शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
6
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
7
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
8
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
9
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
10
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
11
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
12
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
13
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
14
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
15
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
16
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
17
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
18
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
19
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
20
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:58 IST

‘सरकारी काम दोन दिवस थांब’ अशी लोकप्रिय म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येतो आहे. सरकारी वकील प्रकरणाची तयारी करून येत नाहीत हे निरीक्षण नोंदविताना वाईट वाटते अशी प्रतिक्रिया थेट न्यायमूर्तींनी व्यक्त केल्याने या विषयाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

‘सरकारी काम दोन दिवस थांब’ अशी लोकप्रिय म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येतो आहे. सरकारी वकील प्रकरणाची तयारी करून येत नाहीत हे निरीक्षण नोंदविताना वाईट वाटते अशी प्रतिक्रिया थेट न्यायमूर्तींनी व्यक्त केल्याने या विषयाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. सरकारी वकिलांच्या अकार्यक्षम भूमिकेमुळे न्यायदानाच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होतो, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे. बालाजी किन्हाळे यांच्या प्रलंबित फौजदारी प्रकरणात न्यायमूर्ती रोहित देव यांनी हे मत व्यक्त केले असले तरी सरकारी मानसिकता बाळगणाºया सर्व वकिलांना हे लागू पडते. नागपुरातील सरकारी वकील हुशार नाहीत, अशातला भाग नाही. सरकारी वकील हुशार असले तरी त्यांच्या मानसिकतेला सरकारी किनार आहे. देशातील विधी क्षेत्रात नागपुरातील वकील आजही सर्वश्रेष्ठ ठरत आले आहे. मग ते सरकारी असो वा खासगी प्रक्टिस करणारे. मग सरकारी वकील अकार्यक्षमपणे वागतात ही टीका करण्याची न्यायालयावर वेळ का आली, यासाठी निश्चितच खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. मुळात आपल्याकडे सरकार बदलले की सरकारी वकीलही बदलात. सरकार आपल्या विचारांशी जुळणाºया लोकांना सरकारी वकील होण्याची संधीही देते. अशा नियुक्त्यामागे राजकीय हितही असते. मात्र अकार्यक्षम सरकारी वकिलांच्या नियुक्त्या होऊ नये यासाठी सरकारने धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे वकिलांची कार्यक्षमता पाहूनच त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असाव्या असा अंदाज बांधणे चुकीचे ठरणार नाही. मग सरकारी वकिलांना वेळ मिळत नसल्याने कदाचित ते न्यायालयात सरकारी प्रकरणात कमी पडत असावे असा युक्तिवाद सध्या चर्चिला जात आहे. सरकारी वकिलांना खासगी प्रॅक्टिस करण्याचे बंधन नाही. ते सरकार विरोधातील प्रकरण वगळून कोणत्याही प्रकरणात पॅ्रक्टिस करू शकतात. खासगी प्रॅक्टिसमधील त्यांचा सहभाग अधिक वाढत असल्याने कदाचित त्यांना वेळ मिळत नसावा, असा अंदाज बांधला तर न्यायालयाने ज्या तीन प्रश्नांची राज्याच्या प्रधान सचिवांना विचारणा केली आहे त्याचे उत्तर देताना निश्चितच नाकीनऊ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी कंपन्यात काम करणाºया प्रत्येकाला आता ‘केआरए’चे बंधन आले आहे. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशी केआरएची व्याख्या आहे. त्यामुळे सरकारी वकिलांची कार्यक्षमता तपासण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी ‘केआरए’ लागू केला तरी कदाचित न्यायदानाच्या प्रक्रियेला गती येईल आणि वकिलांच्या सरकारी मानसिकतेवर दडपण येईल.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र