दंशति कालेन दुर्जनस्तु पदे-पदे !अर्थात सर्प एकदाच दंश करतो मात्र विकृत व निर्ढावलेल्या गुन्हेगारी मनोवृत्तीची माणसं एखाद्या विषारी सापापेक्षा अधिक भयंकर असतात व मिळेल त्यावेळी दंश केल्याशिवाय राहात नाही. हाथरसची घटना पुन्हा एकदा माणसातील विकृती दर्शवते. या घटनेमुळे पुन्हा तोच प्रश्न उपस्थित झालाय की कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करूनसुद्धा अशा घटना वारंवार का घडतात?निर्भया प्रकरणानंतर, इंडियन पिनल कोड, एव्हीडन्स अ‍ॅक्ट, सीआरपीसी यात बदल करण्यात आला. बलात्काराची व्याख्यादेखील बदलली गेली. शिक्षेचं स्वरूप बदललं. अशा गुन्ह्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूददेखील केली मात्र तरीदेखील निर्भया व हाथरससारखी प्रकरणं आजदेखील आपल्या देशात घडतात. यामुळे शिक्षेची तरतूद गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करू शकेल का याबद्दल लोकांंच्या मनात साशंकता निर्माण होत आहे. शिक्षा सुनावल्यानंतर अंमलबजावणीचा जो कालावधी जातो त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की कायद्यात बदल तर झाले मात्र न्याय मिळण्यासाठी इतका विलंब होत असेल तर कायदा कितपत परिणामकारक आहे? निश्चितच प्रत्येक गुन्हेगाराला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. मात्र, निर्भयाच्या प्रकरणात आपल्याला प्रकर्षानं जाणवलं की आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही त्या आरोपींनी फेरविचार याचिकांचा सपाटा लावला व शिक्षेच्या अंमलबजावणीला लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला झालेल्या मानसिक त्रासाचा मी खूप जवळून अनुभव घेतला. गुुन्हेगार जेव्हा कायद्यातील त्रुटींचा, पळवाटांचा असा गैरफायदा घेत असतात तेव्हा त्या परिस्थितीत न्याय मिळण्याला उशीर झाल्यानं आपल्याला खरंच न्याय मिळालाय का अशी पीडितांची भावना होते. त्यामुळे, पीडितांना न्याय मिळालाय असे वाटायचे असेल तर कायदा आणखी भक्कम करण्याची निश्चितच आवश्यकता आहे.आज समाजमाध्यमांच्या (व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक) आततायीपणामुळे महिला अत्याचाराच्या घटना, बातम्या अतिरंजित पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यावर काही लोक अश्लील विनोददेखील करतात. तंत्रज्ञानामुळे विनविलंब हे घडल्यानं तत्काळ, विचार न करता फॉरवर्ड करणं, प्रतिक्रिया देणं असे प्रकार सर्रास होतात. जे की समाजस्वास्थ्याच्या दृष्टीनं धोक्याची घंटी वाजवणारे आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांनी आत्मविश्लेषण करून वृत्त प्रसारणाचा समंजस पायंडा पाडला पाहिजे.दुसरं असं की हैदराबादच्या घटनेनंतर पोलीस एन्काउण्टरमध्ये आरोपी मारले गेले. त्यावेळी नागरिकांनी जल्लोष केला. एन्काउण्टर करणाºया पोलिसांचा सत्कारही केला. मात्र अशा रस्त्यावरच्या न्यायदानातून नेमकं काय साधलं गेलं? उलट कोर्टातल्या न्यायापेक्षा रस्त्यावरचा न्याय अधिक लवकर होतो अशीच लोकांची भावना झाली आणि लोकांचा असा समज हा प्रगल्भ भारतीय लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करतो. अशा प्रकारे रस्त्यावरचा न्याय हा तात्पुरता छान वाटत असला तरी त्याचे परिणामदेखील तात्पुरते असतात. आपली भारतीय लोकशाही आदर्श आहे. त्यामुळे जगातील इतर इस्लामिक राष्ट्रांप्रमाणे असा रस्त्यावरचा ‘निकाल’ न्यायसंमत आणि लोकसंमत असता कामा नये. मात्र अर्थातच त्यासाठी न्यायदानाची प्रक्रियाही जलद गतीनं व्हायला हवी, त्यातला विलंब टाळता यायला हवा हे वास्तव नाकारता येणार नाही.जलद गतीनं न्याय मिळणं, कायद्यात बदल, संयमित समाजमाध्यमांचा वापर यांच्या बरोबरीनंच कुटुंब आणि समाजातही आमूलाग्र बदल घडवणे याची आवश्यकता आहे. समाज व व्यवस्था एका रात्रीत बदलत नसतात; परंतु त्या दिशेने वाटचाल करणे ही आज काळाची गरज आहे. आज माणसाला माणुसकी शिकविण्याची आवश्यकता आहे व आपली समाजव्यवस्था विषाक्त होण्याआधी माणसातील विकृत वृत्तीच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारRapeबलात्कार