शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Gudhi Padwa: गुढीपाडव्याच्या शोभायात्रांची सुरुवात कशी झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 06:06 IST

शेजार आहे; पण सोबत नाही या एकाकीपणाच्या भावनेतून डोंबिवली—ठाणेकरांनी गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचा प्रारंभ केला. त्यांचे सर्वसमावेशकत्व टिकले पाहिजे.

संदीप प्रधान                            

तब्बल २३ वर्षांपूर्वी १९९९ साली डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा सुरू करण्याची मुहूर्तमेढ रोवली. पाठोपाठ २००० साली ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिराने येथेही शोभायात्रा सुरू केली. पाहता-पाहता ठिकठिकाणी शोभायात्रा सुरू झाल्या. ढोल-ताशांच्या गजरावर थिरकणारी तरुणाई, घोड्यांवर बसलेले लहानगे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, बुलेट अथवा मोटारबाईकवर भगवे फेटे, रेबॅनचे गॉगल, नाकात नथ घालून व नऊवारी परिधान केलेली स्त्रीशक्ती, पारंपरिक वेशातील तरुणाई व पुरुष मंडळी असे हे चित्र असते. या उत्सवी वातावरणाबरोबर स्वच्छता, पाणीबचत, सौरऊर्जेचा वापर, रस्ते सुरक्षा अशा अनेकविध प्रश्नांचा कलात्मक अंगाने आढावा घेणारे चित्ररथ ही शोभायात्रेची वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्रात १९९५मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. तत्पूर्वी, अयोध्येत बाबरी मशीद पडली. देशात हिंदुत्वाचे वारे वाहत होते. त्याचवेळी खुल्या अर्थव्यवस्थेमुळे व्हॅलेंटाईन डेच्या सेलिब्रेशनवरून राडे सुरू झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात भूमिका घेतली. शिवसैनिकांनी प्रेमीयुगुलांना फटके दिले. तिकडे श्रीराम सेनेसारख्या संघटनेचे कार्यकर्तेही प्रेमिकांच्या पाठी हात धुऊन लागले. यामुळे तरुण पिढीच्या मनात हिंदुत्व, हिंदू संस्कृती याबद्दल ममत्व निर्माण होण्याऐवजी चीड निर्माण होऊ लागली. केवळ हल्ले करून हा प्रश्न सुटणार नाही हे डोंबिवलीतील धुरिणांनी हेरले. तरुणांना जर हिंदू संस्कृतीपासून तुटू द्यायचे नसेल तर त्यांना एखाद्या उत्सवाशी जोडले पाहिजे ही कल्पना पुढे आली. चैत्र पाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढण्याची कल्पना गणेश मंदिर संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी मांडली व ती डोंबिवलीकरांनी स्वीकारली. मुळात डोंबिवली हे मोजक्या मराठी कुटुंबांचे छोटे शहर होते. गिरगाव, दादर वगैरे भागांतील अनेकांनी कुटुंबांचा आकार वाढला व घरे लहान वाटू लागल्याने डोंबिवलीची वाट धरली होती. गिरगाव, दादर, परळ वगैरे भागांत गणेशोत्सवापासून गोविंदापर्यंत अनेक उत्सवांची परंपरा होती. या सणांच्या काळात या परिसरात चैतन्य फुललेले असायचे. डोंबिवली या नव्या शहरातील अनेकांचे जिणे हे एखाद्या डॉर्मेट्रीत केवळ रात्री पाठ टेकण्यापुरता आसरा घेतो तसे होते. शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतो, याचाही पत्ता नसायचा. अनेकजण चाळीत मोठे झाले होते व तेथील घरांचे दरवाजे केवळ रात्री आठ तास बंद असायचे. एखाद्या घरातील सुखद व दु:खद घटनेत संपूर्ण चाळकरी समरसून सहभाग घ्यायचे. त्यामुळे डोंबिवलीत आलेल्या अनेकांना शेजार होता, पण सोबत नव्हती. शोभायात्रेने डोंबिवलीकरांची ही सहवासाची भूक भागवली. 

ठाणे हेही ऐतिहासिक शहर; परंतु त्याचाही झपाट्याने विस्तार होत होता. येथेही मुंबईकरांचे लोंढे आदळत होते. डोंबिवलीकरांनी सुरू केलेली परंपरा ठाण्यात रुजवण्याकरिता कौपिनेश्वर मंदिराचे डॉ. प्र. वा. रेगे व अन्य विश्वस्त मंडळींनी पुढाकार घेतला. पहिल्याच वर्षी डोंबिवली व ठाण्यातील शोभायात्रांना हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो चित्ररथ शोभायात्रेत सामील झाले. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेपासून दुपारपर्यंत ही दोन्ही शहरे उन्हाची तमा न बाळगता रस्त्यावर उत्सवाचा आनंद घेतात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे निर्बंध होते. यंदा गुढीपाडव्यापासून मास्क वापरणे ऐच्छिक झाल्याने तर सर्वच बंधने सैलावली. आतापर्यंत शोभायात्रेत या दोन्ही शहरांमधील सर्व धर्मीय मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत. ‘राजकारणविरहित सांस्कृतिक चळवळ’, असे आतापर्यंत त्याचे स्वरूप आहे. गेल्या सात वर्षांत देशातील राजकीय प्रवाह सांस्कृतिक क्षेत्रावर वरचढ ठरल्याचे दिसते. शोभायात्रेमधील सर्वसमावेशकता टिकवणे हेच या घडीचे आव्हान आहे.

(लेखक लोकमतमध्ये वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाthaneठाणे