शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

हेच का अच्छे दिन?

By admin | Updated: May 14, 2016 01:38 IST

दहा-पंधरा वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपाच्या मंडळींकडून सत्तेत आल्यानंतर लोकाभिमुख, जनतेच्या प्रश्नांप्रति सजग आणि सतर्क राहण्याची अपेक्षा होती.

दहा-पंधरा वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपाच्या मंडळींकडून सत्तेत आल्यानंतर लोकाभिमुख, जनतेच्या प्रश्नांप्रति सजग आणि सतर्क राहण्याची अपेक्षा होती. परंतु अवघ्या दीड-दोन वर्षात भ्रमाचा भोपळा फुटला आहे. घोषणांचा सुकाळ असला तरी प्रत्यक्षात काहीही हाती आले नसल्याचा अनुभव जनताजनार्दन घेत आहे. हे झाले सरकारचे. पण केंद्र आणि राज्य सरकारात सत्तास्थानी असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून ‘पार्टी विथ द डिफरन्स’ या तत्त्वाला अनुसरून आचरण अपेक्षित आहे. पण तिथेही बोंब असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. बायकोची चुकामुक झाल्याने वैतागलेले जळगावचे खासदार ए.टी. पाटील यांनी कल्याण रेल्वेस्थानकावर तब्बल ५० मिनिटे गोंधळ घातला. बायकोशी संपर्क साधून द्या, त्याच गाडीत तातडीने तिकीट द्या, खालचा बर्थ द्या अशा मागण्या करीत पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा जो तपशील बाहेर आला त्यानुसार पाटील हे जळगावकडे जाणाऱ्या गाडीऐवजी पुण्याच्या गाडीत बसले आणि घोळ झाला. चूक स्वत:ची असताना त्याचे खापर रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर फोडणे सर्वथैव चुकीचे आहे. ‘खास’ असल्याच्या भावनेतून असे प्रकार घडतात. मात्र त्यातून लोकप्रतिनिधी म्हणून ते जनतेपुढे कोणता आदर्श ठेवतात हा गहन प्रश्न आहे. पाटील यांच्याच पक्षाचे चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी तर पुढची मजल मारली. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याच्या श्रीमुखात भडकावून जनतेच्या प्रश्नाप्रति किती जागरूक आहोत आणि प्रसंगी कायदादेखील हातात घ्यायला मागे पुढे पाहत नाही, असा आदर्श (?) वस्तुपाठ त्यांना घालून द्यायचा होता काय? शासकीय योजनेतून गोठाशेड मिळावे, यासाठी एका शेतकऱ्याने पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला वर्षभरापूर्वी चार हजार रुपये दिले होते, परंतु तरीही त्याला गोठाशेड मंजूर झाले नाही. शेतकऱ्याने आमदारांकडे कैफियत मांडली. आमदारांनी तातडीने पंचायत समितीचे कार्यालय गाठून जाब विचारला. अशा प्रकारांमधून शासकीय कर्मचारीवर्ग नाऊमेद होण्याची शक्यता आहे. या दोन्ही घटनांवरून या लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेऊन वेगळेपण दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडे कायदा हातात घेऊन वृत्तपत्रांचे मथळे आणि समाजमाध्यमांवरील चर्चांद्वारे स्वत:ला नायक म्हणून ठसविण्याचा कैफ लोकप्रतिनिधींना चढला आहे. त्यातून हे प्रकार घडत असून, ते लोकशाहीला मारक आहे.