शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदेवभक्ताची नि:स्पृह सेवा उपेक्षित राहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 03:46 IST

लक्ष्मणदादा नारखेडे परवा गेले. कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांचे ते सहकारी. त्यांना अनुयायी किंवा भक्त यासाठी म्हणता येणार नाही कारण, तुकारामदादांच्याही कार्याकडे ते तटस्थतेने बघायचे.

-  गजानन जानभोर

लक्ष्मणदादा नारखेडे परवा गेले. कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्यांचे ते सहकारी. त्यांना अनुयायी किंवा भक्त यासाठी म्हणता येणार नाही कारण, तुकारामदादांच्याही कार्याकडे ते तटस्थतेने बघायचे. जिथे उणिवा राहायच्या तिथे स्पष्टपणे सांगायचे. म्हणूनच त्यांना दादांनी आपले उत्तराधिकारी नेमले. लक्ष्मणदादा प्रसिद्धीपराङमुख होते. आपले सामान्यपण ढळू न देता त्यांनी राष्ट्रसंतांच्या कार्यासाठी आयुष्य दिले. तुकारामदादांनी उभारलेल्या अड्याळ टेकडीवर ग्रामस्वराज्याचे अनेक प्रयोग सतत सुरू असतात. दादा गेल्यानंतर या कामाचे पुढे काय होईल, असा प्रश्न कार्यकर्त्यांना अस्वस्थ करायचा. दादांची असंख्य कामे अपुरी राहिली होती. त्यांनी ज्यांना आधार दिला ती माणसे आत्मनिर्भर व्हायची होती. आपण १०० वर्षांचे होईपर्यंत कार्यरत राहू, या दादांंच्या आश्वासनामुळे कार्यकर्त्यांना बळ आले होते. पण, १२ वर्षांपूर्वी तुकारामदादांनी अचानक या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना आलेले अनाथपण लक्ष्मणदादांनी कधी जाणवू दिले नाही. आपले घरदार, शेतीवाडी गुरुदेवाच्या कार्यासाठी समर्पित करून या कार्यकर्त्याने तुकारामदादांची सोबत धरली. लक्ष्मणदादा तसे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुऱ्याचे. पण, संपूर्ण आयुष्य त्यांनी सेवाकार्यातच घालवले. ग्रामस्वराज्याच्या चळवळीसाठी लक्ष्मणदादा सतत भ्रमंतीवर असायचे. तुकारामदादा गेल्यानंतर अड्याळ टेकडीच लक्ष्मणदादांचे कार्यक्षेत्र झाले. तुकारामदादा हे तपपूत जीवन जगणारे किंवा ईश्वर चिंतनात गढून राहणारे साधू नव्हते. ते समाजाच्या प्रश्नांशी नाते राखणारे, त्याच्यावरील संकटाविरुद्ध लढणारे कार्यकर्ते होते. लक्ष्मणदादांचा स्वभाव मात्र काहीसा शांत. कुठलेही वलय आपल्याभोवती निर्माण होणार नाही याची काळजी ते सतत घ्यायचे.कुठल्याही क्षेत्रातील माणसाच्या कार्याची दखल समाज घेऊ लागतो तेव्हा त्याच्याभोवती आपसूकच एक वलय निर्माण होत असते. त्याच्या कीर्तीत आणि लोकप्रियतेत हे असे वलयांकित असणे आवश्यक ठरते. पण, लक्ष्मणदादांनी असे कुठलेही वलय स्वत:भोवती निर्माण होऊ दिले नाही. त्यामुळे गुरुदेव सेवा परिवारात ते दुर्लक्षित राहिले आणि त्यांच्या नि:स्पृह सेवेची समाजाने म्हणावी तशी दखलही घेतली नाही. एरवी आयुष्याच्या संध्याकाळी असे कार्यकर्ते निराश होत असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक वैषम्य जाणवत असते. पण, लक्ष्मणदादांच्या चेहºयावरचे समाधानाचे भाव अखेरपर्यंत कायम होते.पुरस्कार, प्रसिद्धीमुळे आपल्यात अहंकार तर निर्माण होणार नाही, असे भिडस्त स्वभावाच्या या ज्येष्ठ कार्यकर्त्याला नेहमी वाटायचे. जाहीर भाषणात मला मान-सन्मानाची अपेक्षा नाही, असे म्हणायचे व नंतर मंत्र्या-संत्र्यांकडे लॉबिंग करून ते मिळवून घ्यायचे अशा लबाड्या म्हणूनच लक्ष्मणदादांना कधी जमल्या नाहीत. राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील खरा आणि प्रामाणिक गुरुदेवभक्त ते होते. आपण गेल्यानंतर समाजाचे, देशाचे आणि आपल्या कामाचे पुढे काय होईल, अशी चिंता काही सामाजिक कार्यकर्त्यांना उगाच लागून असते. त्या काळजीतून मग ते इच्छा असो नसो आपल्या मुलांवर सामाजिक कार्याचे ओझे लादत असतात. हा सेवेचा पिढीजात वारसा उपजत नसल्याने ते कार्य पुढे व्यावसायिक आणि प्रचारी पद्धतीने रेटले जाते. त्यातूनच त्या कामातील सेवा हळूहळू नष्ट होते आणि प्रसिद्धी व प्रतिष्ठेलाच सामाजिक कार्याचा मापदंड ठरवला जातो. लक्ष्मणदादांशी बोलताना त्यांना अशी चिंता असल्याचे जाणवले नाही. आपल्या पश्चात हे कार्य समाजच पुढे नेईल असे ते सांगायचे. त्यामुळे ते नसताना गुरुदेवभक्तांची जबाबदारी आणखी वाढणारी आहे.