शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

समाधान व आनंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:11 IST

मराठा समाजास आरक्षण का द्यावे व ते देताना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणे का अपरिहार्य आहे, याच्या तर्कसंगत पृष्ठभूमीचे पाठबळ नव्या कायद्यास आहे. म्हणूनच हा कायदा न्यायालयात टिकण्याची प्रबळ शक्यता आहे.

मराठा समाजास शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणाºया कायद्याचे विधेयक राज्य विधिमंडळाने गुरुवारी सर्वसंमतीने मंजूर केले. ही घटना केवळ ऐतिहासिकच नव्हे तर समाधान व आनंदाची आहे. ऐतिहासिक अशासाठी की या आरक्षणाचा कायदा तीन वर्षांत दुसºयांदा एकमताने मंजूर केला गेला. समाधान अशासाठी की यामुळे आपल्या न्याय्य मागणीसाठी कोणत्याही नेतृत्वाविना अभिनव व न भूतो असे आंदोलन करणाºया मराठा समाजास यामुळे न्याय मिळाला. मराठा समाजास आरक्षण मिळायला हवे यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दुमत कधीच नव्हते. फक्त ते कसे द्यायचे हीच अडचण होती.

पूर्वीच्या राजेशाहीत आणि नंतरच्या लोकशाहीतही राज्यावर मराठा समाजाच्या नेतृत्वानेच बहुसंख्य काळ शासन केल्याने हा समाज शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर आरक्षणास पात्र असल्याचे सत्य राज्यघटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत बसविणे गरजेचे होते. आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने त्याच्या गेल्या शासनकाळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात वटहुकूम काढून हे आरक्षण लागू केले. नंतर सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने याच वटहुकुमाचा कायदा एकमताने करून आरक्षण कायम ठेवले. परंतु न्यायालयाने स्थगिती दिल्याने विधिमंडळाने सर्वसंमतीने दिलेले आरक्षण ठप्प झाले. मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आणि कोर्टात अडकलेला आधीचा कायदा सोडवून घेण्याऐवजी पूर्णपणे नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. यातही श्रेय घेण्या-नाकारण्यावरून काही रुसवे-फुगवे झाले, पण अखेर नवा कायदाही सर्वसंमतीने मंजूर झाल्याने शेवट गोड झाला. राज्याच्या सामाजिक आणि राजकीय सलोख्यासाठी हे चित्र आश्वासक आहे. नवा कायदा लागू झाल्यावर आधीचा कायदा रद्द होईल व त्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या कोर्टकज्ज्यांनाही आपोआपच मूठमाती मिळेल.

नव्या आणि जुन्या कायद्यात फारच किरकोळ फरक आहे. खरा फरक आहे तो कायदा करण्यापूर्वीच्या तयारीचा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींखेरीज अन्य समाजवर्गांना मागासलेपणाच्या निकषावर आरक्षण द्यायचे असेल तर आधी त्या समाजाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक मागासलेपण मागासवर्ग आयोगाकडून तपासून घेणे सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोगाच्या निकालात बंधनकारक केले. मराठा आरक्षणाचा विषय २००४ पासूनचा आहे. २००५ मध्ये राज्य मागासवर्ग आयोग स्थापन झाल्यावर लगेचच हा विषय शिफारशीसाठी त्यांच्याकडे सोपविला गेला होता. परंतु २००८ मध्ये दिलेल्या अहवालात आयोगाने मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषांवर आरक्षण देता येणार नाही, असा अहवाल दिला. कायद्यानुसार आयोगाच्या शिफारशी सर्वसामान्यपणे सरकारवर बंधनकारक असतात. त्या अमान्य असतील तर सरकारला त्याची कारणे द्यावी लागतात. आधीच्या आघाडी सरकारने आयोगाकडे हा विषय पुन्हा नेला, पण आधीच्या अहवालावर कायद्यानुसार निर्णय घ्या, यावर आयोग अडून बसला. शेवटी सरकारने स्वत:च निर्णय घेण्याचे ठरविले. राणे समिती नेमली गेली आणि त्याआधारे वटहुकूम काढला.

आताच्या सरकारने हेच काम मागासवर्ग आयोगाकडूनच रीतसर करून घेतले. आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण मान्य केले, एवढेच नव्हे तर त्यांना आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची गरजही स्पष्टपणे प्रतिपादित केली. त्यामुळे आताच्या कायद्याला मराठा समाजाचे मागासलेपण आणि त्यांना शिक्षण व नोकरीत पुरेसे प्रतिनिधित्व नाही या दोन्ही मुद्द्यांवर कायद्यास अभिप्रेत असलेली सबळ पृष्ठभूमी मिळाली. मराठा समाजास ५० टक्क्यांच्या बाहेर जाऊन आरक्षण दिल्याने अन्य मागासवर्ग समाजाकडून विरोध आणि संघर्षाची शक्यताही निकाली निघाली. मराठा समाजास स्वातंत्र्यापूर्वी आरक्षण होते. राज्यघटना लागू झाल्यावर ते संपुष्टात आले. तेच पुन्हा मिळविण्यासाठी तीन पिढ्यांना वाट पाहावी लागली. ही प्रतीक्षा आता तरी कायमस्वरूपी संपुष्टात यावी, हीच अपेक्षा.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण