शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:58 IST

‘सरकारी काम दोन दिवस थांब’ अशी लोकप्रिय म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येतो आहे. सरकारी वकील प्रकरणाची तयारी करून येत नाहीत हे निरीक्षण नोंदविताना वाईट वाटते अशी प्रतिक्रिया थेट न्यायमूर्तींनी व्यक्त केल्याने या विषयाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

‘सरकारी काम दोन दिवस थांब’ अशी लोकप्रिय म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येतो आहे. सरकारी वकील प्रकरणाची तयारी करून येत नाहीत हे निरीक्षण नोंदविताना वाईट वाटते अशी प्रतिक्रिया थेट न्यायमूर्तींनी व्यक्त केल्याने या विषयाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. सरकारी वकिलांच्या अकार्यक्षम भूमिकेमुळे न्यायदानाच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे. बालाजी किन्हाळे यांच्या प्रलंबित फौजदारी प्रकरणात न्यायमूर्ती रोहित देव यांनी हे मत व्यक्त केले असले तरी सरकारी मानसिकता बाळगणाºया सर्व वकिलांना हे लागू पडते. नागपुरातील सरकारी वकील हुशार नाहीत, अशातला भाग नाही. सरकारी वकील हुशार असले तरी त्यांच्या मानसिकतेला सरकारी किनार आहे. देशातील विधी क्षेत्रात नागपुरातील वकील आजही सर्वश्रेष्ठ ठरत आले आहे. मग ते सरकारी असो वा खासगी प्रक्टिस करणारे. मग सरकारी वकील अकार्यक्षमपणे वागतात ही टीका करण्याची न्यायालयावर वेळ का आली, यासाठी निश्चितच खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. मुळात आपल्याकडे सरकार बदलले की सरकारी वकीलही बदलात. सरकार आपल्या विचारांशी जुळणाºया लोकांना सरकारी वकील होण्याची संधीही देते. अशा नियुक्त्यामागे राजकीय हितही असते. मात्र अकार्यक्षम सरकारी वकिलांच्या नियुक्त्या होऊ नये यासाठी सरकारने धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे वकिलांची कार्यक्षमता पाहूनच त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असाव्या असा अंदाज बांधणे चुकीचे ठरणार नाही. मग सरकारी वकिलांना वेळ मिळत नसल्याने कदाचित ते न्यायालयात सरकारी प्रकरणात कमी पडत असावे असा युक्तिवाद सध्या चर्चिला जात आहे. सरकारी वकिलांना खासगी प्रॅक्टिस करण्याचे बंधन नाही. ते सरकार विरोधातील प्रकरण वगळून कोणत्याही प्रकरणात पॅ्रक्टिस करू शकतात. खासगी प्रॅक्टिसमधील त्यांचा सहभाग अधिक वाढत असल्याने कदाचित त्यांना वेळ मिळत नसावा, असा अंदाज बांधला तर न्यायालयाने ज्या तीन प्रश्नांची राज्याच्या प्रधान सचिवांना विचारणा केली आहे त्याचे उत्तर देताना निश्चितच नाकीनऊ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी कंपन्यात काम करणाºया प्रत्येकाला आता ‘केआरए’चे बंधन आले आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशी केआरएची व्याख्या आहे. त्यामुळे सरकारी वकिलांची कार्यक्षमता तपासण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी ‘केआरए’ लागू केला तरी कदाचित न्यायदानाच्या प्रक्रियेला गती येईल आणि वकिलांच्या सरकारी मानसिकतेवर दडपण येईल.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र