शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
2
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
3
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
4
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
5
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
6
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
7
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
8
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
9
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
10
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...
11
एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
12
या युक्रेनियन जोडप्याने केलं ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ यशस्वी, असा दिला रशियाला जबर धक्का 
13
तुर्कीसाठी भारताच्या मित्रावर दबावाचा प्रयत्न; पाकिस्तान समर्थक अझरबैजानची नवी खेळी
14
Usha Nadkarni : ऑफिसमध्ये भावाला मारल्याचं समजताच उषा नाडकर्णींची सटकली, त्याला पकडलं अन्...
15
Astrology: बुधवार ४ जून, गजकेसरी योगात 'या' ५ राशींवर होणार लक्ष्मीकृपा; मिळेल आर्थिक स्थैर्य!
16
इंधनावरील दुचाकी आणि इलेक्ट्रिक दुचाकींच्या विम्यात फरक काय असतो? एकदा दोन्हींचे फायदे पहाच...
17
Water Taxi: वेळही वाचणार, प्रवासही सुखकर; मुंबईत सुरू होतेय वॉटर टॅक्सी, अवघ्या ४० मिनिटांत नवी मुंबई गाठा!
18
'रामायण'मधील शूर्पणखा आठवतेय का? रावणाची बहीण बनण्यासाठी मिळालेलं फक्त इतकं मानधन
19
“रुपाली चाकणकरांवर बोलून प्रसिद्धी मिळायला, त्या रश्मिका मंदाना आहेत का?”: सुषमा अंधारे
20
IPL Final ची ओढ! विराटची साथ सोडल्याची चर्चा रंगली, पण तो दिवस उगवायच्या आत RCB च्या ताफ्यात

लॉकडाऊनने दिले की चांगले अनुभव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:20 IST

मिलिंद कुलकर्णी २१ दिवसांसाठी लागू झालेल्या लॉकडाऊनने ९० दिवस पूर्ण केले. साखळी तुटलेली काही दिसत नाही. कारण रुग्ण अद्याप ...

मिलिंद कुलकर्णी२१ दिवसांसाठी लागू झालेल्या लॉकडाऊनने ९० दिवस पूर्ण केले. साखळी तुटलेली काही दिसत नाही. कारण रुग्ण अद्याप वाढतायत. कुणी जनतेला दोष देतंय, कुणी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवतंय. अर्थव्यवस्था डबघाईला येतेय, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि नोकरीत चढउतार सुरु आहेत. हे सगळे नकारात्मक चित्र वास्तव असले तरी या तीन महिन्यांनी काही चांगले अनुभवदेखील दिले की, त्याविषयी चर्चा करुया ना !समाजमाध्यमांवर एक संदेश अधूनमधून फिरत असतो. तुम्ही १९६०, ७० च्या दशकात जन्म घेतला असेल तर तुम्हाला देशी खेळ, व्हीडिओ, वाचनालयातील पुस्तके असे अनुभव स्मरणात असतील, आणि या गोष्टी नामशेष होतानाही तुम्ही पाहिल्या. तुम्ही खरे भाग्यशाली आहात, असा त्या संदेशाचा एकंदरीत अर्थ आहे. तसाच अनुभव सगळ्याच वयोगटातील मंडळींनी या काळात घेतला.परदेश, परराज्य व महानगरांमध्ये स्थायिक झालेली मंडळी गावाकडे परतली. काही काळासाठी का होईना, या परतलेल्या भावंडांमुळे कुटुंब पुन्हा एकसंघ झाले. नातेबंध अधिक दृढ झाले. पुढच्या पिढीत कौटुंबिक जिव्हाळा वाढला. आपले क्षितीज कितीही विस्तारले, तरी घरट्यात परत यावेच लागते, हे नवे भान या काळाने दिले. परदेश, परराज्य व महानगरात राहत असल्याने दोन शिंगे अधिक असल्याचा अहंकार या काळात गळून पडला. गावाकडे राहणारा नातलगदेखील सुशिक्षित, सुसंपन्न व समृध्द आहे. नातेवाईकांशी ऋणानुबंध आहेत. अडीअडचणीत धावून जाणारी भावकी आहे, याची प्रचिती दिली. गावाशी नाळ कायम ठेवायला हवी, ही जाणीव झाली. सणवार, लग्न समारंभ, यात्रोत्सव काळात जसे जमेल तसे यायचे, असा निर्धार केला गेला. ही जमा बाजू नाही काय?ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनचा काळ आल्याने सुटीत बाहेरगावी जाणारे, चित्रपट-हॉटेलची नियमित सवय असलेले लोक सक्तीने घरी राहिले. त्याचे लाभ तरी किती झाले. गृहिणीचे कष्ट पुरुषमंडळींना कधी नव्हे ते दिसले. पुरुषांमधील पाककलेचा गुण घरच्यांना कळाला. हॉटेलमध्येच खाल्लेल्या नवनव्या डिशेश ‘यु ट्यूब’च्या माध्यमातून घरी बनू लागल्या. उन्हाळी कामे यंदा वेळेत झाली. सगळ्यांचा हातभार लागल्याने महिलावर्गावर भार पडला नाही. वार्षिक धान्य खरेदीनंतर त्याला ऊन दाखविणे झाले. बिबड्या,कुरडया, उडदाचे पापड, शेवया या उन्हाळी कामांना सगळ्यांचा हातभार लागला. घरातील कपाटे, माळे आवरले गेले. अंथरुणे, पांघरुणे धुवून झाली. गाद्या-उशांना ऊन दाखवून झाले. केवढी कामांची यादी असते, हे प्रथमच घरातील सगळ्यांना कळले.कॅरम, पत्ते, चौपट, भोवरा, गोट्या, ल्युडो, व्यापार, सापशिडी असे बैठे खेळ रोज खेळले गेले. टीव्ही पेक्षा या खेळांचा आनंद वेगळा असतो, याची अनुभूती बालगोपाळांना आली.प्रदर्शनांमधून घेतलेली, भेट म्हणून मिळालेली अनेक पुस्तके कपाटाचे धन बनले असताना या काळात त्यावरील धूळ झटकली गेली. पुस्तके वाचनाचा आनंद पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन गेला. धावपळीच्या जीवनात या आनंदापासून आपण मुकलो होतो, हे जाणवले. आता रोज किमान एक पान वाचायचे असा निर्धार केला गेला.आॅनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होमच्या निमित्ताने नवे अ‍ॅन्ड्राईड मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप घरात आले. घरातील आजीसह मध्यमवयीन आईदेखील तंत्रस्रेही झाली. युट्यूबरील अध्यामिक प्रवचने, पाककला, टी.व्ही.वरील मालिकांचे सुटून गेलेले भाग बघण्याचा आनंद महिला वर्ग घेऊ लागला.तात्पुरता रोजगार गमावलेल्या भंगार विक्रेता, रिक्षाचालक बांधवांनी हार न मानता लोटगाडी, रिक्षेचा वापर भाजीपाला, फळे विक्रीसाठी केला. लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने घरपोच भाजीपाला, फळे मिळत असल्याने प्रतिसाद चांगला मिळाला. शेतकरी बांधवांनीदेखील बांधावरुन थेट ग्राहकाच्या घरापर्यंत माल पोहोचविला. दलालाची साखळी तुटल्याने शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले आणि ग्राहकाला ताजा भाजीपाला मिळाला.अनेक साहित्यप्रेमी व्हीडिओद्वारे कथाकथन, साहित्यवाचन, कवितावाचनाच्या कार्यक्रमात रंगले. काहींनी भूतकाळात रमत आठवणी शब्दबध्द केल्या. घरी राहणे फार काही कंटाळवाणे नसते हे सक्तीच्या लॉकडाऊनने शिकविले. या चांगल्या गोष्टींविषयीदेखील बोलायला हवे की, नको, सांगा बरे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव