शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

विमा हप्त्यांवरील ‘जीएसटी’चा निर्णय पुन्हा अधांतरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 08:31 IST

विमा हप्त्यांवर जीएसटी आकारणे लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेशी, तसेच सरकारच्या सामाजिक उत्तरदायित्वाशी विसंगत, अयोग्य व अन्यायकारकच आहे.

ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली २१ डिसेंबर रोजी झालेल्या ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत आयुर्विमा व आरोग्य विम्यावरील ‘वस्तू आणि सेवा कर’ (‘जीएसटी’) १८ टक्क्यांवरून कमी करण्यासंबंधीच्या प्रस्तावावर सहमती होऊ शकली नाही. ‘‘राज्यांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले असताना विमा हप्त्यांवरील ‘जीएसटी’ कमी केल्यास त्यामुळे महसुली उत्पन्न कमी होईल व राज्यांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावेल,” अशी चिंता काही राज्यांनी व्यक्त केली. त्यामुळे विमा हप्त्यांवरील ‘जीएसटी’ संबंधात नेमण्यात आलेल्या मंत्रिगटास यावर निर्णय घेण्यास आणखी वेळ हवा असल्याचे कारण सांगून निर्णय  पुढे ढकलला गेला.

वास्तविक हा निर्णय घेतल्यास सरकारच्या महसुली उत्पन्नात किती घट होईल याचा आढावा घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या महसुली अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ‘फिटमेंट समिती’ने यासंबंधीचे मूल्यांकन करून त्यासंबंधीचा  अहवाल ९ सप्टेंबर, २०२४ रोजी ‘जीएसटी’ समितीला सादर केला होता. ‘जीएसटी’ परिषदेमध्ये त्यावर व्यापक एकमत झाले होते. त्यानंतर आयुर्विमा व आरोग्य विम्याचे दर निश्चित करण्यासाठी ‘जीएसटी’ परिषदेने  १३ सदस्यीय मंत्रिगटाची स्थापना केली होती. या मंत्रिगटास त्यांचा अहवाल ३१ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत ‘जीएसटी’ परिषदेला सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली व २१ डिसेंबर रोजी झालेल्या ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत अखिल भारतीय विमा नियामक प्राधिकरण (आयआरडीएआय) यांच्याकडून काही माहिती येणे बाकी असल्याने हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

मंत्रिगटाच्या शिफारशीबिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या मंत्रिगटाच्या १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य विम्याचा हप्ता पूर्णपणे जीएसटीमुक्त असावा, ज्येष्ठांव्यतिरिक्त इतरांसाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्यविम्याच्या हप्त्याला सूट द्यावी व ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या हप्त्यांवर पूर्वीप्रमाणेच १८ टक्के जीएसटी वसूल करावा, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या आयुर्विमा पॉलिसीच्या टर्म इन्शुरन्सचा हप्ता जीएसटीमुक्त करावा यावर बहुतांश सदस्यांची सहमती झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. जर मंत्रिगटाला आणखी माहिती हवी होती तर त्यांनी ती ‘आयआरडीएआय’कडून यापूर्वीच का मागविली नाही? माहिती मागविलेली असल्यास ती साडेतीन महिन्यांत मंत्रिगटाला का दिली नाही? वरील माहिती उपलब्ध नसताना मंत्रिगटाने त्यांच्या शिफारशी १९ ऑक्टोबर रोजी जाहीर का केल्या? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.  मुळात जीवनावश्यक वस्तू व सेवांना ‘जीएसटी’मधून वगळणे अथवा त्यावर कमी दराने ‘जीएसटी’ आकारणे व चैनींच्या वस्तू व सेवांवर जास्त दराने ‘जीएसटी’आकारणे हा ‘वस्तू व सेवा कर कायद्या’चा मूलाधार आहे. आयुर्विमा व आरोग्यविमा या जीवनावश्यक सेवा असून त्यावर ‘जीएसटी’आकारणे म्हणूनच अयोग्य आहे; परंतु सरकार विमा हप्त्यांवर सूट देण्याऐवजी त्यावर १८ टक्के दराने ‘जीएसटी’वसूल करते. म्हणजेच आरोग्य विम्याच्या २० हजार रुपयांच्या हप्त्यावर जनतेला ३६०० रुपये ‘जीएसटी’ भरावा लागतो. गेल्या काही वर्षांत ‘आरोग्य विम्याच्या हप्त्यात दीडपटीपेक्षा जास्त वाढ झालेली असून त्यावर आकारल्या जाणाऱ्या ‘जीएसटी’मुळे मध्यमवर्गीयांनाही आवश्यक इतक्या रकमेचा आरोग्यविमा घेणे कठीण झालेले आहे. सरकारला गेल्यावर्षी आरोग्य विम्यावरील जीएसटीमुळे ८२६२.९४ कोटी, तर गेल्या तीन वर्षांत २४ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम  मिळालेली आहे.

विमा हप्त्यांवरील ‘जीएसटी’ रद्द होईल या आशेने लोक विमा घेण्याचा निर्णय पुढे ढकलत असून त्याचा विमा व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. मुळात विमा हप्त्यांवर ‘जीएसटी’ आकारणे घटनात्मक मूल्यांशी, ‘लोककल्याणकारी राज्या’च्या संकल्पनेशी, विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या उद्दिष्टांशी तसेच सरकारच्या सामाजिक उत्तरदायित्वाशी विसंगत, अयोग्य व अन्याय्य असून तो त्वरित रद्द करणे आवश्यक आहे. kantilaltated@gmail.com

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनGSTजीएसटी