शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

गुलशन-ए-ब्लास्ट

By admin | Updated: April 6, 2016 04:54 IST

शेजाऱ्याच्याघरात आग लावण्याची स्वप्ने पाहावीत आणि शेजार पेटण्याच्या आधी स्वत:चेच घर रोज थोडे थोडे जळावे, अशी काही गत पाकिस्तानची झाली आहे

शेजाऱ्याच्याघरात आग लावण्याची स्वप्ने पाहावीत आणि शेजार पेटण्याच्या आधी स्वत:चेच घर रोज थोडे थोडे जळावे, अशी काही गत पाकिस्तानची झाली आहे. दहशतवाद्यांना पोसून भारताला कायम अस्थिर ठेवण्याचे मनसुबे बाळगणारा पाकिस्तान स्वत: मात्र अस्थिरतेतून बाहेर पडू शकलेला नाही. लाहोर शहराच्या पूर्व भागात असलेल्या गुलशन-ए-इक्बाल नावाच्या पार्कमध्ये रविवारी गर्दीच्या दिवशीच दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला; त्यातून पुन्हा एकदा हेच अधोरेखित झाले. या पार्कमध्ये घडविण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात तब्बल ७२ निष्पाप पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेला आणि अडीचशेहून अधिक जण जखमी झाले. ज्यांनी हे दुष्कृत्य केले ते पाकिस्तानातच वाढलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. गेल्या तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानात एकूण १३ दहशतवादी हल्ले झाले असून, त्यात जवळपास दीडशे लोकांचा बळी गेला आहे. भारताला कायम धुमसत ठेवण्यासाठी पाळलेले दहशतवाद्यांच्या रूपातील साप पाकिस्तानलाच डंख करू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्य:स्थितीत पाकिस्तानात एकूण ४८ दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यातल्या तब्बल १२ संघटना पाकिस्तानातच जन्माला आलेल्या आहेत. लाहोरमध्ये नुकताच झालेला हल्ला हा अशाच स्वगृही जन्मलेल्या ‘जमात-उल-अहरार’ या दहशतवादी संघटनेची ‘कृपा’ ठरली आहे. ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेपासून विभक्त झाल्यानंतर या संघटनेने अधिक क्रूरपणे हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया संघटनेसोबत अर्थात इसिससोबत ‘जमात-उल-अहरार’चा संबंध असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे पाकिस्तानवर किती मोठे संकट येऊ घातलेय, याची जाणीव एव्हाना नवाज शरीफ यांच्या सरकारला व्हायला हवी होती. इसिससोबत संबंध ठेवणाऱ्या संघटना जर पाकिस्तानात पोसल्या जाणार असतील तर इराक आणि सीरियामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे, तीच स्थिती पाकमध्येही उद्भवेल, यात तिळमात्र शंका नाही. इसिसने इराक-सीरियात घातलेला धुमाकूळ आणि इतर पश्चिमी देशांवर केलेले हल्ले नजरेसमोर आणले तर मुस्लीम राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानवर इसिसच्या रूपातील मोठे संकट येऊ घातले आहे हे निश्चित. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिकेकडून कोट्यवधी डॉलरचा निधी खिशात घालणारा पाकिस्तान असेच जर वागत राहिला तर तेथील जनतेला आपल्याच देशात राहणे नकोसे होईल आणि पाक म्हणजे कायम बॉम्बस्फोटांनी धुमसत राहणारे गुलशन-ए-ब्लास्ट’ होऊन जाईल.