शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

सरकार सावध व्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:24 IST

नागपूर आणि मध्य प्रदेशातील काही जिल्हे सध्या आजाराशी लढताहेत.

नागपूर आणि मध्य प्रदेशातील काही जिल्हे सध्या आजाराशी लढताहेत. नागपूर जिल्ह्याला ‘डेंग्यू’ने डंख मारला आहे. गत २० दिवसात जिल्ह्यातील चार लोकांचा ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. डेंग्यू आणि ‘स्क्रब टायफस’ या संक्रामक आजाराच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत. मात्र शहरातील आणि ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात या आजाराशी संबंधित अद्ययावत उपचार मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. या संक्रामक आजाराचे प्रमाण वाढल्यास अनेक रुग्ण मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आजाराशी कसा लढा देता येईल, याबाबत सरकारने वेळीच सावध होणे गरजेचे आहे. नागपूर जिल्ह्यातील खात या गावात डेंग्यूमुळे १२ व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर गावात फॉगिंग करण्यासाठी आणि रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाचे पथक पोहोचले. हे पथक आधीच पोहोचले असले तर कदाचित ती मुलगी वाचली २२असती. अशीच घटना नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर परिषद क्षेत्रात घडली. तेथेही एका नोकरदाराचा डेंग्यूमुळे बळी गेला. दोन्ही ठिकाणी कारण एकच अस्वच्छता ! त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने मृत्यू झाल्यावर एखाद्या ठिकाणी जाण्यापेक्षा गावपातळीवर दरवर्षी अशा आजारापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखल्या तर अनेकांचे जीव वाचतील. मात्र सरकारी मानसिकतेने ग्रासलेल्या लोकांना याच्याशी काही देणे घेणे नाही. मुळात ‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार आहे. आपल्या देशात तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम आणि विदर्भात या रोगाचे रुग्ण सापडतात. साधारणत: पावसाळ्यात या आजाराचे रुग्ण दिसून येतात. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण सध्या नागपूर जिल्ह्यात आहेत, ही निश्चितच चिंतेची बाब आहे. याबाबत आरोग्य विभागाने आत्ममंथन करणेही तितकेच गरजेचे आहे. स्थानिक ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, महापालिका याही या आजाराच्या वाढत्या संक्रमणासाठी तितक्याच दोषी आहेत. याबरोबरच परिसर स्वच्छतेसाठी सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहणारे नागरिकांचे बेजबाबदार धोरण, याबाबत न बोललेले बरे. कारण आमच्या देशात केवळ गांधी जयंतीला लोक हातात झाडू घेतात आणि सेल्फी काढतात. बाकी ३६४ दिवस त्यांचा परिसर किंवा गाव स्वच्छता अभियानाला सुटी असते. सरकारने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून गाव स्वच्छता अभियानाची मोहीम राज्यभर चालविली. मात्र याला स्पर्धेचे स्वरूप आल्यानंतर काही ठिकाणी केवळ पुरस्कारासाठी गावे स्वच्छ केली गेली. नंतर पुन्हा जैसे थे.

टॅग्स :dengueडेंग्यूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernmentसरकार