शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:41 IST

विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते.

विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांपासून तर विविध राजकीय पक्षांच्या सर्वच बड्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा यात पणास लावली. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर ग्रामीण भागातील मतदार विशेषत: तरुण वर्ग कमालीचा खूश असल्याने तो आपल्यालाच मतदान करेल व या निमित्ताने ग्रामीण भागातील आपले स्थान अधिक बळकट करता येईल, हा राज्यातील फडणवीस सरकारचा होरा होता. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमागील गणित हेच होते. मुख्यमंत्री फडणवीस यात बºयाचअंशी यशस्वीदेखील ठरले. एरवी शहरी भागापुरता मर्यादित असलेला भाजप आता ग्रामीण भागातही अधिक मजबूत झाला आहे. या पक्षाचा मतदार वर्ग वाढला आहे, हे या निवडणुकीतून दिसून आले. पण, त्याचवेळी मागील तीन वर्षांपासून गर्भगळीत अवस्थेत असलेली काँग्रेस पुन्हा नव्या जोमाने उभी राहत आहे, किंबहुना गमावलेला जनाधार या राष्ट्रीय पक्षाकडे वळत आहे हे वास्तवही या निवडणुकीतून समोर आले. पण, ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाबद्दलचे ठोकताळे बांधणे धाडसाचे असते. या निवडणुका वैयक्तिक पातळीवरच अधिक लढल्या जातात. जातीपेक्षा पोटजाती आणि गणगोतांच्या मतांचा आधार महत्त्वाचा असतो. हे गणगोत राजकीय पक्षांच्या भिंती तोडून मतदान करीत असतात. या निवडणुकीच्या निकालातून आपला पक्ष मजबूत झाला आहे, असे कोणत्याही राजकीय पक्षाने समजू नये. याचे कारण असे की ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांची कधी चर्चा होत नाही. इथे देवाच्या आणि धर्माचेही वाद-विवाद रंगविले जात नाहीत. धार्मिक दंगली उफाळल्या तर त्याचा आपल्याला फायदा मिळेल, असे कटकारस्थान कुणाला रचताही येत नाही. फार काय तर ज्या गावात ही निवडणूक होते त्या गावातील नागरी समस्यांचीही चर्चा सबंध निवडणुकीच्या काळात होताना दिसत नाही. गटातटाच्या राजकारणातून निर्माण झालेल्या स्थानिक आघाड्यांपुरता हा रागरंग असतो. निवडणुकीनंतर मात्र राजकीय पक्ष आणि त्यातल्यात्यात सत्ताधारी पक्ष गावाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करून पुढचे राजकारण खेळू शकतात. निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी केलेले दावे म्हणूनच हास्यास्पद ठरतात. कुरघोडीच्या राजकारणाचा भाग म्हणून हे समजून घेता येईल. पण, दीर्घ राजकारणाच्या दृष्टीने या गोष्टी या पक्षांसाठीच घातक ठरू शकतात.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक