शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

सरकार सावध व्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 06:24 IST

नागपूर आणि मध्य प्रदेशातील काही जिल्हे सध्या आजाराशी लढताहेत.

नागपूर आणि मध्य प्रदेशातील काही जिल्हे सध्या आजाराशी लढताहेत. नागपूर जिल्ह्याला ‘डेंग्यू’ने डंख मारला आहे. गत २० दिवसात जिल्ह्यातील चार लोकांचा ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. डेंग्यू आणि ‘स्क्रब टायफस’ या संक्रामक आजाराच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत. मात्र शहरातील आणि ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात या आजाराशी संबंधित अद्ययावत उपचार मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. या संक्रामक आजाराचे प्रमाण वाढल्यास अनेक रुग्ण मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आजाराशी कसा लढा देता येईल, याबाबत सरकारने वेळीच सावध होणे गरजेचे आहे. नागपूर जिल्ह्यातील खात या गावात डेंग्यूमुळे १२ व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर गावात फॉगिंग करण्यासाठी आणि रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाचे पथक पोहोचले. हे पथक आधीच पोहोचले असले तर कदाचित ती मुलगी वाचली २२असती. अशीच घटना नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर परिषद क्षेत्रात घडली. तेथेही एका नोकरदाराचा डेंग्यूमुळे बळी गेला. दोन्ही ठिकाणी कारण एकच अस्वच्छता ! त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने मृत्यू झाल्यावर एखाद्या ठिकाणी जाण्यापेक्षा गावपातळीवर दरवर्षी अशा आजारापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखल्या तर अनेकांचे जीव वाचतील. मात्र सरकारी मानसिकतेने ग्रासलेल्या लोकांना याच्याशी काही देणे घेणे नाही. मुळात ‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार आहे. आपल्या देशात तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम आणि विदर्भात या रोगाचे रुग्ण सापडतात. साधारणत: पावसाळ्यात या आजाराचे रुग्ण दिसून येतात. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण सध्या नागपूर जिल्ह्यात आहेत, ही निश्चितच चिंतेची बाब आहे. याबाबत आरोग्य विभागाने आत्ममंथन करणेही तितकेच गरजेचे आहे. स्थानिक ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समिती, महापालिका याही या आजाराच्या वाढत्या संक्रमणासाठी तितक्याच दोषी आहेत. याबरोबरच परिसर स्वच्छतेसाठी सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहणारे नागरिकांचे बेजबाबदार धोरण, याबाबत न बोललेले बरे. कारण आमच्या देशात केवळ गांधी जयंतीला लोक हातात झाडू घेतात आणि सेल्फी काढतात. बाकी ३६४ दिवस त्यांचा परिसर किंवा गाव स्वच्छता अभियानाला सुटी असते. सरकारने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून गाव स्वच्छता अभियानाची मोहीम राज्यभर चालविली. मात्र याला स्पर्धेचे स्वरूप आल्यानंतर काही ठिकाणी केवळ पुरस्कारासाठी गावे स्वच्छ केली गेली. नंतर पुन्हा जैसे थे.

टॅग्स :dengueडेंग्यूDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernmentसरकार