शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सरकारी मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:58 IST

‘सरकारी काम दोन दिवस थांब’ अशी लोकप्रिय म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येतो आहे. सरकारी वकील प्रकरणाची तयारी करून येत नाहीत हे निरीक्षण नोंदविताना वाईट वाटते अशी प्रतिक्रिया थेट न्यायमूर्तींनी व्यक्त केल्याने या विषयाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

‘सरकारी काम दोन दिवस थांब’ अशी लोकप्रिय म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येतो आहे. सरकारी वकील प्रकरणाची तयारी करून येत नाहीत हे निरीक्षण नोंदविताना वाईट वाटते अशी प्रतिक्रिया थेट न्यायमूर्तींनी व्यक्त केल्याने या विषयाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. सरकारी वकिलांच्या अकार्यक्षम भूमिकेमुळे न्यायदानाच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे. बालाजी किन्हाळे यांच्या प्रलंबित फौजदारी प्रकरणात न्यायमूर्ती रोहित देव यांनी हे मत व्यक्त केले असले तरी सरकारी मानसिकता बाळगणाºया सर्व वकिलांना हे लागू पडते. नागपुरातील सरकारी वकील हुशार नाहीत, अशातला भाग नाही. सरकारी वकील हुशार असले तरी त्यांच्या मानसिकतेला सरकारी किनार आहे. देशातील विधी क्षेत्रात नागपुरातील वकील आजही सर्वश्रेष्ठ ठरत आले आहे. मग ते सरकारी असो वा खासगी प्रक्टिस करणारे. मग सरकारी वकील अकार्यक्षमपणे वागतात ही टीका करण्याची न्यायालयावर वेळ का आली, यासाठी निश्चितच खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. मुळात आपल्याकडे सरकार बदलले की सरकारी वकीलही बदलात. सरकार आपल्या विचारांशी जुळणाºया लोकांना सरकारी वकील होण्याची संधीही देते. अशा नियुक्त्यामागे राजकीय हितही असते. मात्र अकार्यक्षम सरकारी वकिलांच्या नियुक्त्या होऊ नये यासाठी सरकारने धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे वकिलांची कार्यक्षमता पाहूनच त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असाव्या असा अंदाज बांधणे चुकीचे ठरणार नाही. मग सरकारी वकिलांना वेळ मिळत नसल्याने कदाचित ते न्यायालयात सरकारी प्रकरणात कमी पडत असावे असा युक्तिवाद सध्या चर्चिला जात आहे. सरकारी वकिलांना खासगी प्रॅक्टिस करण्याचे बंधन नाही. ते सरकार विरोधातील प्रकरण वगळून कोणत्याही प्रकरणात पॅ्रक्टिस करू शकतात. खासगी प्रॅक्टिसमधील त्यांचा सहभाग अधिक वाढत असल्याने कदाचित त्यांना वेळ मिळत नसावा, असा अंदाज बांधला तर न्यायालयाने ज्या तीन प्रश्नांची राज्याच्या प्रधान सचिवांना विचारणा केली आहे त्याचे उत्तर देताना निश्चितच नाकीनऊ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी कंपन्यात काम करणाºया प्रत्येकाला आता ‘केआरए’चे बंधन आले आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशी केआरएची व्याख्या आहे. त्यामुळे सरकारी वकिलांची कार्यक्षमता तपासण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी ‘केआरए’ लागू केला तरी कदाचित न्यायदानाच्या प्रक्रियेला गती येईल आणि वकिलांच्या सरकारी मानसिकतेवर दडपण येईल.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र