शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

लेनेके देने पडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2016 23:00 IST

‘मजाक मजाक’मध्ये आपण आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांपासून प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांच्या टोप्या उडवतो आणि ते सारेच ती बाब हसण्यावारी नेतात आणि करमणूक करण्याचा आपला हेतू साध्य होतो

‘मजाक मजाक’मध्ये आपण आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांपासून प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांच्या टोप्या उडवतो आणि ते सारेच ती बाब हसण्यावारी नेतात आणि करमणूक करण्याचा आपला हेतू साध्य होतो, तेव्हां वास्तव जीवनातही आपण तसेच काही करुन आपला हेतू साध्य करुन घेऊ असा काही विचार कपिल शर्मा यांनी केला असावा. पण आपण ज्या ‘रिअ‍ॅलिटी शो’मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर आज पोहोचलो आहेत त्यातील रिअ‍ॅलिटी आणि वास्तवातील रिअ‍ॅलिटी यामधील अंतर एव्हाना त्यांच्या लक्षात आले असावे. कारण गेल्या सप्ताहात भल्या सकाळी त्यांनी टिवटिवाट करुन जो गोंधळ उडवून दिला त्यापायी खुद्द त्यांच्यावरच ‘लेने के देने पडे’ अशी वेळ येऊन ठेपली आहे. मुंबईतील शर्मा यांंच्या कार्यालयाच्या कामासाठी मुंबई महापालिकेच्या कुणा (आजही अज्ञात) अधिकाऱ्याने पाच लाखांची लाच मागितल्याची तक्रार त्यांनी टिवटिवली व तसे करताना त्यात थेट पंतप्रधानांना खेचून घेतले. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी लगोलग या तक्रारीची दखल घेतली आणि टीकेचे भले मोठे मोहोळ अंगावर ओढवून घेतले. पण मुख्यमंत्री जातीने दखल घेतात म्हटल्यावर त्यांच्या हाताखालचेही सारे जातीने दक्ष झाले आणि त्यातून बाहेर पडला तो चक्क कपिल यांचाच कांगावखोरपणा. त्यातून एक शक्यता अशी दिसून येते की, आता त्यांच्यावर अनधिकृत काम करण्याचा आणि खारफुटीचे वाटोळे करण्याचा जो ठपका ठेवला गेला आहे, त्याची दाबादाबी करण्यासाठीच कुणा दयाळू अधिकाऱ्याने पाच लाख मागितले असावेत व शर्मांना ते फुकटात करुन हवे असावे. पण त्यांनी पंतप्रधानांच्या जाकिटालाच हात घातला आणि स्वत:च्या हातांनी स्वत:च्या पायांवर कुऱ्हाड मारुन घेतली. केवळ कार्यालयामध्येच नव्हे तर निवासस्थानीदेखील अनधिकृत बांधकाम करणे, खारफुटीची जमीन उद्ध्वस्त करुन सागरी किनारा प्रदेशात बांधकामासंबंधी असलेले निर्बन्ध उल्लंघिणे अशा अनेक आरोपांचे सुरे आता त्यांच्या दिशेने परजले जाऊ लागले आहेत. त्यांनी महापालिकेतील अधिकारी भ्रष्ट असल्याचा स्पष्ट आरोप केल्यामुळे तिथे सत्ता असलेली सेना-भाजपा युती तर खवळलीच आहे पण मनसे, सपा आदि पक्षदेखील (नजरेसमोर निवडणूक दिसत असल्याने) कपिलवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या विचारात आहेत. तरीही हे कमीच म्हणून की काय ज्या खासगी चित्रवाणीवर त्यांचा कार्यक्रम सध्या सुरु आहे त्या चित्रवाणीनेही हा कार्यक्रम संपविण्याचा म्हणे निर्णय घेतला आहे. मोदींशी कोण कशाला पंगा घेईल?