शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरांनी डोळसपणे मतदान करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:28 IST

सध्या मुंबई विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार दीपक सावंत असून, मंत्रिपद टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यात मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उडी घेतल्याने निवडणुकीला चांगलाच रंग आला आहे.

मुंबई विभागातील राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा आहे. सध्या मुंबई विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार दीपक सावंत असून, मंत्रिपद टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यात मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उडी घेतल्याने निवडणुकीला चांगलाच रंग आला आहे. ‘लोकमत विशेष’मध्ये या निवडणूक प्रक्रियेवर प्रकाश टाकण्यासाठी दीपक पवार यांच्याशी साधलेला हा संवाद...पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत काय सांगाल?मुळात पदवीधर संघाची निवडणूक नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे. कोणत्याही विद्यापीठातील पदवी धारण केलेला व मुंबईत राहणारा मतदार पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करू शकतो. मात्र पदवी धारण न केलेल्या नागरिकांच्या तुलनेत मिळालेल्या या विशेष अधिकाराचा उपयोग करून घेण्यात पदवीधर मतदार नेहमीच निरुत्साही दिसला आहे. मुंबईत सुमारे पंधरा लाखांहून अधिक पदवीधर आहेत. मात्र गतवेळी केवळ सत्तर हजार पदवीधरांनी मतदार नोंदणी केली होती. त्यातील फक्त १४ हजार ५०० मते मिळूनही सावंत विजयी झाले होते. यामधून या निवडणुकीतील निरुत्साह दिसतो.निवडणुकीबाबत निरुत्साह असण्याचे कारण काय?मुळात या निवडणुकीत प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करावी लागते. तुम्ही आधी मतदान केले असेल, तरीही तुम्हाला प्रत्येक निवडणुकीला नव्याने नोंदणी करणे बंधनकारक असते. म्हणूनच प्रौढ मतदार पुन्हा पुन्हा नोंदणी करण्याची तसदी घेत नाहीत. त्यात या निवडणुकीसाठी आॅनलाइन नोंदणीची मुभा नाही. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीचा आम्हाला काय फायदा, असा सवाल पदवीधर करतात.मग निवडणूक घेण्यामागचा उद्देश काय?पदवीधरांचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी घटनाकारांनी ही तजवीज केलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत त्याबाबत म्हणावी तितकी जनजागृतीच झालेली नाही. त्यामुळे बहुतेक पदवीधरांना त्याची जाणीव नाही. निकाल वेळेवर मिळत नाही, उत्तरपत्रिका प्रशासनाने गहाळ केल्या आहेत, स्थलांतर प्रमाणपत्र देत नाहीत, असे पदवीधर आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी ही निवडणूक जिंकणाºया उमेदवारावर असते. नोकरी, उद्योगधंद्याच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी रोजगारनिर्मितीचे प्रश्न विधिमंडळात मांडलेच जात नाहीत. मुळात पदवीधर आमदाराने ते मांडणे अपेक्षित असते.तरुणांचे प्रश्न मांडण्यात पदवीधर आमदार उदासीन का दिसतात?कारण या निवडणुकीत जरी मतदार पदवीधर असला, तरी ती लढणाºया उमेदवाराला शिक्षणाची अट नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे स्वत: पदवीधर नसलेला उमेदवार पदवीधरांचे प्रश्न कसे मांडणार? आत्तापर्यंत प्रमोद नवलकर तीनवेळा आणि दीपक सावंत यांनी दोनवेळा मुंबईतील पदवीधर निवडणूक जिंकली आहे. मात्र कधीही पदवीधरांचे प्रश्न मांडताना ते दिसले नाहीत. त्यामुळे आता तरी पदवीधरांनी डोळसपणे मतदान करण्याचे आवाहन करत आहे.तुम्ही निवडणूक लढण्याचे कारण काय?मराठी भाषेसाठी काम करताना महाविद्यालयांत मराठी बीएमएम सुरू करण्यात मराठी अभ्यास केंद्राचा मोठा वाटा होता. विद्यापीठात मराठी भाषेचा विभाग सुरू करणे असो किंवा अशा मराठीच्या संवर्धनासाठी अनेक लढाया आम्ही लढल्या आहेत. आता काही प्रश्न हे विधिमंडळ स्तरावर मांडण्यासाठी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणे गरजेचे आहे.

(मुलाखत - चेतन ननावरे)

टॅग्स :Mumbaiमुंबई