शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
3
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
4
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
5
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
6
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
7
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
8
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
9
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
10
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
11
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
12
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
13
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
14
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
15
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
16
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
17
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
18
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
19
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
20
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!

कोरोना महामारीने दिलेली सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 01:59 IST

कोरोना महामारीचा आपल्या देशाच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे, हे स्पष्टच आहे. विमान वाहतूक आणि देशांतर्गत प्रवासी वाहतूक बंद ...

कोरोना महामारीचा आपल्या देशाच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे, हे स्पष्टच आहे. विमान वाहतूक आणि देशांतर्गत प्रवासी वाहतूक बंद झाल्याने विदेशी तसेच देशांतर्गत पर्यटक येणार नाहीत. आपली निर्यातदेखील प्रचंड दबावाखाली असेल. चीनकडून कच्चा माल मिळणे बंद झाल्याने वाहन उद्योग आणि फार्मास्युटिकल उद्योगही संकटात सापडला आहे. या स्थितीत आयातीत वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागणार आहे.

सरकारने मोटारीचे सुटे भाग व औषधांना लागणारी रसायने देशातच तयार करण्यासाठी देशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. जागतिक अर्थकारणाशी आपल्या अर्थकारणाचे असलेले नाते तोडण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा करून घ्यायला हवा. असे संकट पुन्हा उद्भवले तर त्याला तोंड देण्याची तयारीही करता येईल. या संधीचा फायदा घेऊन मोठ्या उद्योगांशी स्पर्धा करण्याची क्षमता लहान उद्योगात निर्माण करावी लागेल. त्यामुळे त्याचे दोन प्रकारचे फायदे होतील.

जागतिक पुरवठादारांच्या साखळीतून आपली सुटका होईल, हा एक आणि दुसरा म्हणजे भविष्यात आपली अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे संकट उद्भवले तरी त्याला तोंड देण्याची क्षमता आपल्यात असेल! शिवाय नवे रोजगार उपलब्ध होतील. त्यातून आपल्याला आर्थिक विकासाचे स्वयंपूर्ण मॉडेल उभे करता येईल.

आयातीत वस्तूंना पर्याय देण्याच्या या प्रयत्नामुळे वस्तूंचे उत्पादनमूल्य वाढण्याची शक्यता आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतून उपलब्ध होणारा विजेचा बल्ब जो १०० रुपयांना मिळतो, तो देशातील लघुउद्योगाकडून १२५ रुपयांना मिळेल; पण सध्यासारखी जागतिक अस्वस्थता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम वस्तूंच्या पुरवठ्यावर होणार नाही, तसेच स्थानिक उत्पादन क्षमता वाढल्याने अधिक पैसे मोजून मिळणाऱ्या बल्बचे पैसे आपल्याच नागरिकांच्या खिशात पडून त्यांच्याकडून बाजारातील मागणी वाढण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत सरकारने आयात वस्तूंवर अधिक कर लावून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहित केले पाहिजे. हे करताना सरकारने स्थानिक उद्योजकांना नव्या उत्पादन पद्धतींचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, तसेच जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडण्याची तयारीही ठेवावी लागेल. त्यामुळे त्या संघटनेचा रोष ओढवून घेण्याची आपल्यावर पाळी येणार नाही.

एकीकडे हे करीत असताना दुसरीकडे सरकारने आपल्या विद्यापीठांना तसेच वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थांना आयातीत वस्तूंना देशी वस्तूंचा पर्याय निर्माण करण्याच्या दृष्टीने संशोधनासाठी प्रेरित केले पाहिजे. त्यासाठी सरकारला अधिक खर्च करावा लागणार आहे; ‘कोरोना’स तोंड देण्यासाठी देशाला सक्षम करण्याच्या दृष्टीने हा अधिकचा खर्च करणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे भावी आर्थिक विकासाचा पाया घातला जाईल.भारताने जागतिक अर्थकारणापासून स्वत:चे संबंध पूर्णपणे तोडून टाकावेत, असे मला सुचवायचे नाही; पण निदान कमी महत्त्वाच्या वस्तूंचे उत्पादन तरी देशात व्हावे, त्यासाठी परदेशांवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये, एवढाच या विवेचनाचा अर्थ आहे. हे करीत असताना आपण सेवांची निर्यात कायम ठेवू शकू. विशेषत: सॉफ्टवेअर क्षेत्रातील निर्यात सुरूच ठेवता येईल. तसेच रासायनिक खते व खनिज तेल यांची आयात कायम ठेवावी लागेल; पण बल्बसारख्या वस्तूंचे उत्पादन आपण आपल्या देशात करायला हवे. मग ग्राहकांना त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागले तरी हरकत नाही.

महाग असल्याने बल्बसारख्या वस्तूंची निर्यात करू शकणार नाही. या समस्येवर मात करण्यासाठी आपण आपल्या निर्यातदारांना सबसिडी देऊन त्याची भरपाई करू शकू. वाढत्या आयातकरामुळे मिळणाºया उत्पन्नातून या सबसिडीसाठी निधी उपलब्ध करता येईल. एकूणच आपले दरवाजे जरी बंद केले तरी काही गोष्टींसाठी खिडक्या मात्र आपल्याला उघड्या ठेवता येतील.

‘कोरोना’मुळे भारतीय शेअर बाजारावर वाईट परिणाम झाला आहे. निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरला असून, घसरण सुरूच आहे; पण त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. गेल्या काही वर्षांत जी.डी.पी.च्या विकासात घसरण होत असताना सेन्सेक्स मात्र वाढतच होता. त्याचे कारण एकूण अर्थव्यवस्थेचा संकोच होत होता. तरीही बड्या व्यावसायिकांचा व्यवसायातील हिस्सा वाढतच होता. त्यामुळे सेन्सेक्सची वाढ होत होती. आता हीच प्रक्रिया बदलावी लागेल.

आता असे धोरण आखावे लागेल ज्यामुळे जी.डी.पी.चा विकासदर चढाच राहील; पण सेन्सेक्स मात्र कमी राहील. त्यासाठी मध्यम आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. हे पाहता ‘कोरोना’च्या संकटाचा फायदा करून घेण्यासाठी जागतिक अर्थकारणाशी संबंध ठेवण्याच्या चुकीच्या धोरणांचा त्याग करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या दोन दशकांपासून आपण राबवीत असलेले धोरण या निमित्ताने सोडून दिले आणि काही गोष्टींसाठी आत्मनिर्भर होण्यासाठी स्थानिक गुंतवणूकदारांना प्रोत्साहन दिले, तर त्याचे फायदे आपल्या देशाला दीर्घकाळपर्यंत मिळत राहणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या