शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जिल्हा खनिज विश्वस्त निधीप्रकरणी गोवा सरकारची अनास्था आदिवासी समाजाच्या मुळावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 18:32 IST

खाणपट्टय़ात राहणाऱ्या आदिवासी आणि कमकुवत समाजाच्या कल्याणासाठी स्थापन करायच्या जिल्हा खनिज विश्वस्त निधीवर केवळ खाण कंपन्यांशी संबंधित आणि हितसंबंधी नेते यांचीच वर्णी लावल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असले तरी प्रत्यक्षात सर्वसमावेशक समिती नेमण्यासाठी उशीर होणार असल्याचे संकेत मिळतात.

- राजू नायक

खाणपट्टय़ात राहणाऱ्या आदिवासी आणि कमकुवत समाजाच्या कल्याणासाठी स्थापन करायच्या जिल्हा खनिज विश्वस्त निधीवर केवळ खाण कंपन्यांशी संबंधित आणि हितसंबंधी नेते यांचीच वर्णी लावल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असले तरी प्रत्यक्षात सर्वसमावेशक समिती नेमण्यासाठी उशीर होणार असल्याचे संकेत मिळतात.

उच्च न्यायालयाने सरकारच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र रोष व्यक्त करताना आता केवळ जिल्हाधिकाऱ्यांना या निधीचे काम पाहण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय ज्या बँकेमध्ये हा १८० कोटींचा निधी ठेवला आहे, त्यावर करडी नजर ठेवायच्या सूचना दिल्या आहेत. या निधीच्या अध्यक्षपदी सरकारने आमदार नीलेश काब्राल यांची नियुक्ती केली व अन्य सदस्य खाण व्यवसायाशी संबंधितच नेमले होते. ते खाण कंपन्यांचेच हितरक्षण करतील व कायद्यात ज्या कारणासाठी हा निधी तयार केलाय, त्याला हरताळ फासला जाईल, असा आरोप करून गोवा फाउंडेशन ही संघटना न्यायालयात गेली होती.

या समितीवर आता सरकारला खाणपट्टय़ात राहणारे तज्ज्ञ, कमकुवत समाजाचे प्रतिनिधी व ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचे प्रतिनिधी नेमावे लागतील. या समितीने ग्रामीण जनतेला- खाणींमुळे विवंचना सोसाव्या लागल्या. त्यांच्या कल्याणाच्या योजना आखाव्यात, असे स्वयंपोषक खाणींची कास धरणाऱ्या २०११च्या केंद्रीय खाण मंत्रालयाच्या दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे. गोव्याच्या खाणपट्टय़ात सध्या तीव्र पाणी टंचाई सतावते आहे. खाणी दोन वर्षापूर्वी बंद झाल्यानंतर खाण कंपन्यांनी त्यांच्याकडून होणारा पाणीपुरवठा बंद केला.  तसेच इतर मोफत योजनाही बंद केल्या होत्या. खनिज निधीतून पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांना बसेस, शाळांची दुरुस्ती आदी कामे हाती घेता येतात. सध्या न्यायालयात खाणपट्टय़ातील लोकांचे होत असलेले हाल व खाण कंपन्यांची बेफिकिरी यासंदर्भात अनेक अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

गोवा फाउंडेशनचे प्रमुख क्लॉड आल्वारीस यांच्या मते, सरकार केवळ खाण कंपन्यांची खातीरदारी करण्यात मग्न असून त्यांना गरीब जनतेच्या हाल अपेष्टांची पर्वा नाही. या खनिज निधीवर सरकारला आता जादा सरकारी अधिकारी नेमावे लागले तरी त्यांनी सरकारच्या दबावाखाली काम न करता सामान्य जनतेचे हितरक्षण करावे, असे ते म्हणाले. गोवा सरकार किती सक्षम व वेगाने ही नवी समिती नियुक्त करते, त्याकडे लोकांचे लक्ष लागले आहे, असे ते म्हणाले.

खाणी बंद पडल्यानंतर खाणपट्टय़ातील खनिज अवलंबितांचे लांगूलचालन करण्यात सरकार गुंतले असून या लोकांना खिरापती म्हणून सरकारने किमान १०० कोटी उधळले आहेत, त्यांच्यावर कारवाई करू नका, असे सरकारने बँकांनाही साकडे घातले आहे; परंतु ज्यांच्यावर खाणींमुळे पर्यावरणीय व सामाजिक संकट कोसळले त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिले आहे. ग्रामीण गोव्यात हजारो लोक असे आहेत, ज्यांची शेते नापीक बनली व त्यांचे जलस्रोत आटले, त्यांना मात्र सरकारकडून कसलीही मदत मिळत नाही. खाणी बंद झाल्यावर बेरोजगार बनलेल्या मजुरांनी केंद्रीय मजूर खात्याकडे जावे, राज्य सरकार काही करू शकत नाही, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना काढले होते.

गोव्यात आदिवासींच्या संघटना सक्षम, प्रभावी नाहीत. त्यांच्या काही नेत्यांवर हल्लेही झाले आहेत. रवींद्र वेळीप यांच्यावर तर पोलीस कोठडीतही हल्ला करण्यात आला होता. हा समाज खाणींमधील प्रदूषण व सरकारची अनास्था यामुळे देशोधडीला लागला आहे. पर्यावरणप्रेमी माधव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एका संघटनेने खाणी स्वत:कडे चालविण्यास देण्याची मागणीही सरकारकडे केली होती. परंतु सरकार कायद्यात दुरुस्ती करून खाणींची भाडेपट्टी त्याच चुकार खाणचालकांना द्यायला उत्सुक आहे. सरकारच्या भूमिकेमुळे आदिवासी समाजाचे संपूर्ण उच्चटन झाल्याचा आरोप त्या समाजाचे रवींद्र वेळीप यांनी केला. रवींद्र म्हणाले : सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले, सांगे व केपे तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये लोकांचे अक्षरश: हाल होत आहेत व जिल्हा खनिज निधीवर त्यांचे प्रतिनिधी घेऊन गावांविषयी प्रत्यक्ष योजना तयार करण्याची वेळ आली आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

टॅग्स :goaगोवा