शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

समाधान व आनंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:11 IST

मराठा समाजास आरक्षण का द्यावे व ते देताना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणे का अपरिहार्य आहे, याच्या तर्कसंगत पृष्ठभूमीचे पाठबळ नव्या कायद्यास आहे. म्हणूनच हा कायदा न्यायालयात टिकण्याची प्रबळ शक्यता आहे.

मराठा समाजास शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणाºया कायद्याचे विधेयक राज्य विधिमंडळाने गुरुवारी सर्वसंमतीने मंजूर केले. ही घटना केवळ ऐतिहासिकच नव्हे तर समाधान व आनंदाची आहे. ऐतिहासिक अशासाठी की या आरक्षणाचा कायदा तीन वर्षांत दुसºयांदा एकमताने मंजूर केला गेला. समाधान अशासाठी की यामुळे आपल्या न्याय्य मागणीसाठी कोणत्याही नेतृत्वाविना अभिनव व न भूतो असे आंदोलन करणाºया मराठा समाजास यामुळे न्याय मिळाला. मराठा समाजास आरक्षण मिळायला हवे यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दुमत कधीच नव्हते. फक्त ते कसे द्यायचे हीच अडचण होती.

पूर्वीच्या राजेशाहीत आणि नंतरच्या लोकशाहीतही राज्यावर मराठा समाजाच्या नेतृत्वानेच बहुसंख्य काळ शासन केल्याने हा समाज शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षणास पात्र असल्याचे सत्य राज्यघटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत बसविणे गरजेचे होते. आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने त्याच्या गेल्या शासनकाळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात वटहुकूम काढून हे आरक्षण लागू केले. नंतर सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने याच वटहुकुमाचा कायदा एकमताने करून आरक्षण कायम ठेवले. परंतु न्यायालयाने स्थगिती दिल्याने विधिमंडळाने सर्वसंमतीने दिलेले आरक्षण ठप्प झाले. मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आणि कोर्टात अडकलेला आधीचा कायदा सोडवून घेण्याऐवजी पूर्णपणे नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यातही श्रेय घेण्या-नाकारण्यावरून काही रुसवे-फुगवे झाले, पण अखेर नवा कायदाही सर्वसंमतीने मंजूर झाल्याने शेवट गोड झाला. राज्याच्या सामाजिक आणि राजकीय सलोख्यासाठी हे चित्र आश्वासक आहे. नवा कायदा लागू झाल्यावर आधीचा कायदा रद्द होईल व त्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या कोर्टकज्ज्यांनाही आपोआपच मूठमाती मिळेल.

नव्या आणि जुन्या कायद्यात फारच किरकोळ फरक आहे. खरा फरक आहे तो कायदा करण्यापूर्वीच्या तयारीचा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींखेरीज अन्य समाजवर्गांना मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण द्यायचे असेल तर आधी त्या समाजाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपण मागासवर्ग आयोगाकडून तपासून घेणे सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोगाच्या निकालात बंधनकारक केले. मराठा आरक्षणाचा विषय २००४ पासूनचा आहे. २००५ मध्ये राज्य मागासवर्ग आयोग स्थापन झाल्यावर लगेचच हा विषय शिफारशीसाठी त्यांच्याकडे सोपविला गेला होता. परंतु २००८ मध्ये दिलेल्या अहवालात आयोगाने मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषांवर आरक्षण देता येणार नाही, असा अहवाल दिला. कायद्यानुसार आयोगाच्या शिफारशी सर्वसामान्यपणे सरकारवर बंधनकारक असतात. त्या अमान्य असतील तर सरकारला त्याची कारणे द्यावी लागतात. आधीच्या आघाडी सरकारने आयोगाकडे हा विषय पुन्हा नेला, पण आधीच्या अहवालावर कायद्यानुसार निर्णय घ्या, यावर आयोग अडून बसला. शेवटी सरकारने स्वत:च निर्णय घेण्याचे ठरविले. राणे समिती नेमली गेली आणि त्याआधारे वटहुकूम काढला.

आताच्या सरकारने हेच काम मागासवर्ग आयोगाकडूनच रीतसर करून घेतले. आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण मान्य केले, एवढेच नव्हे तर त्यांना आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची गरजही स्पष्टपणे प्रतिपादित केली. त्यामुळे आताच्या कायद्याला मराठा समाजाचे मागासलेपण आणि त्यांना शिक्षण व नोकरीत पुरेसे प्रतिनिधित्व नाही या दोन्ही मुद्द्यांवर कायद्यास अभिप्रेत असलेली सबळ पृष्ठभूमी मिळाली. मराठा समाजास ५० टक्क्यांच्या बाहेर जाऊन आरक्षण दिल्याने अन्य मागासवर्ग समाजाकडून विरोध आणि संघर्षाची शक्यताही निकाली निघाली. मराठा समाजास स्वातंत्र्यापूर्वी आरक्षण होते. राज्यघटना लागू झाल्यावर ते संपुष्टात आले. तेच पुन्हा मिळविण्यासाठी तीन पिढ्यांना वाट पाहावी लागली. ही प्रतीक्षा आता तरी कायमस्वरूपी संपुष्टात यावी, हीच अपेक्षा.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण