शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

गुजरातच्या कापसाला ‘कमळ’चा सुगंध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 02:15 IST

- राजेश शेगोकारभाकरी का करपली, घोडा का अडला, पाने का सडली या तीन प्रश्नांची उत्तरे जशी ‘न फिरविल्याने’ या एका शब्दात आहे, तसेच शेतकरी कर्जबाजारी का झाला, आत्महत्या का करू लागला, शेती का कमी झाली, या तीन प्रश्नांचे उत्तर हे ‘शेतमालाला भाव न मिळाल्याने’ या एका वाक्यात आहे. सरकार कोणतेही ...

- राजेश शेगोकारभाकरी का करपली, घोडा का अडला, पाने का सडली या तीन प्रश्नांची उत्तरे जशी ‘न फिरविल्याने’ या एका शब्दात आहे, तसेच शेतकरी कर्जबाजारी का झाला, आत्महत्या का करू लागला, शेती का कमी झाली, या तीन प्रश्नांचे उत्तर हे ‘शेतमालाला भाव न मिळाल्याने’ या एका वाक्यात आहे. सरकार कोणतेही असो, हंगाम रब्बीचा असो की खरिपाचा; प्रत्येक वेळी शेतमालाच्या भावाचा प्रश्न ऐरणीवर असतो. खरे तर हा आर्थिक प्रश्न आहे; मात्र प्रत्येक वेळी त्याचे राजकीयकरण झाल्याने शेतकºयांच्या व्यथा कायमच आहेत. गेल्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी अमरावतीमध्ये पुन्हा एकदा शेतमालाच्या भावाचा प्रश्न उपस्थित केला. सध्या कापूस शेतकºयाच्या घरात येण्याचे दिवस आहेत. आधीच पावसाच्या लहरीपणामुळे या पिकाचे उत्पादन घटले असताना हमी भावाच्या प्रश्नाने एकदा उचल खाल्ली असून, या प्रश्नाचे पुन्हा राजकीयकरण झाले आहे.केंद्र शासनाने यावर्षी कापसाला प्रतिक्ंिवटल ४,३५० रुपये हमीदर जाहीर केला आहे. हा भाव उत्पादन खर्चही भरून काढू शकत नाही, त्यामुळे बोनस देण्याची मागणी आहे. राज्य शासन तीन वर्षांपासून शेतकºयांना बोनस देण्याची घोषणा करत आहे; पण त्याची अंमलबजावणी करत नाही. या पृष्ठभूमीवर गुजरात सरकारने कापसाला दिलेला भाव अन् बोनस सध्या शेतकºयांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. गुजरातच्या निवडणुका आहेत. त्या डोळ्यासमोर ठेवून गुजरात सरकारने हमीदराच्यावर प्रतिक्ंिवटल ५०० रुपये बोनस जाहीर केला असून, हा कापूस गुजरात कृषी माल खरेदी-विक्री संघ तसेच भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळामार्फत खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे गुजरातच्या शेतकºयांना प्रतिक्ंिवटल ४,८५० रुपये दर मिळणार आहे. सध्या गुजरातमध्ये चांगल्या वाळलेल्या कापसाला ४,३५० ते ४,५०० रुपये दर मिळत आहेत. केवळ मतांच्या राजकारणासाठी शेतकºयांचे प्रश्न हाती घेणाºया भाजपा नेत्यांना सध्या गुजरातच्या कापसाला कमळाचा सुगंध येत आहे, हे स्पष्टच आहे; मात्र त्याच भाजपाचे सरकार असलेल्या महाराष्टÑातील भाजपाच्या नेत्यांना ‘सर्दी’ झाली आहे का? ज्या शेतकºयांचे नाव घेऊन सत्ता मिळविली त्या शेतकºयांना भाजपाच्या राज्यात सर्वाधिक ससेहोलपट सहन करावी लागत आहे. विरोधात असताना हेच भाजपाचे नेते बेंबीच्या देठापासून कापसाच्या भावाचा प्रश्न मांडत होते, त्यामुळे आपल्याच पक्षाची सत्ता असलेल्या गुजरातपासून तरी धडा घेतल्या जाईल का? गुजरातमध्ये सिंचनाचे प्रमाण महाराष्टÑापेक्षाही जास्त आहे तरीसुद्धा ते सरकार कापसाला बोनस देते. विदर्भात तर कोरडवाहू शेती आहे. सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळेच यावर्षी एक हजारापेक्षा जास्त रकमेचा बोनस हवा आहे. पणन महासंघाने २५ आॅक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू केली; मात्र या खरेदीपूर्व आॅनलाईन नोंदणीची अट टाकल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. बहुतांश बाजार समित्यांमध्ये आॅनलाईन नोंदणीची व्यवस्थाच नसल्याने शेतकºयांना खासगी संगणकचालकांकडे धाव घ्यावी लागत आहे. प्रत्यक्ष कर्जमाफी अजून कागदावरच आहे अन् शेतमालाला भाव नाही, अशा स्थितीत केवळ आश्वासन देऊन चालणार नाही. गरज आहे ती कृतीची.

टॅग्स :cottonकापूस