शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

ग्रामपंचायतींची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:41 IST

विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते.

विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांपासून तर विविध राजकीय पक्षांच्या सर्वच बड्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा यात पणास लावली. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर ग्रामीण भागातील मतदार विशेषत: तरुण वर्ग कमालीचा खूश असल्याने तो आपल्यालाच मतदान करेल व या निमित्ताने ग्रामीण भागातील आपले स्थान अधिक बळकट करता येईल, हा राज्यातील फडणवीस सरकारचा होरा होता. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमागील गणित हेच होते. मुख्यमंत्री फडणवीस यात बºयाचअंशी यशस्वीदेखील ठरले. एरवी शहरी भागापुरता मर्यादित असलेला भाजप आता ग्रामीण भागातही अधिक मजबूत झाला आहे. या पक्षाचा मतदार वर्ग वाढला आहे, हे या निवडणुकीतून दिसून आले. पण, त्याचवेळी मागील तीन वर्षांपासून गर्भगळीत अवस्थेत असलेली काँग्रेस पुन्हा नव्या जोमाने उभी राहत आहे, किंबहुना गमावलेला जनाधार या राष्ट्रीय पक्षाकडे वळत आहे हे वास्तवही या निवडणुकीतून समोर आले. पण, ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाबद्दलचे ठोकताळे बांधणे धाडसाचे असते. या निवडणुका वैयक्तिक पातळीवरच अधिक लढल्या जातात. जातीपेक्षा पोटजाती आणि गणगोतांच्या मतांचा आधार महत्त्वाचा असतो. हे गणगोत राजकीय पक्षांच्या भिंती तोडून मतदान करीत असतात. या निवडणुकीच्या निकालातून आपला पक्ष मजबूत झाला आहे, असे कोणत्याही राजकीय पक्षाने समजू नये. याचे कारण असे की ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांची कधी चर्चा होत नाही. इथे देवाच्या आणि धर्माचेही वाद-विवाद रंगविले जात नाहीत. धार्मिक दंगली उफाळल्या तर त्याचा आपल्याला फायदा मिळेल, असे कटकारस्थान कुणाला रचताही येत नाही. फार काय तर ज्या गावात ही निवडणूक होते त्या गावातील नागरी समस्यांचीही चर्चा सबंध निवडणुकीच्या काळात होताना दिसत नाही. गटातटाच्या राजकारणातून निर्माण झालेल्या स्थानिक आघाड्यांपुरता हा रागरंग असतो. निवडणुकीनंतर मात्र राजकीय पक्ष आणि त्यातल्यात्यात सत्ताधारी पक्ष गावाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करून पुढचे राजकारण खेळू शकतात. निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी केलेले दावे म्हणूनच हास्यास्पद ठरतात. कुरघोडीच्या राजकारणाचा भाग म्हणून हे समजून घेता येईल. पण, दीर्घ राजकारणाच्या दृष्टीने या गोष्टी या पक्षांसाठीच घातक ठरू शकतात.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक