शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

गूड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 00:34 IST

गूड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स (उत्तम आणि सोपा कर ) या शब्दांत नरेंद्र मोदी सरकारने वर्णन केलेल्या गूड्स अ‍ॅण्ड सर्व्हिस ...

गूड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स (उत्तम आणि सोपा कर) या शब्दांत नरेंद्र मोदी सरकारने वर्णन केलेल्या गूड्स अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) म्हणजेच वस्तू व सेवा कराची चमक अवघ्या अडीच वर्षांतच फिकी पडली आहे. सर्वात मोठी करक्रांती म्हणून उदोउदो करण्यात आलेल्या या कर सुधारणेवरून राज्यांची वाढती नाराजी आता समोर येऊ लागली आहे. राज्यांचा हिस्सा त्यांच्याकडे वळता करण्यात केंद्राकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल आतापर्यंत सहा राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशाने आवाज बुलंद केला आहे.

केरळने तर या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. आॅगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांचा राज्यांचा वाटा अद्याप त्यांना मिळालेला नाही. सध्या तरी केवळ विरोधी पक्षांच्या सरकारांनीच त्याविरोधात आवाज उठवला आहे; मात्र परिस्थितीत सुधारणा न झाल्यास भारतीय जनता पक्षाची सरकारे असलेल्या राज्य व केंद्रशासित प्रदेशांनाही तोच मार्ग चोखाळणे भाग पडणार आहे. म्हणतात ना, सगळी सोंगे आणता येतात; पण पैशाचे सोंग आणता येत नाही! इथे प्रश्न हा उपस्थित होतो की, ज्या प्रणालीमुळे कररचना सुटसुटीत होऊन महसुलात वाढ होणे अपेक्षित होते, त्या कर प्रणालीवर तीस महिनेही पूर्ण होण्याच्या आधीच अपयशाचा शिक्का का बसू लागला आहे?

कोणत्याही चांगल्या कर प्रणालीमध्ये प्रामाणिकपणा, पर्याप्तता, सुबोधता, पारदर्शकता आणि प्रशासकीय सहजता ही गुणवैशिष्ट्ये असणे अत्यंत आवश्यक असते. जर एखादी कर प्रणाली अपयशी ठरण्याकडे वाटचाल करू लागली असेल, तर उपरोल्लेखित गुणवैशिष्ट्यांसोबत तडजोड केली जात आहे, हे निश्चितपणे समजावे! सात सरकारांनी जीएसटीसंदर्भात उठवलेला आवाज हा केवळ राजकीय विरोधासाठी असल्याचे नेहमीप्रमाणे गृहीत न धरता, केंद्र सरकारने वेळीच पुनरावलोकन करून, विरोधकांनाही विश्वासात घेत आवश्यक ती पावले उचलणे अत्यंत निकडीचे झाले आहे.

देशात एकच अप्रत्यक्ष कर असावा आणि त्याचा दरही एकच असावा, या कल्पनेतून जीएसटीचा पाठपुरावा करण्यात आला होता. जीएसटीमुळे अप्रत्यक्ष कर संकलन वाढणे अपेक्षित होते; मात्र अद्याप तरी तसे झालेले नाही. जीएसटीमुळे महसुलामध्ये घट होण्याची साशंकता विविध राज्यांनी तेव्हाच व्यक्त केली होती आणि त्यांची ती भीती दूर करण्यासाठीच पहिली पाच वर्षे कर संकलनात १४ टक्क्यांपेक्षा जास्त तूट आल्यास केंद्र सरकार राज्यांना त्याची भरपाई करून देईल, अशी तरतूद जीएसटी कायद्यातच करण्यात आली आहे. त्याच भरपाईसाठी सात सरकारांनी आवाज बुलंद केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांची रक्कम लवकरच अदा करण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र रक्कम नेमकी केव्हा देणार, हे स्पष्ट केलेले नाही.

आॅक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या रकमेबाबत तर त्या काही बोललेल्याच नाहीत. केंद्र सरकारची आर्थिक स्थिती चांगली नाही, याकडेच ही वस्तुस्थिती अंगुलीनिर्देश करीत आहे. आधीच्या राजवटीत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला होता आणि आम्ही तो आटोक्यात आणला आहे, असे मोदी सरकारचे धुरीण मोठ्या अभिमानाने सांगत असतात. तो दावा खरा मानल्यास अर्थव्यवस्थेची स्थिती फार गंभीर असल्याचेही मान्य करावे लागेल. प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार आटोक्यात आणल्यानंतरही केंद्र सरकारच्या तिजोरीत राज्यांचा वाटा देण्यासाठी रोकड नसेल, तर दुसरा अर्थ तरी कोणता निघू शकतो? निश्चलनीकरण आणि जीएसटीची अंमलबजावणी या दोन्ही निर्णयांमधून मोदी सरकारची हेकेखोरी आणि एककल्लीपणा दिसला.

राजकीय विरोधक तर सोडाच, नामवंत अर्थतज्ज्ञांनाही अर्थकारणातले काहीच कळत नाही, अशा आविर्भावात हे दोन्ही निर्णय रेटून नेण्यात आले. त्याचे परिणाम आज दृष्टोत्पतीस पडत आहेत. आता तरी सरकारने हेकेखोरपणा आणि एककल्लीपणा सोडायला हवा आणि सर्वसमावेशकतेची कास धरायला हवी. विरोधकांना विश्वासात घ्यायचे नसल्यास घेऊ नका, पण किमान तुमच्या विचारसरणीस मानणाऱ्या अर्थतज्ज्ञांची मते तरी विचारात घ्या! जीएसटी प्रणालीच्या विद्यमान स्वरूपात अनेक त्रुटी आहेत हे मान्य करून त्या दूर करण्याच्या दृष्टीने पावले उचलल्यास अजूनही ही प्रणाली गूड अ‍ॅण्ड सिम्पल टॅक्स प्रणाली बनविणे शक्य आहे. केंद्र सरकार त्यासाठी लवचीकता दाखवेल का, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Taxकर