शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गुजरातच्या कापसाला ‘कमळ’चा सुगंध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 02:15 IST

- राजेश शेगोकारभाकरी का करपली, घोडा का अडला, पाने का सडली या तीन प्रश्नांची उत्तरे जशी ‘न फिरविल्याने’ या एका शब्दात आहे, तसेच शेतकरी कर्जबाजारी का झाला, आत्महत्या का करू लागला, शेती का कमी झाली, या तीन प्रश्नांचे उत्तर हे ‘शेतमालाला भाव न मिळाल्याने’ या एका वाक्यात आहे. सरकार कोणतेही ...

- राजेश शेगोकारभाकरी का करपली, घोडा का अडला, पाने का सडली या तीन प्रश्नांची उत्तरे जशी ‘न फिरविल्याने’ या एका शब्दात आहे, तसेच शेतकरी कर्जबाजारी का झाला, आत्महत्या का करू लागला, शेती का कमी झाली, या तीन प्रश्नांचे उत्तर हे ‘शेतमालाला भाव न मिळाल्याने’ या एका वाक्यात आहे. सरकार कोणतेही असो, हंगाम रब्बीचा असो की खरिपाचा; प्रत्येक वेळी शेतमालाच्या भावाचा प्रश्न ऐरणीवर असतो. खरे तर हा आर्थिक प्रश्न आहे; मात्र प्रत्येक वेळी त्याचे राजकीयकरण झाल्याने शेतकºयांच्या व्यथा कायमच आहेत. गेल्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी अमरावतीमध्ये पुन्हा एकदा शेतमालाच्या भावाचा प्रश्न उपस्थित केला. सध्या कापूस शेतकºयाच्या घरात येण्याचे दिवस आहेत. आधीच पावसाच्या लहरीपणामुळे या पिकाचे उत्पादन घटले असताना हमी भावाच्या प्रश्नाने एकदा उचल खाल्ली असून, या प्रश्नाचे पुन्हा राजकीयकरण झाले आहे.केंद्र शासनाने यावर्षी कापसाला प्रतिक्ंिवटल ४,३५० रुपये हमीदर जाहीर केला आहे. हा भाव उत्पादन खर्चही भरून काढू शकत नाही, त्यामुळे बोनस देण्याची मागणी आहे. राज्य शासन तीन वर्षांपासून शेतकºयांना बोनस देण्याची घोषणा करत आहे; पण त्याची अंमलबजावणी करत नाही. या पृष्ठभूमीवर गुजरात सरकारने कापसाला दिलेला भाव अन् बोनस सध्या शेतकºयांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. गुजरातच्या निवडणुका आहेत. त्या डोळ्यासमोर ठेवून गुजरात सरकारने हमीदराच्यावर प्रतिक्ंिवटल ५०० रुपये बोनस जाहीर केला असून, हा कापूस गुजरात कृषी माल खरेदी-विक्री संघ तसेच भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळामार्फत खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे गुजरातच्या शेतकºयांना प्रतिक्ंिवटल ४,८५० रुपये दर मिळणार आहे. सध्या गुजरातमध्ये चांगल्या वाळलेल्या कापसाला ४,३५० ते ४,५०० रुपये दर मिळत आहेत. केवळ मतांच्या राजकारणासाठी शेतकºयांचे प्रश्न हाती घेणाºया भाजपा नेत्यांना सध्या गुजरातच्या कापसाला कमळाचा सुगंध येत आहे, हे स्पष्टच आहे; मात्र त्याच भाजपाचे सरकार असलेल्या महाराष्टÑातील भाजपाच्या नेत्यांना ‘सर्दी’ झाली आहे का? ज्या शेतकºयांचे नाव घेऊन सत्ता मिळविली त्या शेतकºयांना भाजपाच्या राज्यात सर्वाधिक ससेहोलपट सहन करावी लागत आहे. विरोधात असताना हेच भाजपाचे नेते बेंबीच्या देठापासून कापसाच्या भावाचा प्रश्न मांडत होते, त्यामुळे आपल्याच पक्षाची सत्ता असलेल्या गुजरातपासून तरी धडा घेतल्या जाईल का? गुजरातमध्ये सिंचनाचे प्रमाण महाराष्टÑापेक्षाही जास्त आहे तरीसुद्धा ते सरकार कापसाला बोनस देते. विदर्भात तर कोरडवाहू शेती आहे. सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळेच यावर्षी एक हजारापेक्षा जास्त रकमेचा बोनस हवा आहे. पणन महासंघाने २५ आॅक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू केली; मात्र या खरेदीपूर्व आॅनलाईन नोंदणीची अट टाकल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. बहुतांश बाजार समित्यांमध्ये आॅनलाईन नोंदणीची व्यवस्थाच नसल्याने शेतकºयांना खासगी संगणकचालकांकडे धाव घ्यावी लागत आहे. प्रत्यक्ष कर्जमाफी अजून कागदावरच आहे अन् शेतमालाला भाव नाही, अशा स्थितीत केवळ आश्वासन देऊन चालणार नाही. गरज आहे ती कृतीची.

टॅग्स :cottonकापूस