शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा खनिज विश्वस्त निधीप्रकरणी गोवा सरकारची अनास्था आदिवासी समाजाच्या मुळावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 18:32 IST

खाणपट्टय़ात राहणाऱ्या आदिवासी आणि कमकुवत समाजाच्या कल्याणासाठी स्थापन करायच्या जिल्हा खनिज विश्वस्त निधीवर केवळ खाण कंपन्यांशी संबंधित आणि हितसंबंधी नेते यांचीच वर्णी लावल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असले तरी प्रत्यक्षात सर्वसमावेशक समिती नेमण्यासाठी उशीर होणार असल्याचे संकेत मिळतात.

- राजू नायक

खाणपट्टय़ात राहणाऱ्या आदिवासी आणि कमकुवत समाजाच्या कल्याणासाठी स्थापन करायच्या जिल्हा खनिज विश्वस्त निधीवर केवळ खाण कंपन्यांशी संबंधित आणि हितसंबंधी नेते यांचीच वर्णी लावल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असले तरी प्रत्यक्षात सर्वसमावेशक समिती नेमण्यासाठी उशीर होणार असल्याचे संकेत मिळतात.

उच्च न्यायालयाने सरकारच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र रोष व्यक्त करताना आता केवळ जिल्हाधिकाऱ्यांना या निधीचे काम पाहण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय ज्या बँकेमध्ये हा १८० कोटींचा निधी ठेवला आहे, त्यावर करडी नजर ठेवायच्या सूचना दिल्या आहेत. या निधीच्या अध्यक्षपदी सरकारने आमदार नीलेश काब्राल यांची नियुक्ती केली व अन्य सदस्य खाण व्यवसायाशी संबंधितच नेमले होते. ते खाण कंपन्यांचेच हितरक्षण करतील व कायद्यात ज्या कारणासाठी हा निधी तयार केलाय, त्याला हरताळ फासला जाईल, असा आरोप करून गोवा फाउंडेशन ही संघटना न्यायालयात गेली होती.

या समितीवर आता सरकारला खाणपट्टय़ात राहणारे तज्ज्ञ, कमकुवत समाजाचे प्रतिनिधी व ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचे प्रतिनिधी नेमावे लागतील. या समितीने ग्रामीण जनतेला- खाणींमुळे विवंचना सोसाव्या लागल्या. त्यांच्या कल्याणाच्या योजना आखाव्यात, असे स्वयंपोषक खाणींची कास धरणाऱ्या २०११च्या केंद्रीय खाण मंत्रालयाच्या दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे. गोव्याच्या खाणपट्टय़ात सध्या तीव्र पाणी टंचाई सतावते आहे. खाणी दोन वर्षापूर्वी बंद झाल्यानंतर खाण कंपन्यांनी त्यांच्याकडून होणारा पाणीपुरवठा बंद केला.  तसेच इतर मोफत योजनाही बंद केल्या होत्या. खनिज निधीतून पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांना बसेस, शाळांची दुरुस्ती आदी कामे हाती घेता येतात. सध्या न्यायालयात खाणपट्टय़ातील लोकांचे होत असलेले हाल व खाण कंपन्यांची बेफिकिरी यासंदर्भात अनेक अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

गोवा फाउंडेशनचे प्रमुख क्लॉड आल्वारीस यांच्या मते, सरकार केवळ खाण कंपन्यांची खातीरदारी करण्यात मग्न असून त्यांना गरीब जनतेच्या हाल अपेष्टांची पर्वा नाही. या खनिज निधीवर सरकारला आता जादा सरकारी अधिकारी नेमावे लागले तरी त्यांनी सरकारच्या दबावाखाली काम न करता सामान्य जनतेचे हितरक्षण करावे, असे ते म्हणाले. गोवा सरकार किती सक्षम व वेगाने ही नवी समिती नियुक्त करते, त्याकडे लोकांचे लक्ष लागले आहे, असे ते म्हणाले.

खाणी बंद पडल्यानंतर खाणपट्टय़ातील खनिज अवलंबितांचे लांगूलचालन करण्यात सरकार गुंतले असून या लोकांना खिरापती म्हणून सरकारने किमान १०० कोटी उधळले आहेत, त्यांच्यावर कारवाई करू नका, असे सरकारने बँकांनाही साकडे घातले आहे; परंतु ज्यांच्यावर खाणींमुळे पर्यावरणीय व सामाजिक संकट कोसळले त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिले आहे. ग्रामीण गोव्यात हजारो लोक असे आहेत, ज्यांची शेते नापीक बनली व त्यांचे जलस्रोत आटले, त्यांना मात्र सरकारकडून कसलीही मदत मिळत नाही. खाणी बंद झाल्यावर बेरोजगार बनलेल्या मजुरांनी केंद्रीय मजूर खात्याकडे जावे, राज्य सरकार काही करू शकत नाही, असे उद्गार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना काढले होते.

गोव्यात आदिवासींच्या संघटना सक्षम, प्रभावी नाहीत. त्यांच्या काही नेत्यांवर हल्लेही झाले आहेत. रवींद्र वेळीप यांच्यावर तर पोलीस कोठडीतही हल्ला करण्यात आला होता. हा समाज खाणींमधील प्रदूषण व सरकारची अनास्था यामुळे देशोधडीला लागला आहे. पर्यावरणप्रेमी माधव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एका संघटनेने खाणी स्वत:कडे चालविण्यास देण्याची मागणीही सरकारकडे केली होती. परंतु सरकार कायद्यात दुरुस्ती करून खाणींची भाडेपट्टी त्याच चुकार खाणचालकांना द्यायला उत्सुक आहे. सरकारच्या भूमिकेमुळे आदिवासी समाजाचे संपूर्ण उच्चटन झाल्याचा आरोप त्या समाजाचे रवींद्र वेळीप यांनी केला. रवींद्र म्हणाले : सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले, सांगे व केपे तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये लोकांचे अक्षरश: हाल होत आहेत व जिल्हा खनिज निधीवर त्यांचे प्रतिनिधी घेऊन गावांविषयी प्रत्यक्ष योजना तयार करण्याची वेळ आली आहे. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

टॅग्स :goaगोवा