शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

ग्रामपंचायतींची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:41 IST

विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते.

विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांपासून तर विविध राजकीय पक्षांच्या सर्वच बड्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा यात पणास लावली. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर ग्रामीण भागातील मतदार विशेषत: तरुण वर्ग कमालीचा खूश असल्याने तो आपल्यालाच मतदान करेल व या निमित्ताने ग्रामीण भागातील आपले स्थान अधिक बळकट करता येईल, हा राज्यातील फडणवीस सरकारचा होरा होता. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमागील गणित हेच होते. मुख्यमंत्री फडणवीस यात बºयाचअंशी यशस्वीदेखील ठरले. एरवी शहरी भागापुरता मर्यादित असलेला भाजप आता ग्रामीण भागातही अधिक मजबूत झाला आहे. या पक्षाचा मतदार वर्ग वाढला आहे, हे या निवडणुकीतून दिसून आले. पण, त्याचवेळी मागील तीन वर्षांपासून गर्भगळीत अवस्थेत असलेली काँग्रेस पुन्हा नव्या जोमाने उभी राहत आहे, किंबहुना गमावलेला जनाधार या राष्ट्रीय पक्षाकडे वळत आहे हे वास्तवही या निवडणुकीतून समोर आले. पण, ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाबद्दलचे ठोकताळे बांधणे धाडसाचे असते. या निवडणुका वैयक्तिक पातळीवरच अधिक लढल्या जातात. जातीपेक्षा पोटजाती आणि गणगोतांच्या मतांचा आधार महत्त्वाचा असतो. हे गणगोत राजकीय पक्षांच्या भिंती तोडून मतदान करीत असतात. या निवडणुकीच्या निकालातून आपला पक्ष मजबूत झाला आहे, असे कोणत्याही राजकीय पक्षाने समजू नये. याचे कारण असे की ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांची कधी चर्चा होत नाही. इथे देवाच्या आणि धर्माचेही वाद-विवाद रंगविले जात नाहीत. धार्मिक दंगली उफाळल्या तर त्याचा आपल्याला फायदा मिळेल, असे कटकारस्थान कुणाला रचताही येत नाही. फार काय तर ज्या गावात ही निवडणूक होते त्या गावातील नागरी समस्यांचीही चर्चा सबंध निवडणुकीच्या काळात होताना दिसत नाही. गटातटाच्या राजकारणातून निर्माण झालेल्या स्थानिक आघाड्यांपुरता हा रागरंग असतो. निवडणुकीनंतर मात्र राजकीय पक्ष आणि त्यातल्यात्यात सत्ताधारी पक्ष गावाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करून पुढचे राजकारण खेळू शकतात. निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी केलेले दावे म्हणूनच हास्यास्पद ठरतात. कुरघोडीच्या राजकारणाचा भाग म्हणून हे समजून घेता येईल. पण, दीर्घ राजकारणाच्या दृष्टीने या गोष्टी या पक्षांसाठीच घातक ठरू शकतात.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक